शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा निर्धार-: कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देऊन उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:48 IST

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीला साक्षी ठेवून मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही, असा निर्धार केला.

ठळक मुद्देप्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प नदीघाटावर सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली.

इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीला साक्षी ठेवून मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही, असा निर्धार केला. आवाडे यांनी आपल्या वाढदिवस कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देत हा उपक्रम राबविला. यामध्ये शहर परिसरातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या.

पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे इचलकरंजी शहरासह नदीकाठच्या गावांना ‘नदी उशाला, कोरड घशाला’ अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अनेक गावे, शहरे यांनी अन्य नद्यांमधून पाणी आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटविला असला तरी शेती व जनावरांना पंचगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. परिणामी, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर शासनाकडून जुजबी कारवाई होत असल्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्ती निर्धार समितीच्यावतीने विविध उपक्रमांच्या माध्यमांतून जनजागृती सुरू केली आहे. त्यानुसार माजी मंत्री आवाडे यांनी शुक्रवारी होणाऱ्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत प्रदूषणमुक्तीचा निर्धार करण्याचे ठरविले. शुक्रवारी आवाडेंच्या नेतृत्वाखाली शहर परिसरातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींना सोबत घेऊन नदीवेस नाका ते पंचगंगा नदीघाट अशी पदयात्रा काढण्यात आली.

नदीघाटावर सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर आवाडे यांनी उपस्थित सर्वांना प्रदूषणमुक्तीची शपथ दिली. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसदर्भात माहिती देऊन सर्वांनी एकसंघपणे हा प्रश्न सोडवूया, असे आवाहन केले.यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, शार्दुल शेटे, पंढरीनाथ ठाणेकर, प्रकाश सातपुते, किशोरी आवाडे, नंदा साळुंखे, राहुल आवाडे, नजमा शेख, मंगल सुर्वे, शहाजहान मुजावर, राहुल खंजिरे, राजू बोंद्रे, आदींसह नगरसेवक-नगरसेविका तसेच चंदूर, कबनूर, तारदाळ, रेंदाळ, खोतवाडी, हुपरी या परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.रॅलीत जनजागृतीचे फलक‘पदयात्रेमध्ये पावसात पडतात गारा, पंचगंगा नदीमध्ये कचºयाला देऊ नका थारा’, ‘जल हेच जीवन, जल हीच शक्ती’, ‘आमचा निर्धार फक्त पंचगंगा प्रदूषणमुक्त’ असे फलक दर्शवत पंचगंगा प्रदूषणमुक्तीबाबत प्रबोधन करण्यात येत होते.जनजागृतीसाठी पथनाट्येपंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती होण्यासाठी शहरातील वॉर्डांमध्ये दररोज पथनाट्ये सादर केली जात आहेत. त्या माध्यमातून प्रदूषणाची कारणे, टाळण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जात आहे. 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान