शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा निर्धार-: कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देऊन उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:48 IST

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीला साक्षी ठेवून मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही, असा निर्धार केला.

ठळक मुद्देप्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प नदीघाटावर सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली.

इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीला साक्षी ठेवून मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही, असा निर्धार केला. आवाडे यांनी आपल्या वाढदिवस कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देत हा उपक्रम राबविला. यामध्ये शहर परिसरातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या.

पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे इचलकरंजी शहरासह नदीकाठच्या गावांना ‘नदी उशाला, कोरड घशाला’ अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अनेक गावे, शहरे यांनी अन्य नद्यांमधून पाणी आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटविला असला तरी शेती व जनावरांना पंचगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. परिणामी, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर शासनाकडून जुजबी कारवाई होत असल्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्ती निर्धार समितीच्यावतीने विविध उपक्रमांच्या माध्यमांतून जनजागृती सुरू केली आहे. त्यानुसार माजी मंत्री आवाडे यांनी शुक्रवारी होणाऱ्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत प्रदूषणमुक्तीचा निर्धार करण्याचे ठरविले. शुक्रवारी आवाडेंच्या नेतृत्वाखाली शहर परिसरातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींना सोबत घेऊन नदीवेस नाका ते पंचगंगा नदीघाट अशी पदयात्रा काढण्यात आली.

नदीघाटावर सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर आवाडे यांनी उपस्थित सर्वांना प्रदूषणमुक्तीची शपथ दिली. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसदर्भात माहिती देऊन सर्वांनी एकसंघपणे हा प्रश्न सोडवूया, असे आवाहन केले.यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, शार्दुल शेटे, पंढरीनाथ ठाणेकर, प्रकाश सातपुते, किशोरी आवाडे, नंदा साळुंखे, राहुल आवाडे, नजमा शेख, मंगल सुर्वे, शहाजहान मुजावर, राहुल खंजिरे, राजू बोंद्रे, आदींसह नगरसेवक-नगरसेविका तसेच चंदूर, कबनूर, तारदाळ, रेंदाळ, खोतवाडी, हुपरी या परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.रॅलीत जनजागृतीचे फलक‘पदयात्रेमध्ये पावसात पडतात गारा, पंचगंगा नदीमध्ये कचºयाला देऊ नका थारा’, ‘जल हेच जीवन, जल हीच शक्ती’, ‘आमचा निर्धार फक्त पंचगंगा प्रदूषणमुक्त’ असे फलक दर्शवत पंचगंगा प्रदूषणमुक्तीबाबत प्रबोधन करण्यात येत होते.जनजागृतीसाठी पथनाट्येपंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती होण्यासाठी शहरातील वॉर्डांमध्ये दररोज पथनाट्ये सादर केली जात आहेत. त्या माध्यमातून प्रदूषणाची कारणे, टाळण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जात आहे. 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान