शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

दलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:57 IST

नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर दिली आहे.

ठळक मुद्देदलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजेअरविंद बनसोड आणि इतरांना न्याय मिळाला पाहिजे

कोल्हापूर : नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर दिली आहे.नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या सोशल मिडियावर येत आहेत. या विषयावर खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे, की बहुजन समाजामध्ये फूट पाडून, जाती जातींमध्ये भांडणे लावून, स्वत:च्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायला काही लोक पुढे सरसावत आहेत, पण यामधून त्यांचं क्षुल्लक राजकारण साध्य होईल, पण समाजाचं मोठं नुकसान होणार आहे.

चौकशीअंती या घटनांमध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर तत्काळ अन कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा समाजाने दलितांवर अन्याय करु नये, परंतु त्याच वेळी काही कायद्यांचा चुकीचा वापर करून मराठा समाजावर सुद्धा अन्याय करु नये. जर अशाप्रकारे कुणावरही अन्याय होत असेल तर त्याचा मी तत्काळ विरोध केला आहे आणि करत राहणार, असेही त्यांनी म्हटले आहे.काही माथेफिरु लोक दोन्हीकडे असतात. त्या सर्वांना आपण बाजूला पाडलं पाहिजे. समाज हिताच्या दृष्टीने, बहुजन समाजाच्या एकीच्या दृष्टीने तेच योग्य आहे. देशाच्या सामाजिक एकात्मतेला सुरुंग लावणाऱ्या शक्तींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या केवळ घोषणा देऊन काय उपयोग? त्यांचे विचार आत्मसात करणे, त्याप्रमाणे वागणे महत्वाचे आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर व्यक्त केले आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडिया