शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

उपमुख्यमंत्री पवार यांची कोल्हापूरच्या हद्दवाढीला सोयीस्कर बगल, स्थानिकांची सहमती घेण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 14:06 IST

कोल्हापूर : शहर हद्दवाढीचा प्रश्न स्थानिकांच्या सहमतीने सोडवावा, असा सल्ला देवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयात ठोस भूमिका ...

कोल्हापूर : शहर हद्दवाढीचा प्रश्न स्थानिकांच्या सहमतीने सोडवावा, असा सल्ला देवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयात ठोस भूमिका न मांडता सोयीस्करपणे सोमवारी बगल दिली. धडाकेबाज निर्णय घेण्याची ख्याती असलेले पवार यांनी यामध्ये मात्र सावध भूमिका घेत स्थानिकांवर निर्णय सोपवला. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रश्नांबाबतचा गुंता कायम राहिला.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विकास आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूरच्या हद्दवाढ प्रश्नाबाबत नेते आता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगत आहेत. ते कसे शक्य आहे, अशी विचारणा केल्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, हद्दवाढीचा निर्णय स्थानिक नेतृत्वाने घ्यावा. जो प्रश्न स्थानिक लोकांशी निगडीत असतो तो स्थानिकांनीच सोडवायचा असतो. तो एकदा सोडविल्यानंतर बाकीच्या प्रशासकीय गोष्टी, नवीन विकास आराखडा कसा करायचा, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव झाला पाहिजे, शहराला दूरगामी काय फायदा होईल अशा गोष्टींचा समावेश सरकार करेल.थेट पाइपलाइनचे पाणी शहरात आल्यामुळे शहरात सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एकूण पाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्यातील दोन कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित तीन प्रकल्प अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून पूर्ण केले जातील. महापालिकेस जीएसटीचे पैसेही कमी मिळतात. यातूनही मार्ग काढला जाईल. महापालिकेस नवीन इमारतीची गरज आहे. त्याचा आराखडा माझ्यासमोर सादर केला आहे. यासाठी निधी देऊ. जुन्या इमारतीची डागडुजी करून तिथेही काही जनतेशी संबंधित विभाग ठेवले जातील. थेट पाइपलाइनचे उद्घाटन न करताही ते पाणी शहरवासीयांना मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

काळम्मावाडी गळतीचे काम पावसाळ्यापूर्वी काढाकाळम्मावाडी धरणाच्या गळतीमुळे सहा टीएमसी पाणी वाया जात आहे. यामुळे गळती पावसाळ्याच्या आत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी ४० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

खिशात हात न घालता आश्वासनांचाच महापूर..उपमुख्यमंत्री पवार यांनी या दौऱ्यात खिशात हात न घालता नुसत्या आश्वासनांचाच पाऊस पाडला. हद्दवाढीचा विषय स्थानिक नेतृत्वाकडे सोपवून ते मोकळे झाले. महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबतही त्यांनी आराखडे सादर करा, निधी देऊ असे जाहीर केले. इचलकरंजीत नव्याने महापालिका झाली आहे. मात्र येथे आर्थिक अडचण आहे. सरकार पैसे दिल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांचे पगार होतात. यामुळे या महापालिकेसही जीएसटीचे पैसे मिळतील, यासाठी प्रयत्न करू. या महापालिकेचे प्रश्न सोडविण्यासाठी तेथील खासदार, आमदारांनी पाठपुरावा करावा, असाही सल्ला पवार यांनी दिला.

गंगावेश तालमीचाही आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. आता देशाला लोकसभेचे वेध लागले आहेत. मार्चमध्ये निवडणुका जाहीर होतील. तोपर्यंत कोणत्याही विषयाचे साधे आराखडेही सादर होणार नाहीत. त्यानंतर पावसाळा होताच विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल. त्यामुळे साऱ्या घोषणा हवेतच राहण्याची शक्यता जास्त आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार