शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच का?; नगरपालिका क्षेत्रातील 'आशा' प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 12:21 IST

दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना वगळले आहे.

ठळक मुद्देत्यांच्या कामाचे महत्व प्रशासनाच्याही लक्षात आले आहे.मात्र त्यांच्या मानधन वाढीकडे दुर्लक्षच केले जात आहे.

नगरपालिका क्षेत्रातील 'आशा' प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

म्हाकवे -- : (कोल्हापूर)  शहर असो,खेडे अथवा डोंगरातील वाडयावस्त्या असोत याठिकाणी आशा स्वयंसेविका पोहचून माहिती घेत आहेत.कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढाईत सर्वात पुढच्या बाजूला आशांरुपी सैन्य कार्यरत आहे.त्यामुळे त्यांच्या योगदानाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी यांना एक हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र,कोल्हापूर शहरासह नगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २००आशा व जिल्ह्यातील सर्वच १४०गटप्रवर्तक या लाभांपासून वंचित राहात आहेत. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यात २० मार्चपासून 'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला साथ देत आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वेक्षणकरत आहेत. विदेश,इतर राज्य,अन्य जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून आरोग्य यंत्रणेला कळवणे, त्यांना होम क्वारंटाईन करणे, रोज घरी भेट देऊन त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती घेणे याची सर्वस्वी जबाबदारी आशांवर आहे.त्यांच्या कामाचे महत्व प्रशासनाच्याही लक्षात आले आहे.मात्र त्यांच्या मानधन वाढीकडे दुर्लक्षच केले जात आहे.

दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना वगळले आहे.तसेच,कोल्हापूर शहरासह  हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, हुपरी,  चंदगड,आजरा येथिल आशांनाही या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.मग महाराष्ट्राकडून 'निराशा' का?केरळ,तेलंगणा राज्यात आशांना ७ हजार ५०० रुपये मानधनमिळते.मात्र,महाराष्ट्रात राज्य शासन स्वतःकडीलकाहीच मानधन देत नाही. केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या २ हजार रुपये मानधनावरच बोळवण करत आहे.राज्य शासनाने २ हजार रुपये मानधनाची केलेली घोषणा अद्याप तरी हवेतच विरली असून माझा महाराष्ट्रच मागे का असा सवाल येथिल आशा करत आहेतएक दृष्टीक्षेप...

  • कोल्हापूर शहर व नगरपालिका क्षेत्रात आशांची संख्या १००
  • जिल्ह्यात एकूण-२७६५
  • जिल्ह्यात गटप्रवर्तक-१४०
  • राज्यात आशांची संख्या ७३ हजार
  • राज्यात गटप्रवर्तक-३५१०

 

"आशांचे योगदान महत्त्वाचे असतानाही त्यांच्या मानधनाकडे मात्र दुर्लक्ष असते.ग्रामीण इतकेच शहरी भागात घरोघरी जावून सर्व्हे करावा लागतो. मात्र,शहरी आणि नगरपालिका क्षेत्रातील आशांना प्रोत्साहन अनुदानातून वगळले आहे. शेवटी दोन्ही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आशा शासनाचेच काम करतात मग वेगळा नियम कशासाठी?याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे.नेत्रदीपा पाटील,जिल्हाध्यक्षा,आशा संघटना

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसाGovernmentसरकार