शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच का?; नगरपालिका क्षेत्रातील 'आशा' प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 12:21 IST

दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना वगळले आहे.

ठळक मुद्देत्यांच्या कामाचे महत्व प्रशासनाच्याही लक्षात आले आहे.मात्र त्यांच्या मानधन वाढीकडे दुर्लक्षच केले जात आहे.

नगरपालिका क्षेत्रातील 'आशा' प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

म्हाकवे -- : (कोल्हापूर)  शहर असो,खेडे अथवा डोंगरातील वाडयावस्त्या असोत याठिकाणी आशा स्वयंसेविका पोहचून माहिती घेत आहेत.कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढाईत सर्वात पुढच्या बाजूला आशांरुपी सैन्य कार्यरत आहे.त्यामुळे त्यांच्या योगदानाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी यांना एक हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र,कोल्हापूर शहरासह नगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २००आशा व जिल्ह्यातील सर्वच १४०गटप्रवर्तक या लाभांपासून वंचित राहात आहेत. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यात २० मार्चपासून 'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला साथ देत आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वेक्षणकरत आहेत. विदेश,इतर राज्य,अन्य जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून आरोग्य यंत्रणेला कळवणे, त्यांना होम क्वारंटाईन करणे, रोज घरी भेट देऊन त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती घेणे याची सर्वस्वी जबाबदारी आशांवर आहे.त्यांच्या कामाचे महत्व प्रशासनाच्याही लक्षात आले आहे.मात्र त्यांच्या मानधन वाढीकडे दुर्लक्षच केले जात आहे.

दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना वगळले आहे.तसेच,कोल्हापूर शहरासह  हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, हुपरी,  चंदगड,आजरा येथिल आशांनाही या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.मग महाराष्ट्राकडून 'निराशा' का?केरळ,तेलंगणा राज्यात आशांना ७ हजार ५०० रुपये मानधनमिळते.मात्र,महाराष्ट्रात राज्य शासन स्वतःकडीलकाहीच मानधन देत नाही. केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या २ हजार रुपये मानधनावरच बोळवण करत आहे.राज्य शासनाने २ हजार रुपये मानधनाची केलेली घोषणा अद्याप तरी हवेतच विरली असून माझा महाराष्ट्रच मागे का असा सवाल येथिल आशा करत आहेतएक दृष्टीक्षेप...

  • कोल्हापूर शहर व नगरपालिका क्षेत्रात आशांची संख्या १००
  • जिल्ह्यात एकूण-२७६५
  • जिल्ह्यात गटप्रवर्तक-१४०
  • राज्यात आशांची संख्या ७३ हजार
  • राज्यात गटप्रवर्तक-३५१०

 

"आशांचे योगदान महत्त्वाचे असतानाही त्यांच्या मानधनाकडे मात्र दुर्लक्ष असते.ग्रामीण इतकेच शहरी भागात घरोघरी जावून सर्व्हे करावा लागतो. मात्र,शहरी आणि नगरपालिका क्षेत्रातील आशांना प्रोत्साहन अनुदानातून वगळले आहे. शेवटी दोन्ही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आशा शासनाचेच काम करतात मग वेगळा नियम कशासाठी?याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे.नेत्रदीपा पाटील,जिल्हाध्यक्षा,आशा संघटना

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसाGovernmentसरकार