शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या नैराश्येतून प्रकार -शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:44 IST

नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन

ठळक मुद्देकोल्हापुरात उपचार सुरू१०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

शिराळा : नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवार, दि. १६ रोजी सकाळी सात वाजता घडली.

सुखदेव पाटील हे आपली आई, पत्नी, दोन मुली, लहान मुलगा, भाऊ, भावजय अशा परिवारासह नाटोली येथे राहतात. एकत्रित कुटुंबाची ८ एकर शेतजमीन आहे. शेतामध्ये त्यांनी दोन वर्षांपूर्वी पाईपलाईन केली असून, वीज वितरण कंपनीकडे शेती पंपासाठी थ्री फेज कनेक्शनसाठी मागणी केली होती.वीज कनेक्शन मिळावे, यासाठी ते शिराळा, इस्लामपूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे वारंवार हेलपाटे घालत होते; मात्र अधिकारी वर्गाकडून काहीही कारणे सांगून बोळवण करण्याचा प्रयत्न केला जात होता. याचबरोबर शेतात पाणी नसल्याने उसाचे पीक वाळून गेले. वीज कनेक्शन नसल्यामुळे हातचे उसाचे पीक पाण्याविना वाळल्यामुळे होणारा आर्थिक फटका ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही.

त्यामुळे गुरुवारी सकाळी सुखदेव व त्यांची पत्नी शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील वस्तीवरील शेडमध्ये त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. जवळच असणाºया त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने, त्यांच्या शेडच्या काही अंतरावर असणाºया वस्तीतील नागरिकांनी त्वरित धाव घेतली व सुखदेव यांना शिराळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.शेतकरी संतप्तशिराळा तालुक्यात वीज कनेक्शन मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीबाबत संतापाची लाट शेतकरी व नागरिकांत पसरली आहे. महावितरणने शेतकऱ्यांना त्वरित वीज कनेक्शन दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकरी संघटनांनी इशारा दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीDeathमृत्यू