शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या नैराश्येतून प्रकार -शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:44 IST

नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन

ठळक मुद्देकोल्हापुरात उपचार सुरू१०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

शिराळा : नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवार, दि. १६ रोजी सकाळी सात वाजता घडली.

सुखदेव पाटील हे आपली आई, पत्नी, दोन मुली, लहान मुलगा, भाऊ, भावजय अशा परिवारासह नाटोली येथे राहतात. एकत्रित कुटुंबाची ८ एकर शेतजमीन आहे. शेतामध्ये त्यांनी दोन वर्षांपूर्वी पाईपलाईन केली असून, वीज वितरण कंपनीकडे शेती पंपासाठी थ्री फेज कनेक्शनसाठी मागणी केली होती.वीज कनेक्शन मिळावे, यासाठी ते शिराळा, इस्लामपूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे वारंवार हेलपाटे घालत होते; मात्र अधिकारी वर्गाकडून काहीही कारणे सांगून बोळवण करण्याचा प्रयत्न केला जात होता. याचबरोबर शेतात पाणी नसल्याने उसाचे पीक वाळून गेले. वीज कनेक्शन नसल्यामुळे हातचे उसाचे पीक पाण्याविना वाळल्यामुळे होणारा आर्थिक फटका ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही.

त्यामुळे गुरुवारी सकाळी सुखदेव व त्यांची पत्नी शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील वस्तीवरील शेडमध्ये त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. जवळच असणाºया त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने, त्यांच्या शेडच्या काही अंतरावर असणाºया वस्तीतील नागरिकांनी त्वरित धाव घेतली व सुखदेव यांना शिराळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.शेतकरी संतप्तशिराळा तालुक्यात वीज कनेक्शन मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीबाबत संतापाची लाट शेतकरी व नागरिकांत पसरली आहे. महावितरणने शेतकऱ्यांना त्वरित वीज कनेक्शन दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकरी संघटनांनी इशारा दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीDeathमृत्यू