शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

शेतकऱ्यांच्या खात्यात ९ ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करा, अन्यथा..

By राजाराम लोंढे | Updated: July 13, 2022 17:36 IST

अनुदान तातडीने दिले नाहीतर ही फौज घेऊन मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही.

राजाराम लोंढेकोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करा अन्यथा क्रांतीदिनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोको करू, असा इशारा ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दिला.प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्या, मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता द्या, एफआरपीच्या तुकड्याचा घेतलेला निर्णय रद्द करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आज, बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता, मात्र या पावसातही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी दसरा चौकात जमा झाले होते. ‘कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा... विजय असो’ अशा घोषणा देत भरपावसात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. शिष्टमंडळाच्यावतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भारतातील साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. इथेनॉल निर्मितीही फायदेशीर ठरत असल्याने कारखानदारांना चांगले पैसे मिळत आहेत. त्यामुळे आमचा दुसरा हप्ता तातडीने द्या. आघाडी सरकारने एफआरपीच्या तुकड्याचा घेतलेला निर्णय रद्द करा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या...मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, भरपावसात ‘स्वाभिमानी’ची ही फौज गोळा झाली आहे, अनुदान तातडीने दिले नाहीतर ही फौज घेऊन मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही. अनिल मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, सागर संभूशेट्टे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी