शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

कृषी विभागाच्या पाचट अभियानाला खो, गांधीनर, वळिवडे परिसरातील शेतकरी पेटवून करतात नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:52 AM

गांधीनगर : कृषी विभागाने सुरू केलेल्या पाचट अभियानाचा गांधीनर, वळिवडे परिसरात फज्जा उडाल्याचे वास्तव पुढे आले आहे. ग्रामीण भागातील काही शेतकरी ऊस तुटून गेल्यानंतर शिल्लक पाला

बाबासाहेब नेर्ले ।गांधीनगर : कृषी विभागाने सुरू केलेल्या पाचट अभियानाचा गांधीनर, वळिवडे परिसरात फज्जा उडाल्याचे वास्तव पुढे आले आहे. ग्रामीण भागातील काही शेतकरी ऊस तुटून गेल्यानंतर शिल्लक पाला लगेच पेटवत असल्याने प्रदूषणात भर पडत आहेच, शिवाय जमिनीची सुपीकताही नष्ट होत आहे. त्यामुळे शेती विभागाने सुरू केलेल्या या अभियानास खो बसला आहे.

शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असताना ऊसशेती, इतर पिकांमध्ये दररोज नवनवीन प्रयोग होत आहेत. शेतकरी आपल्या शेतामधील पुढील पीक लागणीसाठी तसेच तण काढण्याच्या उद्देशाने उसाचे पाचट पेटविण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे. उसाचे पाचट पेटविल्याने हवेचे प्रदूषण तर होतेच, पण जमिनीचेही फार मोठे नुकसान होते. ऊसपीक व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

त्या जमिनीची प्रत चांगल्या प्रकारची राहण्यासाठी किंबहूना ठेवण्याची मानसिकता शेतकºयांमध्ये कमी होताना दिसत आहे. काही शेतकरी ऊस तोडून कारखान्यास घालवतात अन् लगेच वेळ न घालवता दुसºया ऊस लावणीची तयारी करतात. यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येते. कृषी विभाग किंवा कृषी मंडल अधिकाºयांच्या सल्ल्याने नवनवीन तंत्रज्ञान वापरून तसेच पिकांची फेरपालटणी, दोन पिकांतील अंतर, तसेच रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर या बाबींची माहिती घेऊन शेती केल्यास ती फायद्याची ठरणार आहे. काही शेतकरी जमिनींमध्ये विघातक रासायनिक खतांचा वापर बेसुमार करतात.

त्यामुळे जमीन कडक बनून सुपिकता नष्ट होत आहे. भागातील जनावरांची संख्या कमी होत चालल्याने शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे उसाचे पाचट फायदेशीर ठरते आहे. ते जमिनीत गाडल्याने किंवा पाचट कुट्टी करून घेतल्याने सेंद्रिय खत आपल्याला उपलब्ध होते. या पाचट व्यवस्थापनामुळे जमिनीत गारवा (वाफसा) निर्माण होऊन पीक वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. शासनाने दोन वर्षांपासून सुरू केलेल्या या पाचट अभियानाचे महत्त्व अजूनही म्हणावे तेवढे बळिराजाने मनावर न घेतल्याने बळिराजाचे आर्थिक आणि जमिनीचे नुकसान होत आहे. पाचट राखल्याने प्रदूषणही होणार नाही आणि आर्थिक भुर्दंडही बसणार नाही. प्रत्येक शेतकºयाने आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून शेती केल्यास फायदेशीर ठरणार आहे.पाचट पेटविल्यास नुकसानपाचट पेटविल्यास अन्नद्रव्यांबरोबर पीक वाढीसाठी आवश्यक असणाºया जीवाणूंचा नाश होऊन बळिराजाचे नुकसान होते. फायदेशीर ऊसपीक करण्यासाठी एकसरी आड पाचट ठेवून त्यावर प्रतिएकरी ५० किलो युरिया, २० किलो सुपर फॉस्फेट व ५ किलो पाचट कुजविणारे जीवाणू, १०० किलो शेणखत मिसळून द्यावे, त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते व उत्तम सेंद्रिय खताची निर्मिती होते. पाचट ठेवल्याने तण उगवण्याचे प्रमाण कमी होऊन मशागत खर्च कमी येतो. सगळ्यात महत्त्वाचे पाण्याचे प्रमाण कमी लागते. यामुळे शेतकºयाचे आर्थिक नुकसान होत नाही.