शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

भ्रष्टाचारी भाजप सरकारच्या निषेधार्थ कॉँग्रेस रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 11:00 IST

भाजप-शिवसेना सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणामुळेच तिवरे धरण फुटून, तसेच मालाड येथील भिंत कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा कॉँग्रेस रस्त्यावर उतली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, दाभोळकर कॉर्नर येथे कार्यकर्त्यांनी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन पेट्रोल दरवाढीचा गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदविला.

ठळक मुद्देभ्रष्टाचारी भाजप सरकारच्या निषेधार्थ कॉँग्रेस रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नागरिकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी

कोल्हापूर : भाजप-शिवसेना सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणामुळेच तिवरे धरण फुटून, तसेच मालाड येथील भिंत कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा कॉँग्रेस रस्त्यावर उतली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, दाभोळकर कॉर्नर येथे कार्यकर्त्यांनी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन पेट्रोल दरवाढीचा गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदविला.सकाळी अकरापासून स्टेशनरोडवरील कॉँग्रेस कमिटी कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आंदोलनासाठी बाहेर पडले. दाभोळकर कॉर्नर येथील पेट्रोलपंपावर नागरिकांना गुलाब पुष्प देऊन कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. यानंतर सर्वजन वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

या ठिकाणी तीव्र निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी केली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. यानंतर जिल्हाध्यक्ष आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. सुरेश कुराडे, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, तौफिक मुल्लाणी, प्रकाश सातपुते, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, जि. प. सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.गेल्या पाच वर्षांपासून भाजप-शिवसेना सरकारने सातत्याने भ्रष्टाचाराला संरक्षण देऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीन चिट देण्याचे काम केले आहे. विरोधी पक्ष, प्रसार माध्यमे, आरटीआयचे कार्यकर्ते यांनी अनेकदा हे पुरावे समोर आणूनही त्याची दखल घेतलेले नाही. परिणामी, या भ्रष्ट कारणाने दुर्दैवी घटना घडून निरपराधांना आपला जीव गमवावा लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटलेली व मालाड येथील भिंत कोसळून जीवितहानी झालेल्या घटना याचे ताजे उदाहरण आहे. तसेच राज्यात खरिपाचा हंगाम सुरू होऊनही अद्याप बॅँकांनी पुरेशा प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. त्याचबरोबर पुढील सर्व निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.आंदोलनात सदाशिव चरापले, हिंदुराव चौगले, एस. के. माळी, किशोर खानविलकर, रवींद्र मोरे, संजय पोवार-वाईकर, संपतराव चव्हाण-पाटील, रणजित पोवार, शंकरराव पाटील, प्रदीप शेलार, सुलोचना नायकवडे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, मुनाफ बेपारी, संग्राम गायकवाड, सुशील पाटील-कौलवकर, महंमद शरीफ शेख, दीपक थोरात, मंगल खुडे, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर