शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:56 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस आघाडीकडे ३९ जागांची मागणी केली तरी किमान १५ जागांवर मागे-पुढे सरकण्याची ...

ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर‘शिरोळ’चा पेच शेवटपर्यंत राहणार : कोल्हापुरात पाच जागांवर दावा

राजाराम लोंढेकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस आघाडीकडे ३९ जागांची मागणी केली तरी किमान १५ जागांवर मागे-पुढे सरकण्याची मानसिकता संघटनेची दिसते. खरी अडचण शिरोळ मतदारसंघातच आहे. होम पिच असल्याने ही जागा सोडण्यास तयार नाही, तर राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शड्डू ठोकल्याने आघाडीसमोर पेच आहे.

जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू असली, तरी ‘शिरोळ’वरून आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असून, शेवटपर्यंत पेच राहणार हे निश्चित आहे.शिवसेना-भाजपचा विजयाचा वारू रोखण्यासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लोकसभेनंतर मोर्चेबांधणी केली असली, तरी दोन्हीकडील मातब्बर शिलेदार पक्षातून बाहेर पडल्याने दोघे युतीशी टक्कर देऊ शकत नाहीत; त्यामुळे स्वाभिमानी, शेकाप, जनता दल, रिपाइं या मित्रपक्षांना सोबत घेऊनच युतीशी दोन हात करण्याची तयारी कॉँग्रेस, राष्ट्रवादीची आहे. आघाडीत जागा वाटपाचा फारसा तिढा निर्माण होणार नाही, असे वाटत असले, तरी राज्यातील अनेक मतदारसंघ ‘कळी’चे बनले आहेत. त्यातील शिरोळ असून, ‘स्वाभिमानी’चे होमपिच असल्याने या जागेवर त्यांचा अधिकार राहणार आहे.‘स्वाभिमानी’ने आघाडीकडे ३९ मतदारसंघांची यादी दिली आहे; पण २०१४ ला संघटना १५ जागांवर लढली होती. त्यातील पाच जागा कोल्हापूर जिल्ह्यातील होत्या; त्यामुळे यावेळेलाही जिल्ह्यातील ‘शिरोळ’सह राधानगरी-भुदरगड, चंदगड, शाहूवाडी, हातकणंगले या मतदारसंघांवर दावा केला आहे. चर्चेअंती मागे-पुढे सरकण्याची तयारीही संघटनेची राहील.राष्ट्रवादीकडे दहापैकी चार, तर कॉँग्रेसकडे चार मतदारसंघांत ताकदीचे उमेदवार आहेत. प्रकाश आवाडे हे कॉँग्रेसमधून बाहेर पडल्याने इचलकरंजी आणि शाहूवाडीत दोन्ही कॉँग्रेसकडे ताकदीचा उमदेवार सध्यातरी दिसत नाही.

‘शेकाप’ने एकही जागा मिळाली नाही, तर आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे; त्यामुळे त्यांना ‘शाहूवाडी’ची जागा सोडण्याची शक्यता आहे. ‘स्वाभिमानी’ला ‘शिरोळ’ची जागा द्यावीच लागेल. त्यानंतर कोणाकडे ताकदीचे उमेदवार आहेत, हे पाहूनच निर्णय होतील; पण काही झाले, तरी आघाडी तुटणार नाही, याची खबरदारी घेण्यावर आघाडीच्या नेत्यांवर एकमत झाल्याचे समजते.राजेंद्र पाटील यांनी २०१४ ला दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती; त्यामुळे पराभवानंतर त्यांनी लगेच तयारी सुरू केल्याने, आता ते मागे हटणार नाहीत, हे निश्चित आहे. त्यांना ‘स्वाभिमानी’तून उभे करावे, असा प्रयत्न राष्ट्रवादीअंतर्गत सुरू आहे; पण संघटना सावकर मादनाईक यांच्यावर ठाम दिसते.

त्यात पाटील हे साखर कारखानदार असल्याने त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतात, हेही पाहावे लागणार असल्याने सध्यातरी हा प्रयोग संघटनेच्या चौकटी बाहेरचा आहे. पाटील यांनी बंडखोरी केली तर आघाडीच्या दृष्टीने ती मारक ठरणार असल्याने हा गुंता सोडवायचा कसा? या चिंतेत राष्ट्रवादी  व स्वाभिमानीचे नेते आहेत.

जागा वाटपाबाबत आठवड्यात फैसला होईल, आम्ही ३९ जागांची यादी दिली आहे. एकमेकांची ताकद पाहून थोडे मागे-पुढे सरकण्याची तयारी आहे. ‘शिरोळ’तर आमचे होमपिच आहेच; पण त्याबरोबरच ‘राधानगरी’, ‘चंदगड’वरही आमचा दावा असेल.- प्रा. जालंदर पाटील,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर