शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:56 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस आघाडीकडे ३९ जागांची मागणी केली तरी किमान १५ जागांवर मागे-पुढे सरकण्याची ...

ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर‘शिरोळ’चा पेच शेवटपर्यंत राहणार : कोल्हापुरात पाच जागांवर दावा

राजाराम लोंढेकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस आघाडीकडे ३९ जागांची मागणी केली तरी किमान १५ जागांवर मागे-पुढे सरकण्याची मानसिकता संघटनेची दिसते. खरी अडचण शिरोळ मतदारसंघातच आहे. होम पिच असल्याने ही जागा सोडण्यास तयार नाही, तर राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शड्डू ठोकल्याने आघाडीसमोर पेच आहे.

जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू असली, तरी ‘शिरोळ’वरून आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असून, शेवटपर्यंत पेच राहणार हे निश्चित आहे.शिवसेना-भाजपचा विजयाचा वारू रोखण्यासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लोकसभेनंतर मोर्चेबांधणी केली असली, तरी दोन्हीकडील मातब्बर शिलेदार पक्षातून बाहेर पडल्याने दोघे युतीशी टक्कर देऊ शकत नाहीत; त्यामुळे स्वाभिमानी, शेकाप, जनता दल, रिपाइं या मित्रपक्षांना सोबत घेऊनच युतीशी दोन हात करण्याची तयारी कॉँग्रेस, राष्ट्रवादीची आहे. आघाडीत जागा वाटपाचा फारसा तिढा निर्माण होणार नाही, असे वाटत असले, तरी राज्यातील अनेक मतदारसंघ ‘कळी’चे बनले आहेत. त्यातील शिरोळ असून, ‘स्वाभिमानी’चे होमपिच असल्याने या जागेवर त्यांचा अधिकार राहणार आहे.‘स्वाभिमानी’ने आघाडीकडे ३९ मतदारसंघांची यादी दिली आहे; पण २०१४ ला संघटना १५ जागांवर लढली होती. त्यातील पाच जागा कोल्हापूर जिल्ह्यातील होत्या; त्यामुळे यावेळेलाही जिल्ह्यातील ‘शिरोळ’सह राधानगरी-भुदरगड, चंदगड, शाहूवाडी, हातकणंगले या मतदारसंघांवर दावा केला आहे. चर्चेअंती मागे-पुढे सरकण्याची तयारीही संघटनेची राहील.राष्ट्रवादीकडे दहापैकी चार, तर कॉँग्रेसकडे चार मतदारसंघांत ताकदीचे उमेदवार आहेत. प्रकाश आवाडे हे कॉँग्रेसमधून बाहेर पडल्याने इचलकरंजी आणि शाहूवाडीत दोन्ही कॉँग्रेसकडे ताकदीचा उमदेवार सध्यातरी दिसत नाही.

‘शेकाप’ने एकही जागा मिळाली नाही, तर आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे; त्यामुळे त्यांना ‘शाहूवाडी’ची जागा सोडण्याची शक्यता आहे. ‘स्वाभिमानी’ला ‘शिरोळ’ची जागा द्यावीच लागेल. त्यानंतर कोणाकडे ताकदीचे उमेदवार आहेत, हे पाहूनच निर्णय होतील; पण काही झाले, तरी आघाडी तुटणार नाही, याची खबरदारी घेण्यावर आघाडीच्या नेत्यांवर एकमत झाल्याचे समजते.राजेंद्र पाटील यांनी २०१४ ला दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती; त्यामुळे पराभवानंतर त्यांनी लगेच तयारी सुरू केल्याने, आता ते मागे हटणार नाहीत, हे निश्चित आहे. त्यांना ‘स्वाभिमानी’तून उभे करावे, असा प्रयत्न राष्ट्रवादीअंतर्गत सुरू आहे; पण संघटना सावकर मादनाईक यांच्यावर ठाम दिसते.

त्यात पाटील हे साखर कारखानदार असल्याने त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतात, हेही पाहावे लागणार असल्याने सध्यातरी हा प्रयोग संघटनेच्या चौकटी बाहेरचा आहे. पाटील यांनी बंडखोरी केली तर आघाडीच्या दृष्टीने ती मारक ठरणार असल्याने हा गुंता सोडवायचा कसा? या चिंतेत राष्ट्रवादी  व स्वाभिमानीचे नेते आहेत.

जागा वाटपाबाबत आठवड्यात फैसला होईल, आम्ही ३९ जागांची यादी दिली आहे. एकमेकांची ताकद पाहून थोडे मागे-पुढे सरकण्याची तयारी आहे. ‘शिरोळ’तर आमचे होमपिच आहेच; पण त्याबरोबरच ‘राधानगरी’, ‘चंदगड’वरही आमचा दावा असेल.- प्रा. जालंदर पाटील,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर