मार्च, एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला प्रतिटन तीनशे रुपये जादा दर देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:17+5:302021-01-14T04:20:17+5:30
साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी मजूर टंचाई हे कारण पुढे करून खुद्द ऊस तोडण्या दिल्याने साखर कारखान्यांच्या नोंदणीकृत ऊस तोडणी पाळी ...

मार्च, एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला प्रतिटन तीनशे रुपये जादा दर देण्याची मागणी
साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी मजूर टंचाई हे कारण पुढे करून खुद्द ऊस तोडण्या दिल्याने साखर कारखान्यांच्या नोंदणीकृत ऊस तोडणी पाळी पत्रकावर परिणाम झाला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उसाची उचल वेळेत नियोजित हंगामात होत नाही.
यंदाच्या ऊस गळीत हंगामात मार्च, एप्रिल महिन्यांत तुटणाऱ्या उसाला एफआरपीमध्ये जादा तीनशे रुपये दर शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. उसाची नियोजित हंगामात उचल न झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही पाटील यांनी केली.