शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, राजगिऱ्यासह लिंबूला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 10:24 IST

कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाशिवरात्री सण तोंडावर आल्याने शाबू, वरी, राजगिरा व शेंगदाण्यालाही मागणी वाढली.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, राजगिऱ्यासह लिंबूला मागणीबाजारात काकडीची आवक; भाजी वाढली

कोल्हापूर : कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाशिवरात्री सण तोंडावर आल्याने शाबू, वरी, राजगिरा व शेंगदाण्यालाही मागणी वाढली.कोल्हापूर शहरात विशेषत: लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, गंगावेशीतील पाडळकर मार्केट, आदी बाजारांत शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातून ग्राहक खरेदीसाठी येतात. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात भाज्यांच्या दरात वाढ झाली असली, तरीही भाज्यांची मागणी वाढली आहे.

किरकोळ बाजारात कोबीचा गड्डा १0 रुपये, तर घाऊक बाजारात तो साडेसात रुपये असा होता. वांगी १0 रुपये, वरणा, दोडका ३० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलो, दोडका, काकडी ८० रुपये किलो असा दर होता. या दरात वाढ झाली आहे; पण घेवडा ४० रुपये, फ्लॉवर पाच ते सात रुपयांच्या घरात, तर मेथीची पेंढी पाच रुपये, पालक पेंढी तीन रुपये असा दर होता. यांच्या दरात घसरण झाली आहे.याचबरोबर आता फेब्रुवारी संपत आल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे; त्यामुळे विशेषत: लिंबू, काकडीला मागणी वाढली आहे. रसरशीत लिंबूचा दर दोन ते अडीच रुपये असा होता. लिंबूची आवक वाढली आहे. ते घाऊक बाजारात ५५० रुपये चुमडे होते. तसेच द्राक्षे ३० रुपये किलो होती; मात्र सफरचंदाचे दर स्थिर होते. कलिंगड २० रुपये होते, तर हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. आंब्यांचा बॉक्स ५०० रुपये असा होता.महाशिवरात्रीनिमित्त शाबू ५६ रुपयांवरून ६० रुपये किलो, वरी व राजगिरा ८० रुपये किलो, तर शेंगदाणे ९० रुपयांपासून ते १०० रुपयांच्या घरात होता. त्याला ग्राहकांची मागणी होती. हरभरा डाळ ७०, मूगडाळ व उडीद डाळ ८८ रुपये, तूरडाळ ८४ रुपये, तसेच शेंगतेल १२५ रुपये, सरकी तेल ९० रुपये व सुके खोबरे २०० रुपये प्रतिकिलो होते. रत्नागिरी तांदूळ ४४ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत, तर आंबेमोहर ७६ रुपये, बासमती ४० रुपयांपासून ६८ रुपये होता.साखर वाढली...साखरेच्या किमान दरात केंद्र सरकारने प्रतिक्विंटल वाढ केली आहे. यापूर्वी तो २९०० रुपये होता, तो आज ३१०० रुपये झाला; त्यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या प्रतिकिलो दरात आपोआपच वाढ झाली. ती ३४ रुपयांवरून ३६ रुपये झाली असल्याचे व्यापाºयांतून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीMarketबाजारkolhapurकोल्हापूर