शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

महाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, राजगिऱ्यासह लिंबूला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 10:24 IST

कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाशिवरात्री सण तोंडावर आल्याने शाबू, वरी, राजगिरा व शेंगदाण्यालाही मागणी वाढली.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, राजगिऱ्यासह लिंबूला मागणीबाजारात काकडीची आवक; भाजी वाढली

कोल्हापूर : कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाशिवरात्री सण तोंडावर आल्याने शाबू, वरी, राजगिरा व शेंगदाण्यालाही मागणी वाढली.कोल्हापूर शहरात विशेषत: लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, गंगावेशीतील पाडळकर मार्केट, आदी बाजारांत शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातून ग्राहक खरेदीसाठी येतात. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात भाज्यांच्या दरात वाढ झाली असली, तरीही भाज्यांची मागणी वाढली आहे.

किरकोळ बाजारात कोबीचा गड्डा १0 रुपये, तर घाऊक बाजारात तो साडेसात रुपये असा होता. वांगी १0 रुपये, वरणा, दोडका ३० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलो, दोडका, काकडी ८० रुपये किलो असा दर होता. या दरात वाढ झाली आहे; पण घेवडा ४० रुपये, फ्लॉवर पाच ते सात रुपयांच्या घरात, तर मेथीची पेंढी पाच रुपये, पालक पेंढी तीन रुपये असा दर होता. यांच्या दरात घसरण झाली आहे.याचबरोबर आता फेब्रुवारी संपत आल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे; त्यामुळे विशेषत: लिंबू, काकडीला मागणी वाढली आहे. रसरशीत लिंबूचा दर दोन ते अडीच रुपये असा होता. लिंबूची आवक वाढली आहे. ते घाऊक बाजारात ५५० रुपये चुमडे होते. तसेच द्राक्षे ३० रुपये किलो होती; मात्र सफरचंदाचे दर स्थिर होते. कलिंगड २० रुपये होते, तर हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. आंब्यांचा बॉक्स ५०० रुपये असा होता.महाशिवरात्रीनिमित्त शाबू ५६ रुपयांवरून ६० रुपये किलो, वरी व राजगिरा ८० रुपये किलो, तर शेंगदाणे ९० रुपयांपासून ते १०० रुपयांच्या घरात होता. त्याला ग्राहकांची मागणी होती. हरभरा डाळ ७०, मूगडाळ व उडीद डाळ ८८ रुपये, तूरडाळ ८४ रुपये, तसेच शेंगतेल १२५ रुपये, सरकी तेल ९० रुपये व सुके खोबरे २०० रुपये प्रतिकिलो होते. रत्नागिरी तांदूळ ४४ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत, तर आंबेमोहर ७६ रुपये, बासमती ४० रुपयांपासून ६८ रुपये होता.साखर वाढली...साखरेच्या किमान दरात केंद्र सरकारने प्रतिक्विंटल वाढ केली आहे. यापूर्वी तो २९०० रुपये होता, तो आज ३१०० रुपये झाला; त्यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या प्रतिकिलो दरात आपोआपच वाढ झाली. ती ३४ रुपयांवरून ३६ रुपये झाली असल्याचे व्यापाºयांतून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीMarketबाजारkolhapurकोल्हापूर