शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आषाढीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:43 PM

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर झाला आहे. सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली होती. मात्र, आषाढ महिन्यामुळे दुकानामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त होती, तर भाज्यांची आवकजास्त आल्याने दरांत घसरण झाली आहे.बाजारात भाजीपाल्यासह फळांच्या दरामध्ये उतरण झाली आहे. डाळिंब प्रतिकिलो ३० रुपये ...

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर झाला आहे. सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली होती. मात्र, आषाढ महिन्यामुळे दुकानामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त होती, तर भाज्यांची आवकजास्त आल्याने दरांत घसरण झाली आहे.बाजारात भाजीपाल्यासह फळांच्या दरामध्ये उतरण झाली आहे. डाळिंब प्रतिकिलो ३० रुपये होते. त्यांची आवक मोठ्या प्रमाणात आली आहे. ओली मिरची, ढबू मिरची, कारली, भेंडी, वरणा, दोडका, वाल, बिनीस, फ्लॉवर, पडवळ, दुधी भोपळा, शेवग्याची शेंग, कांदापात, मेथी, पोकळा, शेपू व पिकॅडोर यांमध्ये उतरण झाली आहे; पण वांग्याच्या दरामध्ये किंचित वाढ झाली आहे. वांगी २५ रुपये प्रतिकिलो होती. टोमॅटो दहा रुपये प्रतिकिलो, गवार ३० रुपये, आले ५० रुपये तर कोथिंबिरीची पेंढी पाच रुपये होती. याचबरोबर घेवडा निम्म्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात तो ५० रुपये होता, तो आता २५ रुपये झाला आहे. गाजरांचा दर स्थिर प्रतिकिलो २५ रुपये होता.दुसरीकडे, उपवासाची एक नंबरची वरी ८० रुपये प्रतिकिलो, सावाभगर ७२ रुपयांना तर शाबू ६० रुपये, ५६ रुपये; शेंगदाणे ६० ते ७० रुपयांच्या घरात होते. खजूर ११० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत, राजगिरा ८० रुपये असा दर होता. याला ग्राहकांकडून मागणी होती. याचबरोबर शेंगतेल १२५ रुपये, सरकी तेल ९० रुपये, तर तूरडाळ ७० रुपये, हरभरा डाळ ६० रुपये अशी होती. ड्रायफ्रुट व तांदळाचे दर जैसे थे होते. फळांमध्ये संत्री, मोसंबी, चिकू यांच्या दरांत घसरण; तर पेरू, पपईचे दर जैसे थे आहेत; पण सीताफळाच्या दरांत वाढ झाली आहे. ढिगाचा दर ४०० रुपये होता.मका कणसांचा दर झाला दीडपटपावसाळ्यात जिभेला चव देणाऱ्या मक्याच्या कणसांच्या दरात वाढ झाली आहे.गेल्या आठवड्यात शेकड्याचादर ४२५ रुपये होता, तो ७०० रुपयांच्या घरात गेला आहे.त्यामुळे कणसांच्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मात्र, ओल्या भुईमुगाच्या शेंगेच्या दहा किलोंच्या पोत्याचा दर ३८० रुपये झाला आहे. तो गेल्या आठवड्यात ४५० इतका होता.