शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

महापूर नुकसानीपोटी ४८४ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:44 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या महिन्यात थैमान घातलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन निकषांनुसार जिल्ह्यात ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या महिन्यात थैमान घातलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन निकषांनुसार जिल्ह्यात ४८३ कोटी ८५ लाख रुपयांची मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यातील सुमारे १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्यात आले असून, त्याचे वाटप सुरू आहे; तर शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी सुमारे १२३ कोटींची मागणी केली जाणार आहे.नुकसान प्रचंड प्रमाणात झाले असले तरी विविध निकषानुसार त्यातील एवढीच रक्कम मागणी केली जाणार आहे.त्यातील किती उपलब्ध होते हा त्यापुढील प्रश्न आहे. त्यामुळे नुकसान लाखात आणि मिळणार शेकड्यात असे होण्याची शक्यता आहे. महापुरामुळे शेती, व्यापार, घरे, गोठे, पशू, आदींसह विविध घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे; परंतु शासन निर्णय व निकषाप्रमाणे शेती, व्यापारी, घरे यांसाठी शासनाकडून आर्थिक मदतीकरिता रक्कम मागणी केली जाणार आहे. याचे काम जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण सुमारे ४८३ कोटी ८५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात येणार आहे. असे असले तरी शासन निर्णयानुसार मागणीप्रमाणे यातील १०७ कोटी यापूर्वीच सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्णात आले आहेत. ही रक्कम सोडून उर्वरित नुकसान झालेल्या घटकांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी निकषानुसार ३४ कोटी ४६ लाख ५४५ रुपयांची मागणी केली जाणार आहे. सर्वाधिक करवीर तालुक्यात (कोल्हापूर शहरासह) ११ कोटी ७५ लाख रुपये, हातकणंगले तालुक्यात सहा कोटी ३८ लाख, शिरोळ तालुक्यात १० कोटी ३२ लाख रुपये इतकी मागणी आहे. त्याचबरोबर पुरात मृत झालेल्या शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गाई, बैले यांच्यासाठी दोन कोटी, मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीसाठी चार कोटी, पूरकाळात वापरलेल्या इंधनासह वाहने व बोटींवरील खर्चापाटी एक कोटी नऊ लाख रुपये, पूरबाधित क्षेत्रातील स्वच्छता, दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपये मागणी करण्यात येणार आहे.पुरातील जीवितहानीसाठी मदतीकरिता ५३ लाखांची मागणी आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.शेतीच्या नुकसानीसाठी १२४ कोटीपुरामुळे उसासह विविध शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी निकषानुसार १२३ कोटी ९९ लाखांची मागणी केली जाणार आहे. पुरामुळे पडलेल्या कच्च्या व पक्क्या घरांसह गोठे यासाठी ११० कोटीं, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या इमारतींसह रस्ते, वीज, पोलीस ठाणे, महापालिका यांच्यासाठी १३४ कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे.