शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

महापूर नुकसानीपोटी ४८४ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:44 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या महिन्यात थैमान घातलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन निकषांनुसार जिल्ह्यात ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या महिन्यात थैमान घातलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन निकषांनुसार जिल्ह्यात ४८३ कोटी ८५ लाख रुपयांची मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यातील सुमारे १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्यात आले असून, त्याचे वाटप सुरू आहे; तर शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी सुमारे १२३ कोटींची मागणी केली जाणार आहे.नुकसान प्रचंड प्रमाणात झाले असले तरी विविध निकषानुसार त्यातील एवढीच रक्कम मागणी केली जाणार आहे.त्यातील किती उपलब्ध होते हा त्यापुढील प्रश्न आहे. त्यामुळे नुकसान लाखात आणि मिळणार शेकड्यात असे होण्याची शक्यता आहे. महापुरामुळे शेती, व्यापार, घरे, गोठे, पशू, आदींसह विविध घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे; परंतु शासन निर्णय व निकषाप्रमाणे शेती, व्यापारी, घरे यांसाठी शासनाकडून आर्थिक मदतीकरिता रक्कम मागणी केली जाणार आहे. याचे काम जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण सुमारे ४८३ कोटी ८५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात येणार आहे. असे असले तरी शासन निर्णयानुसार मागणीप्रमाणे यातील १०७ कोटी यापूर्वीच सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्णात आले आहेत. ही रक्कम सोडून उर्वरित नुकसान झालेल्या घटकांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी निकषानुसार ३४ कोटी ४६ लाख ५४५ रुपयांची मागणी केली जाणार आहे. सर्वाधिक करवीर तालुक्यात (कोल्हापूर शहरासह) ११ कोटी ७५ लाख रुपये, हातकणंगले तालुक्यात सहा कोटी ३८ लाख, शिरोळ तालुक्यात १० कोटी ३२ लाख रुपये इतकी मागणी आहे. त्याचबरोबर पुरात मृत झालेल्या शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गाई, बैले यांच्यासाठी दोन कोटी, मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीसाठी चार कोटी, पूरकाळात वापरलेल्या इंधनासह वाहने व बोटींवरील खर्चापाटी एक कोटी नऊ लाख रुपये, पूरबाधित क्षेत्रातील स्वच्छता, दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपये मागणी करण्यात येणार आहे.पुरातील जीवितहानीसाठी मदतीकरिता ५३ लाखांची मागणी आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.शेतीच्या नुकसानीसाठी १२४ कोटीपुरामुळे उसासह विविध शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी निकषानुसार १२३ कोटी ९९ लाखांची मागणी केली जाणार आहे. पुरामुळे पडलेल्या कच्च्या व पक्क्या घरांसह गोठे यासाठी ११० कोटीं, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या इमारतींसह रस्ते, वीज, पोलीस ठाणे, महापालिका यांच्यासाठी १३४ कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे.