शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

गूळ उत्पादनात सव्वाचार लाख रव्यांची घट

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

क्विंटलला तीन हजार दर : गूळ उत्पादक शेतकऱ्यांची गुऱ्हाळघराकडे पाठ; बाजार समितीच्या उत्पन्नालाही फटका

प्रकाश पाटील - कोपार्डे-- गुळाचा प्रारंभीचा सौदा विक्रमी दराने काढल्यानंतर झालेली गुळातील सततची घसरण, अवकाळी पाऊस, अडत वसुलीचा दोलायमान निर्णय, यामुळे या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गूळ उत्पादन करण्यापेक्षा साखर कारखान्यांकडे ऊस पाठविण्यास प्राधान्य दिले. याचा परिणाम या हंगामात गूळ उत्पादनात सव्वाचार लाख गूळ रव्यांची आवक कमी झाल्याचे बाजार समितीतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले. बाजार समितीच्या उत्पन्नालाही यामुळे मोठा फटका बसला आहे.प्रारंभीचा सौदा शासकीय संचालक मंडळाने मोठ्या थाटात ६६६६ रुपये प्रतिक्विंटल काढला. मात्र, यानंतर गूळ दरातील झालेली मोठी घसरण व सतत होणारा गूळ दरातील चढ-उतार यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गूळ उत्पादनाऐवजी साखर कारखान्यांकडे पाठविण्यावर भर दिला. त्यातच साखर कारखान्यांनी या हंगामात ‘एफआरपी’ प्रमाणे दिलेला चांगला दर याचेही गूळ उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविण्याचे मोठे कारण सांगण्यात येत आहे.एवढेच नाही, तर या हंगामात सुरुवातीपासून अवकाळी पावसाने गुऱ्हाळघरांना वारंवार अडथळा आणल्याने गुऱ्हाळघर मालकांना आठ दिवस गुऱ्हाळघरे बंद ठेवावी लागली. गूळ उत्पादक शेतकरी डिसेंबर-जानेवारीमध्ये गुळाचे दर २२०० ते २६०० प्रतिक्विंटलवर आल्यानंतर प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. तब्बल आठ दिवस गुळाच्या एका रव्याचीही आवक तर झाली नाहीच, शिवाय गुऱ्हाळघरे बंद ठेवून उत्पादन खर्चाएवढातरी दर मिळावा, यासाठी एल्गार पुकारला. यानंतर बाजार समिती, व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक होऊन गूळ दरात सुधारणा झाली. यानंतर शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्याचे आदेश पणन संचालक सुभाष माने यांनी काढल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्याविरोधात बंड पुकारले. यातून सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीच्या निर्णयावर स्थगिती दिली, अशी या हंगामात संकटांची आणि अडथळ्यांची मालिकाच गूळ व्यवसायावर निर्माण झाल्याने ‘गोड गुळाला कडू व्यवहारा’ची झालर लागली. याचा परिणाम म्हणजे, या हंगामात आॅक्टोबर २०१४ ते २१ मार्च २०१५ या दरम्यान मागील हंगामापेक्षा तब्बल सव्वाचार लाख गूळ रव्यांची आवक बाजार समितीत कमी झाली आहे.या हंगामात उत्पादन खर्चाएवढाही गुळाला दर मिळाला नाही. सतत दरातील चढ-उतार, शासनाचे गूळ दर व अडत वसुलीचे कचखाऊ धोरण, यामुळे गूळ उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला. जिल्ह्यातील १२०० गुऱ्हाळघरांपैकी संपूर्ण हंगाम पूर्ण करणारे केवळ ३००च गुऱ्हाळघरे आहेत. यावर्षीची गूळ रव्यांची घट पाहता पुढील वर्षीही दर मिळाला नाही, तर गूळ उद्योगच अडचणीत सापडणार आहे. »f                                                             - शिवाजी पाटील, --अध्यक्ष, गूळ उत्पादक संघटना.गुळाचा दर व सतत होणारे सौद्यातील अडथळे, यामुळे नाशवंत गुळाला प्राधान्य देण्यापेक्षा यावर्षी आपण सर्व ऊस साखर कारखान्याला पाठविण्याचा निर्णय घेतला.                                                                                     - शिवाजी पाटील, गूळ उत्पादक, शिंदेवाडी, ता. करवीर.