शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ गावांच्या विकासासाठी डीपीआर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:08 IST

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या ४२ गावांच्या संतुलित विकासाकरिता सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय ...

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या ४२ गावांच्या संतुलित विकासाकरिता सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार होती; परंतु ते बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे मंगळवारी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते. उपमुख्यमंत्री पुन्हा गैरहजर राहिल्याने शेवटी अधिकाऱ्यांच्या पातळीवर ही बैठक मंगळवारी सायंकाळी झाली. बैठकीत अवर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे सचिव गोविंदराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण उपस्थित होते.उपमुख्यमंत्री शिंदे यांची वाट पाहून शेवटी अधिकारी स्तरावर बैठक झाली. या बैठकीत प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ४२ गावांचा सविस्तर विकास आराखडा तयार करायचा आणि त्यासाठी कशा पद्धतीने निधी देता येईल यावर पर्याय द्यायचे ठरले. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून गेल्या सात-आठ वर्षांत गावांचा विकास झालेला नाही तसेच प्राधिकरणाला विकास निधी म्हणून काहीही देण्यात आलेले नाही, याकडे आमदार नरके यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदे