शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

सोमवारपासून सरसकट दुकाने उघडण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 18:07 IST

corona virus Kolhapur : येत्या सोमवारपासून (दि. ५) राजारामपुरी परिसर आणि शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्धार राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत शनिवारी झाला. राजारामपुरीतील जनता बझार चौकात ही कोपरा सभा झाली. दुकाने सुरू केल्यानंतर कारवाई करण्यासाठी येणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी अध्यक्षस्थानी होते.

ठळक मुद्देराजारामपुरी व्यापारी असोसिएशनचा निर्णय कारवाईस जशास तसे उत्तर देण्याची तयारी

कोल्हापूर : येत्या सोमवारपासून (दि. ५) राजारामपुरी परिसर आणि शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्धार राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत शनिवारी झाला. राजारामपुरीतील जनता बझार चौकात ही कोपरा सभा झाली. दुकाने सुरू केल्यानंतर कारवाई करण्यासाठी येणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी अध्यक्षस्थानी होते.गांधी म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. तीन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू, सेवांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्याचा फटका संबंधित दुकानदार, व्यावसायिकांना बसत आहे. आर्थिक समस्या निर्माण झाल्याने दुकानदारांची सहनशीलता संपली आहे. दुकाने बंद असल्याने कामगारांचे पगार, बँकेचे हप्ते, सरकारी कर भरणे व्यापाऱ्यांना अडचणीचे झाले आहे. यामुळे आम्ही चार दिवसांपूर्वी सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता; पण जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार आम्ही दोन दिवस थांबलो. आता कोणाशी चर्चा करणार नाही. सोमवारपासून ९ ते ४ वेळेत सर्व दुकाने उघडतील.

  • रक्षा राऊत म्हणाल्या, गेल्या मार्च महिन्यात नव्याने व्यवसाय सुरू केला; पण लॉकडाऊन झाल्याने प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. कर्मचाऱ्यांना पगार कसे द्यायचे? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे सरकारने सहनशीलतेचा अंत न पाहता दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी.
  • विनोद कटारिया म्हणाले, आता फार दिवस दुकाने बंद ठेवणे दुकानदारांना शक्य नाही. लॉकडाऊनमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
  • माणिक पाटील चुयेकर म्हणाले, दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, ज्यामुळे ग्राहकांची गर्दी होणार नाही.
  • श्याम बासरानी म्हणाले, सरकार दंडुकशाहीचा वापर करत विविध घटकांकडून दंड वसूल करीत आहेत. त्या दंडातील रक्कम बेरोजगारांना भत्ता म्हणून द्यावा.
  • रणजित पारेख म्हणाले, दीर्घकाळ दुकाने बंद राहिल्याने मालाचा साठा खराब होत आहे. दुकानदार अडचणीत आले आहेत. त्यांचे विविध प्रकारचे कर थकले आहेत. बँकांच्या कर्जाचा हप्ता कसा भरायचा, असा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • अनिल पिंजानी यांनी दुकाने सुरू करण्यावर सर्वांनी ठाम राहावे, असे आवाहन केले. 

या वेळी नीतेश जैन, भरत रावत, अमित लोंढे, आयुष हंजे यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर