शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पाच राज्यांतील निकालानंतरच युतीचा निर्णय : पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:22 IST

पाच राज्यांतील निकालानंतरच युतीचा निर्णय : पाटील कोल्हापूर : राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल काय लागतो त्यानंतरच भाजप-शिवसेना ...

पाच राज्यांतील निकालानंतरच युतीचा निर्णय : पाटीलकोल्हापूर : राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल काय लागतो त्यानंतरच भाजप-शिवसेना युतीचा निर्णय होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.कर्नाटक पोटनिवडणूक निकालाची दखल घेवून युतीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत का, असे विचारल्यावर पाटील म्हणाले, पोटनिवडणुकीवरून नव्हे तर पाच राज्यांतील निकालानंतर या घडामोडींना वेग येईल. लोकसभा आणि विधानसभेचे जागावाटप एकाच वेळी व्हावे, अशीच दोन्ही पक्षांची इच्छा आहे. या दोन्ही निवडणुकीत ज्या पक्षाचे विद्यमान खासदार-आमदार आहेत त्या जागा त्यांच्याकडेच राहतील. त्यामुळे लोकसभेला केवळ सहा जागांसाठीचे वाटप असल्याने त्यामध्ये फारसे मतभेद नाहीत. मात्र विधानसभेचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विधानसभेच्या भाजपाकडे १२३, शिवसेनेकडे ६३ व अपक्ष ७ अशा १९३ जागांचे वाटप निश्चित आहे. उर्वरित ९५ जागांसाठीचे वाटप हा कळीचा मुद्दा आहे. दोन्ही निवडणुकींचे जागावाटप एकाचवेळी करा असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाबद्दल थेट मागणी पुढे आली नसल्याचे त्यांनी सांगितले.औंरगाबाद, उस्मानाबादचे नामांतर व्हावेज्यांंनी आपल्यावर सत्ता गाजविली त्या परकीयांच्या खुणा पुसल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर व्हावे, अशी सरकारचीही इच्छा आहे. याची पुढची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू, असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील