शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

एक लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:09 IST

महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देयाद्या वर्गीकरणाचे काम अंतिम टप्यात आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे शक्य

कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत.जूलै-आॅगस्ट महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व महापूराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये तीन लाख सात हजार शेतकऱ्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाले.

एक हेक्टरच्या आतील पूरबाधित शेतकऱ्यांना सरकारकडून मदत देण्याची घोषणा करण्यात आली. कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी (प्रतिगुंठा ९५० रुपयांप्रमाणे) केली जाणार असून, ज्यांनी कर्ज घेतलेले नाही, त्यांना प्रतिगुंठा ४०५ रुपये भरपाई मिळणार आहे. यासाठी राज्य आपत्ती निवारण मदतनिधीतून ६३० कोटी २० लाख, तर केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत.पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या याद्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

कर्जदार आणि बिगर कर्जदारांच्या याद्या वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, साधारणत: आठ दिवसांत कर्जमाफीचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा करायचे, असे प्रयत्न सरकार यंत्रणेकडून सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे मदतीच्या कामाला काहीसा ब्रेक लागला होता; पण आता या कामाला थोडी गती आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्जाचा पुरवठा जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून होतो. त्यामुळे कर्जमाफीमध्ये सर्वाधिक लाभार्थी हे जिल्हा बॅँकेचे असून, सुमारे ९२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रयीकृत बॅँकांच्या आठ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.सर्वाधिक नुकसान ऊस उत्पादकांचेमहापुराचा सर्वाधिक फटका हा ऊस उत्पादकांना बसला असून, ६१ हजार ९९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भाताचे आठ हजार ४६६, तर २६७२ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडे पाठविली जाईल, त्यानंतर पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर