शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
3
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
4
ट्रेन सुटली तरीही वेस्ट जत नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
5
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
6
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
7
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
8
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
9
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
10
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
11
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
12
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
13
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
14
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
15
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
16
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
17
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
18
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
19
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
20
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!

एक लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:09 IST

महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देयाद्या वर्गीकरणाचे काम अंतिम टप्यात आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे शक्य

कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत.जूलै-आॅगस्ट महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व महापूराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये तीन लाख सात हजार शेतकऱ्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाले.

एक हेक्टरच्या आतील पूरबाधित शेतकऱ्यांना सरकारकडून मदत देण्याची घोषणा करण्यात आली. कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी (प्रतिगुंठा ९५० रुपयांप्रमाणे) केली जाणार असून, ज्यांनी कर्ज घेतलेले नाही, त्यांना प्रतिगुंठा ४०५ रुपये भरपाई मिळणार आहे. यासाठी राज्य आपत्ती निवारण मदतनिधीतून ६३० कोटी २० लाख, तर केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत.पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या याद्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

कर्जदार आणि बिगर कर्जदारांच्या याद्या वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, साधारणत: आठ दिवसांत कर्जमाफीचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा करायचे, असे प्रयत्न सरकार यंत्रणेकडून सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे मदतीच्या कामाला काहीसा ब्रेक लागला होता; पण आता या कामाला थोडी गती आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्जाचा पुरवठा जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून होतो. त्यामुळे कर्जमाफीमध्ये सर्वाधिक लाभार्थी हे जिल्हा बॅँकेचे असून, सुमारे ९२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रयीकृत बॅँकांच्या आठ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.सर्वाधिक नुकसान ऊस उत्पादकांचेमहापुराचा सर्वाधिक फटका हा ऊस उत्पादकांना बसला असून, ६१ हजार ९९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भाताचे आठ हजार ४६६, तर २६७२ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडे पाठविली जाईल, त्यानंतर पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर