शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:09 IST

महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देयाद्या वर्गीकरणाचे काम अंतिम टप्यात आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे शक्य

कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत.जूलै-आॅगस्ट महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व महापूराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये तीन लाख सात हजार शेतकऱ्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाले.

एक हेक्टरच्या आतील पूरबाधित शेतकऱ्यांना सरकारकडून मदत देण्याची घोषणा करण्यात आली. कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी (प्रतिगुंठा ९५० रुपयांप्रमाणे) केली जाणार असून, ज्यांनी कर्ज घेतलेले नाही, त्यांना प्रतिगुंठा ४०५ रुपये भरपाई मिळणार आहे. यासाठी राज्य आपत्ती निवारण मदतनिधीतून ६३० कोटी २० लाख, तर केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत.पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या याद्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

कर्जदार आणि बिगर कर्जदारांच्या याद्या वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, साधारणत: आठ दिवसांत कर्जमाफीचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा करायचे, असे प्रयत्न सरकार यंत्रणेकडून सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे मदतीच्या कामाला काहीसा ब्रेक लागला होता; पण आता या कामाला थोडी गती आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्जाचा पुरवठा जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून होतो. त्यामुळे कर्जमाफीमध्ये सर्वाधिक लाभार्थी हे जिल्हा बॅँकेचे असून, सुमारे ९२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रयीकृत बॅँकांच्या आठ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.सर्वाधिक नुकसान ऊस उत्पादकांचेमहापुराचा सर्वाधिक फटका हा ऊस उत्पादकांना बसला असून, ६१ हजार ९९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भाताचे आठ हजार ४६६, तर २६७२ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडे पाठविली जाईल, त्यानंतर पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर