शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कर्जमाफीने शेतकºयांचा सातबारा कोरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:44 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत व जिल्हाधिकाºयांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांना गुलाबपुष्प देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.मंत्री खोत म्हणाले, महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असून हे शेतकरी नव्याने कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत. कजर्माफीमुळे त्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे. शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करून त्यांना अधिक सक्षम, सधन करण्यासाठी शासन अनेक नवनवीन योजना राबवत आहेत याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये तन्वी संतोष शिवणे (प्रथम), पर्वणी चतुर्धन नीळकंठ (द्वितीय), सौजन्या युवराज चव्हाण (द्वितीय), सृष्टी विद्यासागर होनमाने (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शाळा परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये वर्धन धनाजी माळी, नरेंद्र संजय दाभोळकर, श्वेता सदानंद बाळेकुंद्री, प्रथमेश राजीव जरग, प्रथमेश मलकारे आरगे, पार्थ कृष्णात पाटील, केतन कृष्णात संकपाळ, आर्षद मुबारक नाकाडे, आर्या राजाराम तळप, समृद्धी मनोज कुलकर्णी, संचिता सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाºया डॉ. भारती अभ्यंकर आणि डॉ. लीला सुनील महापुरे यांचा, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत उत्कृष्ट काम करणाºया अमित दळवी, राजू सूर्यवंशी, पॉवर फॉर पीपल्स फाऊंडेशन (गारगोटी), इचलकरंजी नगरपालिका, धनंजय नामदेव सावंत यांचा सत्कार करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.जिल्ह्यातील २१६ पाणंद रस्ते झाले मोकळेसातबारा संगणकीकरणाची मोहिमेत जिल्हा आघाडीवर असून ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून ३ लाख ६९ हजार ५२ दाखले वितरित करण्यात आले तर जवळपास २४० किलोमीटर लांबीचे २१६ अतिक्रमित पाणंद, शिवार रस्ते गेल्या वर्षभरात मोकळे केले आहेत. त्याचा ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्णात रस्ते सुधारणा, रूंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना प्राधान्य दिले आहे, असे खोत यांनी सांगितले.२९, ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियानगेल्या तीन वर्षांत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनेमध्येही भरघोस निधी प्राप्त होत मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून २९ व ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खोत यांनी केले.‘जलयुक्त’मधून ९ हजार टीसीएम पाणीजिल्ह्णात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत ५२ कोटी रुपये खर्च करून १ हजार ६८८ कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यातून सुमारे ९ हजार टीसीएमपेक्षा जास्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे खोत यांनी सांगितले.