शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

कर्जमाफीवरून शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शंखध्वनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 17:24 IST

राज्य सरकारच्या कर्जमाफी मधील तांत्रीक दोषांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा निषेध करत शिवसेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शंखध्वनी केला. सॉफ्टवेअर मध्ये बदल करून या शेतकºयांना न्याय दिला नाहीतर सहकार मंत्र्याच्या कोल्हापूर जिल्हा दौºयावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

ठळक मुद्देसव्वा लाख शेतकरी वचिंत राहिल्याने आक्रमक सहकार मंत्र्यांना काळे झेंडे दाखविणारजिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद करून घोषणा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा

कोल्हापूर, 4 : राज्य सरकारच्या कर्जमाफी मधील तांत्रीक दोषांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा निषेध करत शिवसेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शंखध्वनी केला. सॉफ्टवेअर मध्ये बदल करून या शेतकºयांना न्याय दिला नाहीतर सहकार मंत्र्याच्या कोल्हापूर जिल्हा दौºयावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखापर्यंत तर प्रामाणिकपणे परतफेड करणाºया शेतकºयांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी संबधित शेतकºयाने २०१५-१६ च्या कर्जाबरोबरच २०१६-१७ मधील कर्जाची जुलै २०१७ अखेर परतफेड करणे बंधनकारक आहे. ही बाब अन्यायकारक असून २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेडीची मुदत जुन २०१८ पर्यंत आहे. मुदतीपुर्वी कर्ज भरण्याची सक्ती सरकार कशासाठी करते, या सरकारला प्रामाणिकपणे कर्जमाफीची रक्कम द्यायची नाही, त्यामुळेच शेतकºयांना वंचित ठेवण्याचा मार्ग सरकार शोधत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटीचा पेच आहे. नाबार्ड व सहकार विभागाच्या आदेशानुसार अपात्र रक्कमेची २०१२ मध्ये पुर्नगठन झाले. त्यातील शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ न देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. नैसर्गिक न्याय तत्वानुसार या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. ही आमची मागणी असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.

याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माहिती दिली पण सॉफ्टवेअर मध्ये बदल करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमच्या दृष्टीने सॉफ्टवेअर महत्वाचे नाहीतर शेतकरी महत्वाचा असल्याने योग्य ती दुरूस्ती करून पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी मुरलीधर जाधव यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद करून, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विरोधातील घोषणा व शंखध्वनी करत शिवसेनेने परिसर दणाणून सोडला. यावेळी सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, मधूकर पाटील, नामदेव गिरी, संभाजी भोकरे, सुनिल शिंत्रे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, संदीप पाटील, राजू यादव, विराज पाटील, दत्ता पोवार, कृष्णात पोवार, बाबासाहेब पाटील, शशीकांत बिडकर, मेघना पेडणेकर, दिपाली शिंदे आदी उपस्थित होते.