शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कर्जमाफीवरून शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शंखध्वनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 17:24 IST

राज्य सरकारच्या कर्जमाफी मधील तांत्रीक दोषांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा निषेध करत शिवसेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शंखध्वनी केला. सॉफ्टवेअर मध्ये बदल करून या शेतकºयांना न्याय दिला नाहीतर सहकार मंत्र्याच्या कोल्हापूर जिल्हा दौºयावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

ठळक मुद्देसव्वा लाख शेतकरी वचिंत राहिल्याने आक्रमक सहकार मंत्र्यांना काळे झेंडे दाखविणारजिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद करून घोषणा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा

कोल्हापूर, 4 : राज्य सरकारच्या कर्जमाफी मधील तांत्रीक दोषांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा निषेध करत शिवसेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शंखध्वनी केला. सॉफ्टवेअर मध्ये बदल करून या शेतकºयांना न्याय दिला नाहीतर सहकार मंत्र्याच्या कोल्हापूर जिल्हा दौºयावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखापर्यंत तर प्रामाणिकपणे परतफेड करणाºया शेतकºयांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी संबधित शेतकºयाने २०१५-१६ च्या कर्जाबरोबरच २०१६-१७ मधील कर्जाची जुलै २०१७ अखेर परतफेड करणे बंधनकारक आहे. ही बाब अन्यायकारक असून २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेडीची मुदत जुन २०१८ पर्यंत आहे. मुदतीपुर्वी कर्ज भरण्याची सक्ती सरकार कशासाठी करते, या सरकारला प्रामाणिकपणे कर्जमाफीची रक्कम द्यायची नाही, त्यामुळेच शेतकºयांना वंचित ठेवण्याचा मार्ग सरकार शोधत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटीचा पेच आहे. नाबार्ड व सहकार विभागाच्या आदेशानुसार अपात्र रक्कमेची २०१२ मध्ये पुर्नगठन झाले. त्यातील शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ न देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. नैसर्गिक न्याय तत्वानुसार या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. ही आमची मागणी असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.

याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माहिती दिली पण सॉफ्टवेअर मध्ये बदल करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमच्या दृष्टीने सॉफ्टवेअर महत्वाचे नाहीतर शेतकरी महत्वाचा असल्याने योग्य ती दुरूस्ती करून पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी मुरलीधर जाधव यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद करून, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विरोधातील घोषणा व शंखध्वनी करत शिवसेनेने परिसर दणाणून सोडला. यावेळी सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, मधूकर पाटील, नामदेव गिरी, संभाजी भोकरे, सुनिल शिंत्रे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, संदीप पाटील, राजू यादव, विराज पाटील, दत्ता पोवार, कृष्णात पोवार, बाबासाहेब पाटील, शशीकांत बिडकर, मेघना पेडणेकर, दिपाली शिंदे आदी उपस्थित होते.