शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कर्जमाफीची रक्कम शनिवारपासून खात्यावर : जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:21 IST

जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार सहकार विभागाने ठरवलेल्या नियोजनानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतक-यांना कर्जमाफीची रक्कम खात्यावर मिळणार होती. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये याद्या अपलोड करून त्या प्रसिद्धीस दिल्यावर हरकती घेतल्या जाणार होत्या

ठळक मुद्देजिल्ह्यात ५७ हजार शेतकरी दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्जदार आहेत. त्यांच्यासाठी ३०९ कोटी रुपयांची रक्कम अपेक्षित आहे. ५७ पैकी ३२ हजार हे एकट्या जिल्हा बँकेचे आहेत. त्यांना १७० कोटींचा लाभ होणार आहे.

कोल्हापूर: राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उद्या, शनिवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा करण्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घोषित केल्यानंतर एकच धावपळ उडाली आहे. सहकार विभागाने याद्या अपलोडिंगचे काम वेगाने हाती घेतले आहे. या कर्जमाफीत दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असून यात जिल्ह्यातील ५७ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार सहकार विभागाने ठरवलेल्या नियोजनानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांना कर्जमाफीची रक्कम खात्यावर मिळणार होती. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये याद्या अपलोड करून त्या प्रसिद्धीस दिल्यावर हरकती घेतल्या जाणार होत्या. ही सर्व प्रक्रिया मार्चमध्ये पूर्ण होणार होती. तथापि गुरुवारी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी १ फेब्रुवारीपासून रक्कम खात्यावर जमा करण्याचे आदेश दिल्याने सहकार विभागात एकच धावपळ सुरू झाली. सर्व यंत्रणा कामाला लावून दिवसभर याद्या बनवण्याचे काम सुरू होते. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे हे मुंबईला गेले असल्याने विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सर्व काम हाती घेतले. १९०१ सेवा सोसायट्याकडील कर्जखात्यांची लेखापरीक्षकांकडून तपासणी गुरुवारी पूर्ण करण्यात आली.त्यासाठी ६९ लेखापरीक्षकांनी १ एप्रिल २0१५ ते सप्टेंबर २0१९ अखेर वाटप झालेल्या कर्जखात्यांचा अहवाल तयार करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली.

गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत अंतिम करून त्या वेबसाईटवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज, शुक्रवारी अपलोड झाल्यानंतर त्या कुणालाही पाहता येणार आहेत. मंत्र्यांच्या आदेशानुसार एक फेब्रुवारीला प्रातिनिधिक स्वरूपात रक्कम जमा करून उर्वरित खात्यांची पडताळणी व शहानिशा करूनच रक्कम थकीत कर्जदार शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन दिसत आहे.

या योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्जपरतफेड करणारे व पुनर्गठित शेतकरी यांत धरलेले नाहीत. त्यांचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त उपसमिती घेणार आहे. याचाही निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याने त्याच्या याद्या बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.जिल्ह्यात ५७ हजार शेतकरी दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्जदार आहेत. त्यांच्यासाठी ३०९ कोटी रुपयांची रक्कम अपेक्षित आहे. ५७ पैकी ३२ हजार हे एकट्या जिल्हा बँकेचे आहेत. त्यांना १७० कोटींचा लाभ होणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfundsनिधीbankबँकMONEYपैसा