शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर जिल्ह्यात बिबटे, गव्यांसह हत्तींची दहशत : वनविभागाकडून तुटपुंजी भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:59 IST

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील डोंगर-कपारीत राहणाºया नागरिकांना जंगली गव्याच्या त्रासाबरोबर आता बिबट्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरकपारीत राहणारे शेतकरी, नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. आतापर्यंत १0 ते १५ शेतकºयांच्या शेळी, मेंढीच्या कळपात बिबट्याने हल्ला करून शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार ...

ठळक मुद्देपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यासह शेळी-मेंढीच्या कळपांवर हल्ले

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील डोंगर-कपारीत राहणाºया नागरिकांना जंगली गव्याच्या त्रासाबरोबर आता बिबट्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरकपारीत राहणारे शेतकरी, नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. आतापर्यंत १0 ते १५ शेतकºयांच्या शेळी, मेंढीच्या कळपात बिबट्याने हल्ला करून शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकरी विचारत आह.तालुक्यात वनविभागाचे जंगल क्षेत्र व जंगलव्याप्त परिसर मोठ्या प्रमाणात आहे. शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीला लागून चांदोली अभयारण्य आहे. तर विशाळगड, उदागिरी, अणुस्कुरा, बर्की ही जंगले घनदाट आहेत. त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्याला लागूनच कोकणातील तालुक्यातील जंगलाची हद्द आहे. तालुक्यातील गावागावांतील जंगलांमध्ये गव्यांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे जंगलाशेजारी असणाºया शेतीचे गव्यांकडून मोठे नुकसान केले जात आहे. शेतकºयांना रात्रभर जागून आपल्या पिकांची राखण करावी लागते. त्यामुळेच पिकांचे संरक्षण होत आहे.राधानगरी तालुक्यातील हत्तींचा प्रवेश रोखण्याची मागणीआमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यात टस्कर हत्तीच्या आगमनामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या उपाययोजना तोकड्या ठरत असल्यामुळे तोरस्करवाडी गावात हत्तीने प्रवेश केला आहे. परिणामी, वनविभागाने राधानगरी तालुक्यातील हत्तींचा प्रवेश रोखावा, अशी मागणी होत आहे.दाजीपूर परिसरातील गवे, प्राणी कळपाने चारा आणि पाणी शोधण्यासाठी गुडाळ, सावर्धन, काळम्मावाडी परिसरातील गावात येतात. शेतीमधील पिके फस्त करतात. सावर्धन परिसरात शेतकरी आपल्या पिकांची राखण दिवस-रात्र करीत आहेत. अनेकवेळा गवे, प्राण्यांनी शेतकºयांवर हल्ले केले आहेत. तसेच पिकांचे नुकसान तर होतेच शिवाय भीतीदायक वातावरणात वावरावे लागत आहे.चार महिन्यांपूर्वी टस्कर हत्ती राधानगरी परिसरात आला होता. कर्नाटक, चंदगड, आजरा मार्गे आलेला हत्ती हुसकावून लावताना वनविभागाच्या कर्मचाºयांना नाकीनऊ झाले. हत्ती, गवे यांचे मानवी वस्तीत प्रवेश करण्याचे प्रमाण वाढत आहे. जंगलातील प्राणी आपला अधिवास सोडून दूर अंतरावर चारा, पाणी शोधण्यासाठी येतात, तर काही प्राणी मानवावर हल्ले करतात. ही समस्या राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच आता राधानगरी तालुक्यात हत्तीने प्रवेश केल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

1 गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट निर्माण झाले आहे. या तीन महिन्यांत वाकोली, निनाईपरळे, वारूळ, आळतूर, लोळाणे, पुसाळे धनगरवाडा, आळतूर धनगरवाडा, चांदोली धनगरवाडा या गावांमधील वाड्या-वस्त्यांवर बिबट्याने थैमान घातले आहे.2 जवळपास लोळाणे, वारूळ, आळतूर गावांतील शेतकºयांच्या घरात घुसून शेळ्या मारल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलात शेतकरी जनावरे व शेळ्या घेऊन जात आहेत. शेळ्यांच्या कळपावर बिबट्या दिवसादेखील हल्ला करीत आहे. त्यामुळे डोंगरात शेतकरी शेळ्या, जनावरे घेऊन जाण्यास घाबरत आहेत.3 जंगलाशेजारी असणाºया शेतीची राखण करण्यासाठी शेतकरी वस्तीवर जात नाहीत. त्यामुळे जंगली गव्याने शेतीचे नुकसान केले आहे. नदीकाठी असणाºया शेतीला गव्यांचा त्रास होत आहे. पीक हातातोंडाला यायला लागले की, जंगली श्वापदांचा त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या वनविभागाकडून तुटपुंजी रक्कम मिळते. सांगा आम्ही जगायचे कसे?, असा सवाल शेतकºयांमधून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल