शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दादागिरी केल्यास पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही; भाजप उमेदवार सत्यजित कदमांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:31 IST

गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत.

कोल्हापूर : मी बोलणारा नव्हे, तर काम करून दाखविणारा कार्यकर्ता आहे. परंतु, ‘कोल्हापूर उत्तर’च्या निवडणुकीत आमच्या सभेला, प्रचाराला आलेल्या लोकांना फोन करून दादागिरी करणे सुरू आहे. असा प्रयत्न पुन्हा झाल्यास पायताणाने हाणल्याशिवाय मी सोडणार नाही, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी गुरुवारी शिवाजी पेठेतील सभेत केले. त्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यावर त्याबद्दल समाजातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कोल्हापूरची ही राजकीय संस्कृती नाही असे सांगतानाच ही निवडणूक कोणत्या थराला जाईल, अशी भीतीही लोकांनी व्यक्त केली.

भाजपचे राज्य प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण ताजे असतानाच कदम यांच्या वक्तव्याची त्यात भर पडली. शहराच्या विकासाचा अजेंडा, राजकीय टीकाटिप्पणी करण्यापेक्षा अरेतुरेची भाषा, शिवीगाळ, अश्लाघ्य भाषेतील टीका सुरू असल्याने या निवडणुकीस वेगळेच वळण लावले जात आहे. सामाजिक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न पद्धतशीर सुरू आहेत.

या सभेत बोलताना उमेदवार सत्यजित कदम म्हणाले, कालच कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यांनी मला बिनशर्त पाठिंबा दिला. कोल्हापूर हे हिंदुत्ववादी विचारांचेच शहर असल्याचे प्रत्त्यंतर यापूर्वी आले आहे. आतापर्यंत फक्त दोनवेळा काँग्रेसचा विजय झाला आहे. सलग तीस वर्षे हिंदुत्ववादी विचाराचा उमेदवार निवडून आला आहे.

गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत. मी केव्हा जास्त आक्रमक बोलत नाही; परंतु आता बोलावे लागत आहे. आमच्या प्रचाराला, सभेला गेला म्हणून दादागिरी केल्यास मी त्याला पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही. मला निवडून दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचे सर्व प्रश्न सोडवीन असे कदम यांनी सांगितले.

उमेदवार कदम यांच्याआधी भाषणे केलेल्या प्रा. जयंत पाटील व सुनील कदम यांनीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मी महापौर असताना हा तिसऱ्या फळीत उभा होता, त्याच्या सगळ्या कुंडल्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे सुनील कदम यांनी सांगितले.

बावडेकरांचे पाप

विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मालोजीराजे यांना पाडण्याचे पाप बावडेकरांनी केल्याची टीका सत्यजित कदम यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपा