शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

दादागिरी केल्यास पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही; भाजप उमेदवार सत्यजित कदमांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:31 IST

गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत.

कोल्हापूर : मी बोलणारा नव्हे, तर काम करून दाखविणारा कार्यकर्ता आहे. परंतु, ‘कोल्हापूर उत्तर’च्या निवडणुकीत आमच्या सभेला, प्रचाराला आलेल्या लोकांना फोन करून दादागिरी करणे सुरू आहे. असा प्रयत्न पुन्हा झाल्यास पायताणाने हाणल्याशिवाय मी सोडणार नाही, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी गुरुवारी शिवाजी पेठेतील सभेत केले. त्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यावर त्याबद्दल समाजातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कोल्हापूरची ही राजकीय संस्कृती नाही असे सांगतानाच ही निवडणूक कोणत्या थराला जाईल, अशी भीतीही लोकांनी व्यक्त केली.

भाजपचे राज्य प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण ताजे असतानाच कदम यांच्या वक्तव्याची त्यात भर पडली. शहराच्या विकासाचा अजेंडा, राजकीय टीकाटिप्पणी करण्यापेक्षा अरेतुरेची भाषा, शिवीगाळ, अश्लाघ्य भाषेतील टीका सुरू असल्याने या निवडणुकीस वेगळेच वळण लावले जात आहे. सामाजिक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न पद्धतशीर सुरू आहेत.

या सभेत बोलताना उमेदवार सत्यजित कदम म्हणाले, कालच कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यांनी मला बिनशर्त पाठिंबा दिला. कोल्हापूर हे हिंदुत्ववादी विचारांचेच शहर असल्याचे प्रत्त्यंतर यापूर्वी आले आहे. आतापर्यंत फक्त दोनवेळा काँग्रेसचा विजय झाला आहे. सलग तीस वर्षे हिंदुत्ववादी विचाराचा उमेदवार निवडून आला आहे.

गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत. मी केव्हा जास्त आक्रमक बोलत नाही; परंतु आता बोलावे लागत आहे. आमच्या प्रचाराला, सभेला गेला म्हणून दादागिरी केल्यास मी त्याला पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही. मला निवडून दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचे सर्व प्रश्न सोडवीन असे कदम यांनी सांगितले.

उमेदवार कदम यांच्याआधी भाषणे केलेल्या प्रा. जयंत पाटील व सुनील कदम यांनीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मी महापौर असताना हा तिसऱ्या फळीत उभा होता, त्याच्या सगळ्या कुंडल्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे सुनील कदम यांनी सांगितले.

बावडेकरांचे पाप

विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मालोजीराजे यांना पाडण्याचे पाप बावडेकरांनी केल्याची टीका सत्यजित कदम यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपा