शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दादा, कर्ज थकीत संस्थांवर कारवाई कधी?

By admin | Updated: January 11, 2016 00:39 IST

जिल्हा बँकेचे थकबाकीदार : जिल्ह्यातील ३३ संस्था; मालमत्ता असूनही वसुली नाही; सहकारमंत्र्यांच्या कारवाईकडे लक्ष

प्रकाश पाटील -- कोपार्डे -अपुऱ्या व विनातारण कर्ज देऊन जिल्हा बँकेच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याबद्दल ४५ माजी संचालकांचे प्रकरण गाजत आहे; मात्र ज्या ६५ संस्थांना या संचालकांकडून कर्ज वाटप झाले, त्या संस्थांच्या मिळकती असतानाही कर्ज वसुलीची ठोस कारवाई का होत नाही, असा प्रश्न आहे. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना, ‘दादा, थकीत कर्जदार संस्थांवर कारवाई कधी’, असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्हा बँकेने जिल्ह्यातील ६५ संस्थांना अपुऱ्या व विनातारण कर्ज वाटपप्रकरणी बँकेच्या ४५ माजी संचालकांसह कार्यकारी संचालक दीपक चव्हाण व इतर तीन अशा ४९ जणांवर ११७ कोटी ६८ लाख २४ हजार ४५० रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. याबाबत सुनावणी होऊन चौकशी अधिकारी जिल्हा उपनिबंधक धनंजय डोईफोडे यांनी १ एप्रिल २०१० मध्ये बँकेमार्फत २००३ ते २००७ या काळात ६५ संस्थांना सुमारे २६५ कोटींचे कर्ज अपुऱ्या व काहींना विनातारण दिल्याचे स्पष्ट केले. त्यावर तक्रारी झाल्यानंतर विभागीय सहनिबंधक डॉ. ए. बी. जोगदंड यांनी २२ जून २००७ मध्ये सहकार कायदा कलम ८८ अन्वये बँकेच्या व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीमध्ये उपनिबंधक डोईफोडे यांना ६५ संस्थांपैकी ३३ संस्थांना विनातारण, १७ संस्थांना अपुऱ्या तारणावर, तर १५ संस्थांना नियमबाह्य कर्ज देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे बँकेच्या ५८ तत्कालीन व माजी संचालकांसह ३७ अधिकारी, कर्मचारी अशा ९५ जणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. मात्र, कारवाईची भाषाच होताना दिसते. जबाबदार संचालकांना निवडणूक लढविता येणार नाही, असा कायदा करण्यात आला; पण पळवाटा शोधत बहुतांश दोषी संचालक जिल्हा बँकेत आहेत. खुद्द अध्यक्ष आ. मुश्रीफ यांना दोषी ठरवत जिल्हा बँकेच्या नुकसानीला जबाबदार धरले आहे. विनातरण कर्ज दिलेल्या संस्था व त्यांचे थकीत कर्ज पुढीलप्रमाणे - १) तंबाखू संघ - १२ कोटी ५९ लाख, २) कागल तालुका संघ - २१ लाख तीन हजार, ३) के. पी. पाटील रवा - मैदा संघ - १७ लाख ८३ हजार, ४) उदयसिंह गायकवाड तोडणी संस्था - १४ कोटी ५१ लाख, ५) महालक्ष्मी दूध संघ - ३ कोटी ३ लाख ९५ हजार, ६) शाहू नागरी पतसंस्था - १५ लाख ९ हजार, ७) कोल्हापूर सहकारी खरेदी-विक्री संघ - ६३ लाख ४२ हजार, ८) कोल्हापूर वाहनधारक पतसंस्था - १ कोटी ५२ लाख, ९) गहिनीनाथ वाहनधारक पतसंस्था - २ कोटी ७ लाख ५९ हजार, १०) शाहू वाहनधारक पतसंस्था - २ कोटी ५२ लाख ७७ हजार, ११) यशवंतराव चव्हाण वाहनधारक पतसंस्था - ७९ लाख ६१ हजार, १२) कोल्हापूर जिल्हा वाहनधारक पतसंस्था - १ कोटी ४५ लाख ५४ हजार, १३) आजरा ऊसतोडणी संस्था - ३ कोटी २१ लाख, १४) विजयमाला ऊसतोडणी संस्था - ६ कोटी १५ लाख, १५) राधानगरी स्टार्च कारखाना - २० कोटी ६४ लाख, १६) डेक्कन स्पिनिंग मिल - ९ कोटी ६ लाख, १७) मयूर वाहतूक संस्था - १ कोटी ३५ लाख, १८) महाराष्ट्र टोबॅको फेडरेशन - २ कोटी ३४ लाख, १९) राधानगरी भाजीपाला संघ - २३ लाख ७५ हजार, २०) पश्चिम भुदरगड पतसंस्था - १ कोटी २५ लाख ७३ हजार, २१) गहिनीनाथ पतसंस्था - ४२ लाख २५ हजार, २२) कागल पतसंस्था - ४० लाख ४५ हजार, २३) राजीव गांधी पतसंस्था - २९ लाख ९२ हजार, २४) नवहिंद पतसंस्था - ९९ लाख ४९ हजार, २५) इंदिरा पतसंस्था - ३ कोटी ३ लाख ५५ हजार, २६) जिल्हा अर्बन सोसायटी - ५२ लाख ४ हजार, २७) नूतन नागरी पतसंस्था - ७४ लाख २० हजार, २८) आयको इंडस्ट्रिज - ४ कोटी ५१ लाख, २९) वीर सावरकर भाजीपाला संघ - २ कोटी ५८ लाख, ३०) भोगावती कुक्कुटपालन संस्था - १ कोटी ३८ लाख, ३१) रवी बँक - १ कोटी २८ लाख ३३ हजार, ३२) एस. के. पाटील बँक - ८९ लाख ६७ हजार, ३३) साने गुरुजी शिक्षक सेवक पतसंस्था - ६६ लाख, ३४) स्वामी विवेकानंद शिक्षण सेवक पतसंस्था - ३ कोटी ६३ लाख, ३५) दौलत साखर कामगार पतसंस्था - २ कोटी ९ लाख, ३६) भोगावती साखर कामगार मंडळ - ३ कोटी १३ लाख, ३७) चंदगड तालुका पंचायत समिती सेवक पतसंस्था - ६२ लाख ६५ हजार, ३८) संजयसिंह पतसंस्था - ११ लाख ३४ हजार, ३९) चंदगड तालुका शिक्षक पतसंस्था - १ कोटी ६० लाख, ४०) महाराष्ट्र राज्य परिवहन सेवक पतसंस्था - ३२ लाख ९७ हजार.जर शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही, तर त्यांच्यावर १०१ प्रकरण करून १८ नंबरची नोटीस देऊन जप्ती केली जाते. मग संचालक व संस्थांवर कारवाई करण्यास विलंब का? सहकारमंत्र्यांनी लुटुपुटुची लढाई करण्यापेक्षा ठोस निर्णय घ्यावेत. - विठ्ठल पाटील, पाटपन्हाळा, शेतकरी संघटनामालमत्ता असूनही कारवाई नाहीज्या संचालकांच्या काळात जिल्हा बँकेत गैरव्यहार झाले आहेत, त्यांच्यावर यापूर्वीही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. आता तर त्यांना तब्बल दहा वर्षांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आहे. हे स्वागतार्ह आहे. मात्र, ज्या संस्थांना असे नियमबाह्य कर्ज देण्यात आले आहे, त्यांच्या मालमत्ता असताना त्याबाबत कारवाईचे कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. थकीत संस्थांच्या मिळकती असताना वसुली नाही. ६५ संस्थांवर २००३ ते २००७ च्या काळात २६५ कोटी कर्जाची खैरातविनातारण कर्ज दिलेल्यांत ३३ संस्थांचा समावेश