शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवर चालणार हातपंप, दिव्यागांसाठीचा ‘थर्ड आय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 10:47 IST

सायकलवर चालणारा हातपंप आणि ठिंबक सिंचन व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींसाठीचा ‘थर्ड आय’, गव्हाच्या पिठापासून बनविलेला चमचा, अपघात रोखणारी स्मार्ट स्ट्रीट लाईट, आदी स्वरूपातील संशोधनाचा ‘आविष्कार’ शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना बुधवारी पाहायला मिळाला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात संशोधनाचा ‘आविष्कार’ कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग

कोल्हापूर : सायकलवर चालणारा हातपंप आणि ठिंबक सिंचन व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींसाठीचा ‘थर्ड आय’, गव्हाच्या पिठापासून बनविलेला चमचा, अपघात रोखणारी स्मार्ट स्ट्रीट लाईट, आदी स्वरूपातील संशोधनाचा ‘आविष्कार’ शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना बुधवारी पाहायला मिळाला.शिवाजी विद्यापीठस्तरावरील ‘आविष्कार’ हा संशोधन महोत्सव विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, मध्यवर्ती आविष्कार संशोधन महोत्सवाचे समन्वयक डॉ. एस. बी. महाडिक, डॉ. एस. बी. सादळे, आदी उपस्थित होते.

या महोत्सवात कोरगावच्या डी. पी. भोसले कॉलेजच्या अंकिता जाधव, प्रियांका यादव, शुभम लवळे यांनी टाकाऊ साहित्याच्या वापरातून साकारलेल्या सायकलवर चालणारा हातपंप आणि ठिंबक सिंचन व्यवस्थेचा प्रकल्प मांडला. रामानंदनगर-बुर्ली (ता. पलूस) येथील ए. एस. सी. कॉलेजच्या सत्यम तिरमारे याने अपघात रोखणाऱ्या ‘स्मार्ट स्ट्रीट लाईट’चे संशोधन सादर केले.

विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्सच्या रोहित पाटील आणि सूरज कुंभार यांनी दिव्यांगांसाठीचा ‘थर्ड आय’ हा मोबाईल अ‍ॅपशी जोडण्यात आलेला चष्मा सादर केला. वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेजमधील पूजा माळी हिने प्लास्टिक चमच्याला पर्याय म्हणून गव्हाच्या पिठापासून बनविलेला चमचा सादर केला.

महागाव येथील एस.जी.एम. कॉलेजच्या महेश अंगज, स्वप्नाली घोरपडे यांनी शेतीमध्ये सौरऊर्जा निर्मितीबाबतचे संशोधन मांडले. विविध संशोधन प्रकल्पांसह भित्तीपत्रके मांडली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा पिशवी खोऱ्यातील जलयुक्त शिवार योजनेचा सूक्ष्म अभ्यास, सोशल मीडियाचा वापर, महिला सक्षमीकरण, आदींबाबतच्या भित्तीपत्रकांचा समावेश होता.

विविध संशोधन प्रकल्पांची माहिती विद्यार्थी-विद्यार्र्थिनी बारकाईने घेत होते. सायंकाळपर्यंत त्यांची याठिकाणी गर्दी होती. दरम्यान, युजी, पीजी, पीपीजीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी (पीएडीसाठीची नोंदणी) एकूण २८५ प्रकल्प या महोत्सवात सादर केले. प्रकल्पांची संख्या यंदा वाढली आहे. विविध सहा गटांतील प्रत्येकी तीन विजेत्यांची राज्यस्तरीय महोत्सवासाठी निवड होणार असल्याचे समन्वयक डॉ. सादळे यांनी सांगितले.

समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवसंकल्पना आणि संशोधनाची माहिती या महोत्सवातून मिळाली. विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगले, वेगळ्या विषयांबाबतचे संशोधन या महोत्सवात सादर केले.-ऐश्वर्या भोसले.

विज्ञान, अभियांत्रिकी, शेती व पशुसंवर्धन, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, अशा विविध क्षेत्रांतील संशोधन या महोत्सवात पाहायला मिळाले. संशोधनाला चालना देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.-बाळकृष्ण लिमये, कोल्हापूर.

नवसंकल्पना, संशोधनाची गरजदेशाच्या मजबूत बांधणी आणि प्रगतीसाठी नवसंकल्पना, संशोधनाची गरज आहे. समाजातील विविध स्वरूपातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग करण्याचे काम विद्यापीठ आणि महाविद्यालय पातळीवरील संशोधकांकडून व्हावे, असे आवाहन प्र-कुलगुरु डॉ. शिर्के यांनी यावेळी केले.

 

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर