शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘एफआरपी’सह गाळप हंगामाची रणनीती ठरणार

By admin | Updated: October 8, 2015 01:04 IST

तिढा आज सुटणार ? : जिल्हा बॅँकेत साखर कारखानदारांच्या बैठकीत होणार निर्णय

कोल्हापूर : आगामी साखर हंगामातील ‘एफआरपी’बाबत नेमकी काय भूमिका घ्यायची? याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक होत आहे. हंगाम कधी सुरू करायचा? ‘एफआरपी’चा तिढा कसा सोडवायचा? याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. साखरेच्या घसरलेल्या दरामुळे गत हंगामातील ‘एफआरपी’ देताना साखर कारखान्यांची दमछाक उडाली आहे. अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. तोपर्यंत नवीन हंगाम समोर आला आहे. साखरेच्या दरात फारशी सुधारणा न झाल्याने यंदाही ‘एफआरपी’चा गुंता कायम राहणार आहे. यासाठी साखर कारखान्यांनी आपल्या सर्वसाधारण सभेत ‘एफआरपी’ तीन टप्प्यांत देण्याचे ठराव केले आहेत; पण याला शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. ‘एफआरपी’ एकरकमीच मिळाली पाहिजे, यावर शेतकरी संघटना ठाम असल्याने कारखान्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. कारखानदारांच्या या भूमिकेविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने कारखानदार एकवटले आहेत. कारखानदारांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे करत असून, त्यांनी जिल्ह्णातील सर्व कारखानदारांची बैठक जिल्हा बॅँकेत बोलावली आहे. यामध्ये हंगाम कधी सुरू करायचा?, ‘एफआरपी’चा गुंता कसा सोडवायचा? या दोन बाबींवर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)हंगाम लांबणीवर१५ आॅक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याची तयारी जिल्ह्यातील काही कारखान्यांची होती. परंतु, हादग्याच्या नक्षत्राने गेले पाच-सहा दिवस जोरदार हजेरी लावल्याने हंगाम लांबणीवर पडणार आहे. १ नोव्हेंबरला हंगाम सुरू करायचा म्हटले तर ११ नोव्हेंबरला दिवाळी असल्यामुळे ऊसतोडणी मजूर येणार नाहीत. त्यामुळे दसऱ्यानंतर साधारणत: २२ आॅक्टोबरनंतर हंगाम सुरूच करायचा, असा प्रयत्न कारखानदारांचा आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कारखाने लवकर सुरू करणे गरजेचे होते; पण गेले चार-पाच दिवस पाऊस झाल्याने थोडे दिवस थांबावे लागणार आहे. गत हंगामाप्रमाणेच यावर्षीही साखर उद्योग अडचणीत आहे. ‘एफआरपी’चा प्रश्न व दुष्काळ यातून मार्ग काढून हंगाम सुरू करावा लागणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा बॅँकेचा अध्यक्ष म्हणून ही बैठक बोलावली आहे. -हसन मुश्रीफ, आमदार