शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: ऐन सुगीत चंदगड तालुक्यात टस्करासह पिल्लांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 13:05 IST

चंदगड : तालुक्यात हत्तींचा कळप कायमच वास्तव्यास असला तरी अलीकडेच आलेला एक टस्कर आण्णा आणि त्याच्या दोन पिल्लांनी कळसगादे, ...

चंदगड : तालुक्यात हत्तींचा कळप कायमच वास्तव्यास असला तरी अलीकडेच आलेला एक टस्कर आण्णा आणि त्याच्या दोन पिल्लांनी कळसगादे, पार्ले, जेलुगडे परिसरात धुमाकूळ घातला असून उसाचे मोठे नुकसान केले आहे. ऐन सुगीत हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असलेले पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. चंदगड तालुक्यात हत्तीचा वावर या भागात ठरलेला असतो. दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होते. नुकसान भरपाई वेळेत कधीच मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. उत्पादन खर्चाइतकाही दर पदरात पडत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे. वनविभाग सातत्याने हत्ती आपल्या कार्यक्षेत्रात सांभाळण्यात असमर्थ ठरले आहे. वनविभागाकडे पंचनाम्याशिवाय अन्य कोणतेच काम उरलेले नाही. हत्ती पिटाळून जंगलक्षेत्रात पाठवण्यात ते कमी पडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून जांबरे, नागवे, उमगाव, कळसगादे, गुडवळे, पार्ले परिसरात हत्तींचा वावर आहे. गेल्या दोन दिवसांत कळसगादे गावातील खेमाना दळवी, गोविंद दळवी, पुंडलिक दळवी, ज्ञानेश्वर दळवी, भिकाजी दळवी, अनिल दळवी, संतोष दळवी या शेतकऱ्यांचेविशेषतः रायीकडच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस खाण्यापेक्षाही त्याच्या नाचण्याने मोठे नुकसान होत आहे.वास्तविक पाहता तालुक्यातील साखर कारखान्यांनी अग्रक्रमाने हत्तीबाधित क्षेत्रातील उसाची उचल करणे आवश्यक आहे. शेतकरी हत्तींच्या वाढत्या वावराने हतबल झाला असून त्यांना वनविभाग, साखर कारखाने यांच्या सहकार्याची गरज असून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक आहे.गणेश नावाचा टस्करही कलिवडे, किटवडे व जंगमहट्टी धरण परिसरात असून त्याच्याकडूनही पिकांचे नुकसान सुरू आहे. त्यामुळे वनविभागाने हत्ती हाकारा पथकाच्या मदतीने आमच्या पिकांचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागFarmerशेतकरी