शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:25 IST

पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे. या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत टॅँकरचे दर अडलेल्या नागरिकांची लूट, पूरपरिस्थितीत हरवली माणुसकी

कोल्हापूर : पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे.

या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.महापालिकेच्या बहुतांश पाणी पुरवठा योजना पाण्यात असून, त्याची दुुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापुरामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे; त्यामुळे शहरासह उपनगरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या काळात थोडी माणुसकी दाखविणे गरजेचे होते; परंतु अशा कठीण काळात मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार खासगी टॅँकरवाल्यांकडून सुरू आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत विकला जात आहे.

एका बाजूला शासन प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिक पूरग्रस्तांना मदतीचा हात देत असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला आपलीच माणसं आपल्या माणसांना लूटत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव या पाचपट दराने लोक पाणी विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत.

टॅँकरवाल्यांना मोफत पाणी द्या, असे आम्ही म्हणत नाही, मूळ दरामध्ये १00-२00 वाढवून द्यायलाही हरकत नाही; परंतु अशा पद्धतीने परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पाण्याची चालविलेली लूट योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. शहरासह कळंबा, पाचगाव, फुलेवाडी, जाधववाडी, बालिंगा, मोरेवाडी परिसरातील उपनगरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे अशा पद्धतीने टॅँकरवाल्यांकडून जादा पैसे आकारणी सुरू आहे.

कृत्रिम बुकिंग दाखवून लूटपाणीटंचाईच्या काळात टॅँकरसाठी खोटे कृत्रिम बुकिंग दाखवून वाढीव दराने पाण्याचे टॅँकर विकण्याचे प्रकार समोर येत आहेत. नागरिकही अशा पद्धतीने वास्तव असेल, या गैरसमजातून वाढीव पैसे मोजत आहेत. ही बाब गंभीर आहे.

 

टॅँकरमालकांकडून अशा पद्धतीने पैसे आकारून नागरिकांची लूट करणे अयोग्य आहे, अशा टॅँकर चालकांची यादी तयार करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्तांनाही त्यांच्या यंत्रणेमार्फत माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

शहरात पाण्याची परिस्थिती गंभीर असताना टॅँकरवाल्यांकडून पाचपट जादा दराने पैसे घेणे योग्य नाही. मूळ दरापेक्षा १00-२00 रुपये जादा देण्याची मानसिकता असताना नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.- महेश देसाई, नागरिक

पूर परिस्थितीमुळे गेले १५ दिवस पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाकडे असलेल्या टँकरच्या संख्येत मर्यादा असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला; मात्र टँकरमालकांनी याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दर लावून नागरिकांची लूट केली आहे.- करुणा कांबळे, गृहिणी 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरWaterपाणी