शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:25 IST

पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे. या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत टॅँकरचे दर अडलेल्या नागरिकांची लूट, पूरपरिस्थितीत हरवली माणुसकी

कोल्हापूर : पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे.

या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.महापालिकेच्या बहुतांश पाणी पुरवठा योजना पाण्यात असून, त्याची दुुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापुरामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे; त्यामुळे शहरासह उपनगरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या काळात थोडी माणुसकी दाखविणे गरजेचे होते; परंतु अशा कठीण काळात मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार खासगी टॅँकरवाल्यांकडून सुरू आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत विकला जात आहे.

एका बाजूला शासन प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिक पूरग्रस्तांना मदतीचा हात देत असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला आपलीच माणसं आपल्या माणसांना लूटत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव या पाचपट दराने लोक पाणी विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत.

टॅँकरवाल्यांना मोफत पाणी द्या, असे आम्ही म्हणत नाही, मूळ दरामध्ये १00-२00 वाढवून द्यायलाही हरकत नाही; परंतु अशा पद्धतीने परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पाण्याची चालविलेली लूट योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. शहरासह कळंबा, पाचगाव, फुलेवाडी, जाधववाडी, बालिंगा, मोरेवाडी परिसरातील उपनगरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे अशा पद्धतीने टॅँकरवाल्यांकडून जादा पैसे आकारणी सुरू आहे.

कृत्रिम बुकिंग दाखवून लूटपाणीटंचाईच्या काळात टॅँकरसाठी खोटे कृत्रिम बुकिंग दाखवून वाढीव दराने पाण्याचे टॅँकर विकण्याचे प्रकार समोर येत आहेत. नागरिकही अशा पद्धतीने वास्तव असेल, या गैरसमजातून वाढीव पैसे मोजत आहेत. ही बाब गंभीर आहे.

 

टॅँकरमालकांकडून अशा पद्धतीने पैसे आकारून नागरिकांची लूट करणे अयोग्य आहे, अशा टॅँकर चालकांची यादी तयार करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्तांनाही त्यांच्या यंत्रणेमार्फत माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

शहरात पाण्याची परिस्थिती गंभीर असताना टॅँकरवाल्यांकडून पाचपट जादा दराने पैसे घेणे योग्य नाही. मूळ दरापेक्षा १00-२00 रुपये जादा देण्याची मानसिकता असताना नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.- महेश देसाई, नागरिक

पूर परिस्थितीमुळे गेले १५ दिवस पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाकडे असलेल्या टँकरच्या संख्येत मर्यादा असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला; मात्र टँकरमालकांनी याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दर लावून नागरिकांची लूट केली आहे.- करुणा कांबळे, गृहिणी 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरWaterपाणी