शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:25 IST

पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे. या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत टॅँकरचे दर अडलेल्या नागरिकांची लूट, पूरपरिस्थितीत हरवली माणुसकी

कोल्हापूर : पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे.

या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.महापालिकेच्या बहुतांश पाणी पुरवठा योजना पाण्यात असून, त्याची दुुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापुरामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे; त्यामुळे शहरासह उपनगरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या काळात थोडी माणुसकी दाखविणे गरजेचे होते; परंतु अशा कठीण काळात मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार खासगी टॅँकरवाल्यांकडून सुरू आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत विकला जात आहे.

एका बाजूला शासन प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिक पूरग्रस्तांना मदतीचा हात देत असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला आपलीच माणसं आपल्या माणसांना लूटत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव या पाचपट दराने लोक पाणी विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत.

टॅँकरवाल्यांना मोफत पाणी द्या, असे आम्ही म्हणत नाही, मूळ दरामध्ये १00-२00 वाढवून द्यायलाही हरकत नाही; परंतु अशा पद्धतीने परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पाण्याची चालविलेली लूट योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. शहरासह कळंबा, पाचगाव, फुलेवाडी, जाधववाडी, बालिंगा, मोरेवाडी परिसरातील उपनगरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे अशा पद्धतीने टॅँकरवाल्यांकडून जादा पैसे आकारणी सुरू आहे.

कृत्रिम बुकिंग दाखवून लूटपाणीटंचाईच्या काळात टॅँकरसाठी खोटे कृत्रिम बुकिंग दाखवून वाढीव दराने पाण्याचे टॅँकर विकण्याचे प्रकार समोर येत आहेत. नागरिकही अशा पद्धतीने वास्तव असेल, या गैरसमजातून वाढीव पैसे मोजत आहेत. ही बाब गंभीर आहे.

 

टॅँकरमालकांकडून अशा पद्धतीने पैसे आकारून नागरिकांची लूट करणे अयोग्य आहे, अशा टॅँकर चालकांची यादी तयार करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्तांनाही त्यांच्या यंत्रणेमार्फत माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

शहरात पाण्याची परिस्थिती गंभीर असताना टॅँकरवाल्यांकडून पाचपट जादा दराने पैसे घेणे योग्य नाही. मूळ दरापेक्षा १00-२00 रुपये जादा देण्याची मानसिकता असताना नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.- महेश देसाई, नागरिक

पूर परिस्थितीमुळे गेले १५ दिवस पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाकडे असलेल्या टँकरच्या संख्येत मर्यादा असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला; मात्र टँकरमालकांनी याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दर लावून नागरिकांची लूट केली आहे.- करुणा कांबळे, गृहिणी 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरWaterपाणी