शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

‘पूरग्रस्तांची मदत लाटणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 5:43 AM

जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन लेखी तक्रारी दाखल झालेल्या आहेत

सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आलेली मदत लाटणाºया संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन लेखी तक्रारी दाखल झालेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. चौधरी म्हणाले, महापुराचा जिल्ह्यातील सांगली-मिरज शहरांसह ग्रामीण भागातील १०४ गावांतील सव्वातीन लाख लोकांना फटका बसला आहे. प्रशासकीय पातळीवर पंचनामे, मदतीचे वाटप सुरुच आहे. मात्र या पूरग्रस्तांसाठी आलेली मदत इतरांनीच लाटली आहे, अशा दोन तक्रारी प्रशासनाकडे दाखल झालेल्या आहेत. पूरग्रस्तांची मदत लाटणाºया समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय आणखी कोणी सामाजिक संस्था, उद्योजकांची मदत लाटत आहे का, याचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे....अन्यथा ‘त्या’ कंपन्यांवर फौजदारीपूरग्रस्तांना आधार देऊन शासन त्यांचे जीवनमान सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत असताना मायक्रोफायनान्स कंपन्या कर्जदारांकडून जबरदस्तीने कर्जवसुली करत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांनी पूरबाधितांकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वसुली करू नये, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.