शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Kolhapur: वस्त्रनगरी खून सत्रांमुळे हादरली, गुन्हेगारी वाढू लागली; अल्पवयीन मुलांचा सहभाग लक्षणीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:05 IST

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जरब बसविण्याची गरज

अतुल आंबीइचलकरंजी : लागोपाठ दोन खून, तसेच खुनीहल्ले वाढल्याने वस्त्रनगरी हादरली आहे. यातील बहुतांशी प्रकरणांत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाच समावेश आहे. त्याचबरोबर, अल्पवयीन मुलांचाही सहभाग लक्षणीय आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध आराखडा आखून या प्रकाराला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने जलदगतीने विस्तारलेल्या इचलकरंजी शहरात देशभरातील विविध राज्यांतून नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी अवैध व्यवसाय, वर्चस्ववाद या प्रकारांतून गुन्हेगारी वाढून वस्त्रनगरीची शस्त्रनगरी बनली होती. तत्कालीन पोलिस दलाने कठोर पावले उचलत टोळ्यांना मोक्क्यामध्ये अडकवले. त्यानंतर, आटोक्यात आलेली गुन्हेगारी हळूहळू पुन्हा वाढीस लागली आहे. याला वेळीच आळा न घातल्यास पुन्हा वस्त्रोद्योगात अशांततेचे वातावरण निर्माण होईल.येथील उद्योजक व्यवहारी दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. चांगल्या प्रतीचे उत्पादन असल्यामुळे येथील उत्पादनाला मोठी मागणी आहे. उद्योगनगरीच्या निमित्ताने बाहेरहून आलेल्यांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपले अवैध व्यवसायाचे बस्तान बसविण्यासाठी तरुणाईला हाताशी धरून आपली दहशत निर्माण करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता आहे. गांजा, तसेच मद्यप्राशन याच्या आहारी गेलेल्या युवकांना ते मिळाल्याशिवाय चैन पडत नसून, त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होताना दिसत आहेत.याचाच गैरफायदा घेत काही व्हाइट कॉलर दादा अशा युवकांना हाताशी धरून आपले साम्राज्य पसरविण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला किरकोळ गुन्ह्यात खाकीचे सहकार्य मिळाल्यानेही या प्रकाराला खतपाणी मिळते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

हल्लेखोरांची पार्श्वभूमीदोन्ही खून, तसेच दोन्ही प्राणघातक हल्ले अशा चारही प्रकरणांतील बहुतांश हल्लेखोर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. प्रथमदर्शनी घरगुती वाद, प्रेमप्रकरण, किरकोळ वाद यातून हे प्रकार घडल्याचे दिसत असले, तरी संबंधित हल्लेखोर रेकॉर्डवरील असल्यानेच त्यांच्याकडून असे गंभीर प्रकार घडतात.बंदी फक्त कागदावरचगावठी दारू, गांजा, सिगारेट, मावा अशा नशेच्या मागे लागूनही तरुणाई बिघडत आहे. याला बंदी असताना शहरात सर्वत्र खुलेआम हे सर्व प्रकार सहजपणे मिळतात. त्यामुळे बंदी फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस