शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

राजर्षी शाहूंच्या विचारांनाच तडा, कोल्हापूर हिंदुत्ववादी शहर भासविण्याचा प्रयत्न

By विश्वास पाटील | Updated: June 9, 2023 12:54 IST

कोल्हापूरच्या माथी असलेला पुरोगामित्वाचा गुलाल पुसून टाकण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून पद्धतशीरपणे सुरू

विश्वास पाटीलकोल्हापूर : वादग्रस्त स्टेटस लावल्याच्या प्रकरणावर कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी (दि.७ जून) हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. त्यामध्ये विशिष्ट समाजाच्या घरावर दगडफेक झाली. ही दगडफेक घरावर नव्हे तर कोल्हापूरने आजपर्यंत जपलेल्या सामाजिक सलोख्यावर आणि एकोप्याने राहण्याच्या भावनेवर झाली आहे. कोल्हापूरच्या माथी असलेला पुरोगामित्वाचा गुलाल पुसून टाकण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून पद्धतशीरपणे सुरू आहे.. बुधवारची घटना त्याचाच भाग आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आणि व्यवहार बळकट करायचा की आता जे सुरू आहे त्याच्याकडे नुसते पाहत राहायचे याचा विचार आम्ही कोल्हापूरकर असे अभिमानाने म्हणणाऱ्या लोकांसमोर आहे. आपण उठसुठ जे लई भारी कोल्हापूर म्हणतो, त्या लई भारी मध्ये कोल्हापुरातील सामाजिक सलोख्याची, शांततेची, एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा समाविष्ट आहे. कोल्हापूर जगात भारी का आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे हे कोल्हापूरकरांचे सगळ्यांना बरोबर घेवून जगणे आहे. म्हणून कोल्हापूर मोठे आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.हिंदु जनजागृती मोर्चातून तापवलेले समाजमन, गावोगावच्या तरुणांना केरळा स्टोरी चित्रपट दाखवून चेतवलेली द्वेषाची भावना, हेरले, इचलकरंजी, पन्हाळा येथील कांही घटना यांतून अस्वस्थता वाढली होती. त्यातूनच यांना धडा शिकवायचा ही भावना वाढीस लागली.

गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर हे पुरोगामी शहर नाही तर ते हिंदुत्ववादी आहे ठसवण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहे. कालच्या मोर्चाच्या अनेक सोशल पोस्टवर तसाच प्रचार जाणीवपूर्वक करण्यात आला.. तुम्ही हिंदू असाल तर शिवाजी चौकात या असेच आवाहन करण्यात आले होते. एका अर्थाने हिंदू खतरे मे है असे सांगून समाजाला भडकवण्याचा प्रयत्न होता. भडकलेला समाज मग पोलिसांच्या नियंत्रणात ही कसा राहत नाही हेच बुधवारी कोल्हापूरने अनुभवले. अशा जमावाला सोशल मीडियावर भावना भडकवणारे आवाहन करून गोळा करण्यासाठी फार अक्कल लागत नाही..तो जमाव नियंत्रित करण्याची ताकद नेतृत्वात असावी लागते..बुधवारच्या मोर्च्यात जे कुणी नेते होते ते नंतर गायब झाले..आता पोलिसांनी गोरगरिबांची पोरं ताब्यात घेतली आहेत..त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे..

या देशातील मुस्लिम हे भारताचे नागरिक नाहीत ते या देशाची शत्रूच आहेत असे विष सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मनात फोनवर बिंबवले जात आहे..त्याला उत्तर किंवा त्यातील काय योग्य आणि काही चुकीचे आहे हे सांगणारी कोणतीच यंत्रणा नाही. काँग्रेस किंवा अन्य पक्षाकडे आपलीच मुले या विकारी प्रचारापासून रोखण्याचा कोणताही कार्यक्रम नाही. कुणीतरी एखाद्या समाजकंटकाने चुकीचे कृत्य केले तर त्याची शिक्षा साऱ्या समाजाला देण्याचा नवा धोकादायक प्रकार सुरू झाला आहे. बुधवारच्या बंदमध्ये ज्यांची घरे, दुकाने किंवा वाहनांची तोडफोड झाली त्यातील एकानेही चुकीचे कृत्य करणाऱ्यांचे समर्थन केलेले नाही. पण त्यांना त्याचा नाहक त्रास मात्र झाला.कोल्हापूर ही राजश्री शाहू महाराजांची नगरी आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशभर एक पुरोगामी शहर अशी ओळख आहे. कोल्हापूर उत्तर च्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाची लाट रोखण्याचे काम याच नगरीने करून दाखवले आहे.. त्यामुळे कोल्हापुरात बुधवारी जो प्रकार झाला तो ऐकल्यानंतर राज्यभरातून कोल्हापुरात असे कसे काय घडू शकतं अशी प्रतिक्रिया उमटली. कोल्हापूरची सामाजिक वीण ही नेहमीच सामाजिक एकोप्याची राहिली आहे.कोणत्याही सामाजिक कामात आणि सणातही मुस्लिम समाज इतर सर्व समाजाबरोबर एकरूप होऊन गेला आहे. कोरोना काळात कोण मृतदेहाकडे बघत नव्हते तेव्हा याच समाजातील कार्यकर्त्यांनी आपला वाढवडिलांवर अंत्यसंस्कार केले आहेत..मराठा आरक्षण मोर्च्यावेळी याच समाजाने जिल्ह्यातून आलेल्या छत्रपतींच्या मावळ्यांना उस्फुर्तपणे खाऊ घातले होते..याची तरी जाणीव किमान दगड फेकणाऱ्यांनी ठेवायला हवी होती. निवडणुकीच्या राजकारणासाठी कोण असल्या घटनाना हवा देत आहे का याच्याही मुळाशी जाण्याची गरज आहे..निवडणूक होईल, राजकारण होईल पण सामाजिक सदभावाला गेलेला तडा कोल्हापूरला परवडणारा नाही याचे भान सर्वांनीच बाळगण्याची गरज आहे.छत्रपती घराण्याकडे पालकत्व..

डाव्या चळवळीकडे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर समाज ज्यांच्या शब्दाला मान देईल असे नेतृत्व नाही. त्यामुळे कोल्हापूरची मूळ ओळख पुसून टाकणारे हे आव्हान कसे पेलायचे हा प्रश्न आहे. या स्थितीत आता कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची जबाबदारी जास्त वाढते..त्यांनीच कोल्हापूरच्या सर्व समाजाची एकजूट करून हे धर्मांधतेचे आव्हान परतवले पाहिजे.

बंदची दोन कारणे होती ती अशी : इमरान नायकवडी या तरुणाने हिंदू समाजातील मुलीला फूस लावून पळवून नेले आणि या प्रकरणात पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.मुळात हे प्रकरण लव जिहाद या पद्धतीचे नाही. दोन-तीन वर्षापासून त्या दोघात प्रेम संबंध होते. त्या मुलीशी इमरान नायकवडी याने लग्न करणे ही मुलीच्या कुटुंबीयांची अगतिकता होती. असे असताना या प्रकरणाला लव जिहाद चे स्वरूप जाणीवपूर्वक देण्यात आले.

दुसरे कारण म्हणजे सदर बाजार मधील एका मुस्लिम तरुणाने औरंगजेब याचे पोस्टर स्टेटसला लावले. त्याचे अनुकरण मटन मार्केट परिसरातील एका तरुणाने केले. हा शाळेतील मुलांचा ग्रुप आहे. त्यातील काही मुले अल्पवयीन आहेत.पण तरीही ज्याने ही कृत्य केले आहे. त्यांना तातडीने शोधून काढणे आणि कारवाई करणे ही जबाबदारी पोलिसांची होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करणे आवश्यक होते पण तसे घडलेले नाही. यात गंमत अशी आहे ज्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले त्यांचाच विचार मांणणारे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे त्यामुळे या अशा प्रकरणात कारवाई वेळेत झाली नसेल तर हा मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही समाजाचा दोष नव्हे. पोलिसांच्या चुकांची किंवा त्यांनी कारवाई केली नाही म्हणून मोर्चा काढून दगडफेक करणे गोरगरिबांची दुकाने फोडणे वाहनांचे नुकसान करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीHindutvaहिंदुत्व