शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या आहेत. काठावर बहुमत असणाऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या आहेत. काठावर बहुमत असणाऱ्यांनी सावधानता म्हणून आपल्या सदस्यांना एकत्रित ठेवण्यासाठी सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले आहे.

गेला महिनाभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. नात्यागोत्यातील संघर्षपूर्ण लढती पहावयास मिळाल्या. स्थानिक सोयीनुसार एकत्रित येऊन आघाड्या झाल्याने पक्षीय राजकारणाची किनार फारशी दिसली नाही. मात्र, भाऊबंदकी उफाळून आल्याने निवडणुकीत ईर्षा पहावयास मिळाली. निवडणूक झालेल्या ३८६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी काठावर बहुमत मिळाले आहे. सहा ठिकाणी त्रिशंकू अवस्था झाली आहे. या ठिकाणी सरपंच निवडीपर्यंत आपापले सदस्य सांभाळताना नेत्यांची दमछाक होणार आहे. त्यात सरपंचपदाचे आरक्षण काढायचे आहे. आरक्षण काढल्यानंतर सदस्यांना सभा नोटीस लागू करून त्यानंतर आठ दिवसांनी सरपंच, उपसरपंच निवडी होणार आहेत.

सरपंच निवडीपर्यंत फाटाफुट होऊ नये, यासाठी आघाडी प्रमुखांनी दक्षता घेतली आहे, तर जिथे काठावर बहुमत आहे, त्या ठिकाणी आपल्या गळाला कोणी लागतो, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नेतेमंडळींनी सत्तेबाबत दावे, प्रतिदावे केल्याने अंतर्गत कुरघोडीचे राजकारणही उफाळून येणार आहे.

अपक्षांचा ‘भाव’ वधारला

अनेक गावांत अपक्षांच्या हाती सत्तेची चावी आली आहे. सत्तेचा लंबक त्यांच्या हाती असल्याने त्यांचा ‘भाव’ चांगलाच वधारला आहे. सरपंच, उपसरपंच पदांवर दावा सांगितला जात आहे. नोकरीबरोबर अर्थकारणावरही तडजोडी सुरू आहेत.

प्रशासकांच्या हस्तेच यंदाचे ध्वजारोहण

मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. ऑगस्टपासून येथे प्रशासक कामकाज पाहत असून, मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होणार आहे.