शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

Coronavirus Unlock : रिकव्हरी रेट चांगला; पण धोकाही तितकाच : जिल्हाधिकारी देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:27 IST

रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी असले तरी अजून धोकाही तितकाच असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देरिकव्हरी रेट चांगला; पण धोकाही तितकाच : जिल्हाधिकारी देसाई नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी असले तरी अजून धोकाही तितकाच असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.नागरिकांनी बेसावध राहू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व परगावांहून आलेल्या नातेवाइकांना काही दिवस होम क्वारंटाईन केल्यास हा रिकव्हरी रेट चांगला ठेवून मृत्यूचे प्रमाणही कमी करू शकू, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.कोल्हापुरातील ७४९ कोरोना रुग्णांपैकी ७०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, हे प्रमाण ९४ टक्के आहे. आजवर केवळ आठजणांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण एक टक्का आहे. हे कशामुळे घडले याबाबत सांगताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापुरात सुरुवातीला केवळ १८ रुग्ण होते; मात्र रेड झोनमधून आलेल्यांची आरोग्य तपासणी केल्याने रुग्णांची संख्या वाढली.

आजवर २५ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील लहान-मोठ्या गावांपासून ते जिल्हास्तरावर परगावहून येणाऱ्या नागरिकांबाबत योग्य नेटवर्किंग केले. प्रशासन व आरोग्य यंत्रणेची योग्य साखळी निर्माण केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखता आला. जे कोरोना रुग्ण हाय रिस्कमध्ये असतात, त्यांची माहिती आधीच कळल्याने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेल्यामुळे मृत्युदरही कमी राखण्यात यश आले....अन्यथा समूह संसर्गाचा धोकाजिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापूरकरांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्क, एकमेकांच्या वस्तू सॅनिटाईझ करून वापरणे या गोष्टींचे पालन करा. परगावांहून आलेले नातेवाईक अगदी ते कुटुंबातील असले तरी त्यांना किमान १०-१२ दिवस होम क्वारंटाईन ठेवा. घराबाहेर फिरू देऊ नका. त्यामुळे समूह संसर्ग होणार नाही. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केल्यानेच आपण समूह संसर्ग टाळू शकलो हे धान्यात ठेवा. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर