शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : रिकव्हरी रेट चांगला; पण धोकाही तितकाच : जिल्हाधिकारी देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:27 IST

रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी असले तरी अजून धोकाही तितकाच असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देरिकव्हरी रेट चांगला; पण धोकाही तितकाच : जिल्हाधिकारी देसाई नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी असले तरी अजून धोकाही तितकाच असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.नागरिकांनी बेसावध राहू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व परगावांहून आलेल्या नातेवाइकांना काही दिवस होम क्वारंटाईन केल्यास हा रिकव्हरी रेट चांगला ठेवून मृत्यूचे प्रमाणही कमी करू शकू, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.कोल्हापुरातील ७४९ कोरोना रुग्णांपैकी ७०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, हे प्रमाण ९४ टक्के आहे. आजवर केवळ आठजणांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण एक टक्का आहे. हे कशामुळे घडले याबाबत सांगताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापुरात सुरुवातीला केवळ १८ रुग्ण होते; मात्र रेड झोनमधून आलेल्यांची आरोग्य तपासणी केल्याने रुग्णांची संख्या वाढली.

आजवर २५ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील लहान-मोठ्या गावांपासून ते जिल्हास्तरावर परगावहून येणाऱ्या नागरिकांबाबत योग्य नेटवर्किंग केले. प्रशासन व आरोग्य यंत्रणेची योग्य साखळी निर्माण केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखता आला. जे कोरोना रुग्ण हाय रिस्कमध्ये असतात, त्यांची माहिती आधीच कळल्याने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेल्यामुळे मृत्युदरही कमी राखण्यात यश आले....अन्यथा समूह संसर्गाचा धोकाजिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापूरकरांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्क, एकमेकांच्या वस्तू सॅनिटाईझ करून वापरणे या गोष्टींचे पालन करा. परगावांहून आलेले नातेवाईक अगदी ते कुटुंबातील असले तरी त्यांना किमान १०-१२ दिवस होम क्वारंटाईन ठेवा. घराबाहेर फिरू देऊ नका. त्यामुळे समूह संसर्ग होणार नाही. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केल्यानेच आपण समूह संसर्ग टाळू शकलो हे धान्यात ठेवा. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर