शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Coronavirus Unlock : रिकव्हरी रेट चांगला; पण धोकाही तितकाच : जिल्हाधिकारी देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:27 IST

रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी असले तरी अजून धोकाही तितकाच असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देरिकव्हरी रेट चांगला; पण धोकाही तितकाच : जिल्हाधिकारी देसाई नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी असले तरी अजून धोकाही तितकाच असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.नागरिकांनी बेसावध राहू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व परगावांहून आलेल्या नातेवाइकांना काही दिवस होम क्वारंटाईन केल्यास हा रिकव्हरी रेट चांगला ठेवून मृत्यूचे प्रमाणही कमी करू शकू, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.कोल्हापुरातील ७४९ कोरोना रुग्णांपैकी ७०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, हे प्रमाण ९४ टक्के आहे. आजवर केवळ आठजणांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण एक टक्का आहे. हे कशामुळे घडले याबाबत सांगताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापुरात सुरुवातीला केवळ १८ रुग्ण होते; मात्र रेड झोनमधून आलेल्यांची आरोग्य तपासणी केल्याने रुग्णांची संख्या वाढली.

आजवर २५ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील लहान-मोठ्या गावांपासून ते जिल्हास्तरावर परगावहून येणाऱ्या नागरिकांबाबत योग्य नेटवर्किंग केले. प्रशासन व आरोग्य यंत्रणेची योग्य साखळी निर्माण केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखता आला. जे कोरोना रुग्ण हाय रिस्कमध्ये असतात, त्यांची माहिती आधीच कळल्याने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेल्यामुळे मृत्युदरही कमी राखण्यात यश आले....अन्यथा समूह संसर्गाचा धोकाजिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापूरकरांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्क, एकमेकांच्या वस्तू सॅनिटाईझ करून वापरणे या गोष्टींचे पालन करा. परगावांहून आलेले नातेवाईक अगदी ते कुटुंबातील असले तरी त्यांना किमान १०-१२ दिवस होम क्वारंटाईन ठेवा. घराबाहेर फिरू देऊ नका. त्यामुळे समूह संसर्ग होणार नाही. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केल्यानेच आपण समूह संसर्ग टाळू शकलो हे धान्यात ठेवा. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर