शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

Coronavirus Unlock : अडीच महिने उलटले तरी महामार्गावर ४० टक्केच वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 15:00 IST

पुणे बंगळूर महामार्गावरीलून वाहतूक लॉकडाऊनचे अडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने धावताना दिसत आहेत.महामार्गावरून हळूहळू वाहनांची वर्दळ वाढताना दिसत आहे.

ठळक मुद्देअडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने महामार्गावरमार्चच्या तुलनेत जुनमध्ये वाढली वर्दळ

सतीश पाटील शिरोली : पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक लॉकडाऊनचे अडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने धावताना दिसत आहेत. महामार्गावरून हळूहळू वाहनांची वर्दळ वाढताना दिसत आहे.भारतात लॉकडाऊन जाहीर होण्या अगोदर पुणे बंगळूर महामार्गावरून दररोज सुमारे २० ते २१ हजार वाहने धावत होती. पण लॉकडाऊनच्या काळात २६ मार्च रोजी ५३४ तर २० एप्रिल रोजी २१५६ आणि ०७ जून रोजी ८०७२ वाहने धावली आहेत. आज ही फक्त ४० टक्केच वाहतूक सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात एक दिवसाची संचारबंदी केली. आणि याला संपूर्ण भारतातील लोकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला. यानंतर २५ मार्च ते १४ एप्रिल हा २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला.

संपूर्ण भारतातील वाहतूक आणि वाहने आहे त्या ठिकाणी थांबली दळणवळण थांबले दररोज पुणे बंगळूर महामार्गावरून सुमारे, २० हजारहून अधिक वाहने धावत होती, तीही रस्त्यावर एका बाजूला आणि जिथे जागा मिळेल तिथे उभी राहिली. या मुळे कायम महामार्गावरून वाऱ्याच्या वेगाने धावणारी मालवाहतूक वाहने, ट्रक, टॅम्पो,लग्लझरी बसेस, अलिशान चारचाकी गाड्या ही सर्व वाहतूक आणि गाड्यांची चाके थांबली.

सुरूवातीला काही दिवस महामार्गावर शुकशुकाट होता. यातून मेडीकल, दवाखाने, अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने सुरू होती. २५ मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाला आणि महामार्गावरील वाहतूक बंद झाली तर २६ मार्च रोजी महामार्गावर किणी टोल नाका येथून पुणे आणि बंगळूर च्या दिशेने जाणारी फक्त ५३४ वाहने धावलेली नोंद झाली आहे. त्यादिवशी अत्यावश्यक सेवेतील फक्त दोन टक्के वाहने या रस्त्यावरून धावली आहेत.  २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंदच होते.त्यामुळे कोणी कामानिमित्तसुद्धा घराबाहेर पडत नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात आणि जगाच्या पाठीवर वाढतच गेला. त्यामुळे १४ एप्रिल नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात १५ एप्रिल ते ३ मे पर्यंत दुसरा लॉकडाऊन जाहीर केला. १५ एप्रिल नंतर लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंची गैरसोय होवू नये यासाठी धान्य, भाजीपाला, पेट्रोल डिझेल, दुध वाहतूक सुरू केली त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या संख्येत मार्च महिन्या पेक्षा एप्रिल मध्ये वाढ झाली २० एप्रिल रोजी किणी टोल नाका येथून गेल्या वाहनांची संख्या २१५६ इतकी नोंद झाली आहे. सुमारे दहा टक्के वाहने रस्त्यावरून धावत होती. दुसरा लॉकडाऊन ३ मे रोजी संपला यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने राज्यात ज्या ठिकाणी प्रवासी लोक अडकले आहेत.त्यांची तपासणी करून त्यांना रितसर परवानगी देऊन आपल्या घरी जाण्यासाठी थोड्या प्रमाणात मुभा दिली आणि मालवाहतूक गाड्यांना ही वाहतूकीसाठी परवानगी दिली. त्यामुळे महामार्गावरील वाहने धावू लागली तरी लॉकडाऊन पूर्वी जेवढी वाहने रस्त्यावरून धावत होती तेवढी वाहने आज धावत नाहीत ७ जून रोजी महामार्गावरून ८०७२ हजार इतकी वाहने धावली आहेत. आज ही महामार्गावरून फक्त चाळीस टक्केच वाहने धावत आहेत.यात मालवाहतूक गाड्यांची संख्या जास्त आहे. तर प्रवासी वाहतूक कमी प्रमाणात आहे. 

कोरोना आणि लॉकडाऊन मुळे महामार्गावरील वाहनांची संख्या कमी आहे. पण मार्चच्या तुलनेत जुन मध्ये वाहतूक वाढली असून लॉकडाऊन उठल्यावर वाहनांची संख्या पुन्हा वाढेल.- समाधान पाटील, उपअभियंता रस्ते विकास महामंडळ

सध्या माहामार्गावरून मालवाहतूक गाड्यांची तसेच तुरळक प्रवासी वाहतूक सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होईल तसतसं वाहतूक वाढेल.- सुरेश कांबळेवाहतूक पोलीस कर्मचारी, शिरोली

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग