शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : अडीच महिने उलटले तरी महामार्गावर ४० टक्केच वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 15:00 IST

पुणे बंगळूर महामार्गावरीलून वाहतूक लॉकडाऊनचे अडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने धावताना दिसत आहेत.महामार्गावरून हळूहळू वाहनांची वर्दळ वाढताना दिसत आहे.

ठळक मुद्देअडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने महामार्गावरमार्चच्या तुलनेत जुनमध्ये वाढली वर्दळ

सतीश पाटील शिरोली : पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक लॉकडाऊनचे अडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने धावताना दिसत आहेत. महामार्गावरून हळूहळू वाहनांची वर्दळ वाढताना दिसत आहे.भारतात लॉकडाऊन जाहीर होण्या अगोदर पुणे बंगळूर महामार्गावरून दररोज सुमारे २० ते २१ हजार वाहने धावत होती. पण लॉकडाऊनच्या काळात २६ मार्च रोजी ५३४ तर २० एप्रिल रोजी २१५६ आणि ०७ जून रोजी ८०७२ वाहने धावली आहेत. आज ही फक्त ४० टक्केच वाहतूक सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात एक दिवसाची संचारबंदी केली. आणि याला संपूर्ण भारतातील लोकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला. यानंतर २५ मार्च ते १४ एप्रिल हा २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला.

संपूर्ण भारतातील वाहतूक आणि वाहने आहे त्या ठिकाणी थांबली दळणवळण थांबले दररोज पुणे बंगळूर महामार्गावरून सुमारे, २० हजारहून अधिक वाहने धावत होती, तीही रस्त्यावर एका बाजूला आणि जिथे जागा मिळेल तिथे उभी राहिली. या मुळे कायम महामार्गावरून वाऱ्याच्या वेगाने धावणारी मालवाहतूक वाहने, ट्रक, टॅम्पो,लग्लझरी बसेस, अलिशान चारचाकी गाड्या ही सर्व वाहतूक आणि गाड्यांची चाके थांबली.

सुरूवातीला काही दिवस महामार्गावर शुकशुकाट होता. यातून मेडीकल, दवाखाने, अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने सुरू होती. २५ मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाला आणि महामार्गावरील वाहतूक बंद झाली तर २६ मार्च रोजी महामार्गावर किणी टोल नाका येथून पुणे आणि बंगळूर च्या दिशेने जाणारी फक्त ५३४ वाहने धावलेली नोंद झाली आहे. त्यादिवशी अत्यावश्यक सेवेतील फक्त दोन टक्के वाहने या रस्त्यावरून धावली आहेत.  २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंदच होते.त्यामुळे कोणी कामानिमित्तसुद्धा घराबाहेर पडत नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात आणि जगाच्या पाठीवर वाढतच गेला. त्यामुळे १४ एप्रिल नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात १५ एप्रिल ते ३ मे पर्यंत दुसरा लॉकडाऊन जाहीर केला. १५ एप्रिल नंतर लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंची गैरसोय होवू नये यासाठी धान्य, भाजीपाला, पेट्रोल डिझेल, दुध वाहतूक सुरू केली त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या संख्येत मार्च महिन्या पेक्षा एप्रिल मध्ये वाढ झाली २० एप्रिल रोजी किणी टोल नाका येथून गेल्या वाहनांची संख्या २१५६ इतकी नोंद झाली आहे. सुमारे दहा टक्के वाहने रस्त्यावरून धावत होती. दुसरा लॉकडाऊन ३ मे रोजी संपला यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने राज्यात ज्या ठिकाणी प्रवासी लोक अडकले आहेत.त्यांची तपासणी करून त्यांना रितसर परवानगी देऊन आपल्या घरी जाण्यासाठी थोड्या प्रमाणात मुभा दिली आणि मालवाहतूक गाड्यांना ही वाहतूकीसाठी परवानगी दिली. त्यामुळे महामार्गावरील वाहने धावू लागली तरी लॉकडाऊन पूर्वी जेवढी वाहने रस्त्यावरून धावत होती तेवढी वाहने आज धावत नाहीत ७ जून रोजी महामार्गावरून ८०७२ हजार इतकी वाहने धावली आहेत. आज ही महामार्गावरून फक्त चाळीस टक्केच वाहने धावत आहेत.यात मालवाहतूक गाड्यांची संख्या जास्त आहे. तर प्रवासी वाहतूक कमी प्रमाणात आहे. 

कोरोना आणि लॉकडाऊन मुळे महामार्गावरील वाहनांची संख्या कमी आहे. पण मार्चच्या तुलनेत जुन मध्ये वाहतूक वाढली असून लॉकडाऊन उठल्यावर वाहनांची संख्या पुन्हा वाढेल.- समाधान पाटील, उपअभियंता रस्ते विकास महामंडळ

सध्या माहामार्गावरून मालवाहतूक गाड्यांची तसेच तुरळक प्रवासी वाहतूक सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होईल तसतसं वाहतूक वाढेल.- सुरेश कांबळेवाहतूक पोलीस कर्मचारी, शिरोली

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग