शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : जनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:35 IST

कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेगभाजीपाल्यासह कांदा-बटाटा, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी

 कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. त्यामुळे लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, शाहूपुरी, राजारामपुरी, गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, आदी परिसर फुलला होता.कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीसुद्धा काही ना काही कारण काढून अनेकजण दुचाकी अथवा चारचाकी घेऊन फिरत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे संसर्ग होऊ लागला आहे.

हा रोखण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजने पुढाकार घेत प्रथम व्यापारी, उद्योजकांच्यावतीने आज, शुक्रवारपासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. या सहा दिवसांमध्ये कुटुंबाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, याकरीता गेल्या दोन दिवसांपासून अनेकजणांनी कडधान्ये, धान्य व कांदा बटाटा, भाजीपाला आणि नियमित लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक किराणा व घाऊक धान्य व्यापाऱ्यांकडे रांगा लावून खरेदीसाठी गर्दी केली होती.

विशेषत: कोरड्या वस्तूंना मागणी अधिक होती. अनेकांनी गहू घेण्याऐवजी तयार गव्हाच्या पिठाला प्राधान्य दिले. तर तांदूळ, जोंधळा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. विशेष म्हणजे मूग, मसूर, मटकी, चवळी ,काळा वाटाणा या कडधान्यांला मागणी अधिक होती. बाजारपेठेत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी खरेदीला गर्दी कमी होती.शाहूपुरी परिसरातील पाचवी गल्लीसह शहरातील दुचाकी व चारचाकी मॅकेनिककडे आपली वाहने दुरूस्ती करून घेण्यासाठी इतर दिवसांच्या तुलनेत वाहनधारकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरात जत्रेचे स्वरुप आले होते. इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक्स दुकानेही बंद राहणार असल्यामुळे अनेकांनी अशा वस्तूंच्या खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.जीवनावश्यक वस्तूंबरोबर फळांनाही मागणी वाढलीतापासह सर्दी, खोकला आदींमुळे अनेकांना अशक्तपणा आला आहे. त्यातून बरे होण्यासाठी जशी औषधांची गरज आहे. त्याप्रमाणेच फळांचीही आवश्यकता असते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, बाजारगेट आदी परिसरातील फळ विक्रेत्यांकडे लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली . विशेषत: सफरचंद, डाळिंब, संत्री, ड्रॅगन फ्रूट, किवी, पपई या फळांना अधिक मागणी होती. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर