शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

corona virus -वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या : ‘कोरोना’मुळे अर्थव्यवस्था ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 3:43 PM

जुलै-आॅगस्टमधील महापुरातून सावरतो न सावरतो तोच ‘कोरोना’मुळे पश्चिम महाराष्ट्रातील  अर्थव्यवस्था पुरती ठप्प झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस आहेत आणि वसुली सोडाच पण घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नसल्याने बॅँकांना वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बॅँकिंग क्षेत्रातून होत आहे.

ठळक मुद्देवसुलीसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या : ‘कोरोना’मुळे अर्थव्यवस्था ठप्पबॅँकांची रिझर्व्ह बॅँकेकडे मागणी

कोल्हापूर : जुलै-आॅगस्टमधील महापुरातून सावरतो न सावरतो तोच ‘कोरोना’मुळे पश्चिम महाराष्ट्रातील  अर्थव्यवस्था पुरती ठप्प झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस आहेत आणि वसुली सोडाच पण घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नसल्याने बॅँकांना वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बॅँकिंग क्षेत्रातून होत आहे.महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही शेती, उद्योग आणि बांधकाम क्षेत्रावर अवलंबून आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत या तिन्ही घटकांवर मोठा आघात झाल्याने अर्थव्यवस्था कमालीची मंदावली आहे. त्याचा थेट परिणाम बॅँकिंग क्षेत्रावर झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर जुलै-आॅगस्टमध्ये महापूर, अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे साखर उद्योग अडचणीत आला. उद्योगांवर गेली वर्ष-दीड वर्षापासून मंदीची लाट आहे. बांधकाम व्यवसाय तर ‘रेरा’ कायद्यानंतर पुरता कोलमडून गेला आहे. त्यातून सावरून पुढे सरकत असतानाच ‘कोरोना’चे संकट उभे राहिले.शेती, उद्योग आणि बांधकाम व्यवसायावरच बॅँकांचे अर्थकारण सुरू असते. यावरच आघात झाल्याने बॅँकांही आर्थिक अरिष्टात सापडल्या आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या नवीन धोरणानुसार बॅँकांची वर्षभर वसुलीचे नियोजन करणे अपेक्षित असले तरी आपल्याकडे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच वसुलीला गती येते. ‘कोरोना’मुळे अखंड मार्च महिना वसुलीविना गेला आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नाही.

ठप्प झालेली अर्थव्यवस्था लवकर रूळावर येईल असे वाटत नाही. बॅँकांचे ग्राहक असणारी यंत्रणा पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे बहुतांशी बॅँकांचे ताळेबंद पत्रक बिघडणार आहे. यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करत कर्ज वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बॅँकिंग क्षेत्रातून होत आहे.नवीन कर्जवाटपही ठप्पबॅँकांचे वसुलीबरोबर कर्जवाटपही ठप्प झाले आहे. मुद्रांक शुल्क कार्यालय बंद आहेत. ‘आरटीओ’ कार्यालय बंद असल्याने वाहन कर्जेही होत नाहीत.

‘कोरोना’मुळे बॅँकांची वसुली पूर्णपणे थांबली असून, अजून किती दिवस अर्थव्यवस्था ठप्प राहणार याचा अंदाज नाही. ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्वत:हून कर्ज वसुलीबाबत सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्याबाबत रिझर्व्ह बॅँकेला सूचना करावी.- महेश धर्माधिकारी,उपाध्यक्ष, जिल्हा नागरी बॅँक्स असोसिएशन 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर