शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

corona virus : कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय: समूह संसर्गाला निमंत्रणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:32 IST

कोल्हापूर शहरात संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे.

ठळक मुद्देमास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई समूह संसर्गाला निमंत्रणच, कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय

कोल्हापूर : शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता तेव्हा संसर्ग होईल या भीतीमुळे दीड-दोन महिने स्वत:ला कोंडून घेणाऱ्या कोल्हापूरकरांनी आता मात्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचना न पाळण्याचा गाफीलपणा, तसेच दुर्लक्ष समूह संसर्गाला आमंत्रण देणारे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाचे वादळ कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचले. जिल्हा प्रशासनाने चांगली खबरदारी घेतली. लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी केला. त्यामुळे कोरोनापासून कोल्हापूरकरांचा बचाव झाला. परंतु, पुणे, मुंबई, तसेच अन्य रेडझोनमधील शहरातून नागरिक यायला लागले तसा बाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली. सुरुवातीला त्याचेही काही वाटले नाही. बाहेरून आला, वेळीच तपासणी झाली आणि अलगीकरणही करण्यात आल्याने कोरोना पसरला नाही. जरी रुग्ण आढळले तरी ते वेळीच क्वारंटाईन, तसेच रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्यापासून अन्य कोणाला फारशी बाधा झाली नाही.परंतु, गेल्या काही दिवसांत ही रुग्ण संख्या वाढत असून, ती कमी होण्याचे नाव घेत नाही. कोरोनाचे रुग्ण आता हजाराचा टप्पा पार करीत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. भाजी मार्केट, बाजारपेठ अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे.सामाजिक अंतराचे भानच नाहीअनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले जात नाही, विना मास्क नागरिकांचा वावर आहे. मंडईत अथवा बाजारात गेले तरी त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवले जात नाही. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यांवर सामूहिकपणे एकत्रितपणे वावरणे सुरू आहे. संसर्ग होईल याचे भान कोणालाही राहिलेले नाही.परस्पर शहरात घुसघोरीशहरातील नागरिकांची तर कोरोनाचे संकट आता टळले आहे अशीच धारणा झाली की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. शहरात अनेकजण नाके चुकवून आले असून, परस्पर घरात गेले आहेत. ग्रामीण भागातसुद्धा पूर्वीसारखी देखरेख राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका वाढलेला आहे. अशा वेळी अधिक काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे.मास्क नसल्यास आजपासून दंडकोल्हापूर महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अधिक कडक भूमिका घेतली असून, जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना दंड करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा पहिला दणका पालिकेच्या अधिकाऱ्याला दिला. सोमवारी चक्क आस्थापना अधीक्षक सागर कांबळे यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला. आता ही मोहीम आज, मंगळवारपासून शहरात सुरू केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर