शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत कोल्हापुरातील जागांवरुन घमासान, कोणत्या मतदारसंघात अडले घोडे.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:53 IST

..तरच योग्य तोडगा निघू शकतो

कोल्हापूर : महाविकास आघाडीतील घटक पक्षात विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि शिरोळ या तीन मतदारसंघांवरून घमासान सुरू असल्याचे पाहायला मिळते. या तिन्ही मतदारसंघांवर काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून दावा केला जात आहे. त्यातही उत्तर व राधानगरी मतदारसंघात अदलाबदल झाली तरच योग्य तोडगा निघू शकतो.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील जागा वाटपावर प्रदेश पातळीवर तिन्ही पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतून चर्चा होत आहेत. विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहेत, त्यांच्या पक्षाला ती जागा सोडण्याचा एक कॉमन फार्म्युला स्वीकारला गेल्यामुळे काही जागांवरील गुंता आपोआपच सुटला आहे.त्यामुळे कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करवीर या चार मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्यामुळे या जागा आपसूकच काँग्रेसकडे जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे कागल, चंदगड मतदारसंघ जाणार हेही स्पष्ट असले तरी इचलकरंजी मतदारसंघावरदेखील दावा केला आहे.शिवसेना व काँग्रेस हे पक्ष राधानगरी, कोल्हापूर उत्तर व शिरोळ अशा तिन्ही मतदारसंघात आग्रही राहिल्याने या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कोल्हापूर उत्तर शिवसेनेला देऊन राधानगरी व शिरोळ हे मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेऊ शकते. असे झाले तर शाहूवाडी व कोल्हापूर उत्तर या दोन मतदारसंघावर शिवसेनेला समाधान मानावे लागणार आहे.राधानगरी मतदारसंघ काँग्रेसने प्रतिष्ठेचा विषय केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राधानगरी, भुदरगडमधून काँग्रेसवर मतांचा पाऊस पडला होता. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांना चांगल्या पद्धतीने लढत देऊ आणि ही जागा जिंकू, असा विश्वास काँग्रेसला आहे. त्यामुळेच काँग्रेसने या जागेसाठी आग्रह धरला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्याप तरी आपलाही आग्रह कायम ठेवला आहे.

दोन दिवसांत घमासान संपणारतीन जागेवरून सुरू असलेली घमासान येत्या दोन दिवसात संपेल आणि त्यातून सर्वमान्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा मात्र तिन्ही पक्षातून व्यक्त केली जात आहे. कदाचित रविवारी उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी