शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

मोकाट कुत्र्यांचे सांगलीत निर्बिजीकरण सुरू

By admin | Updated: June 24, 2016 01:38 IST

यंत्रणा हलली : एका दिवसात पकडली ६५ कुत्री; कोल्हापुरात १५ दिवसांत मोहीम सुरू होणार - मोकाट कुत्र्यांची दहशत ४

चंद्रकांत कित्तुरे-- कोल्हापूर --मोकाट कुत्र्यांना मारण्यास कायद्याने बंदी असल्याने त्यांचे निर्बिजीकरण करण्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्याय नाही. पिसाळलेल्या आणि मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी त्रस्त सांगली-मिरज-कुपवाड आणि कोल्हापूर महापालिकांनी तशा हालचाली चालू केल्या आहेत. सांगलीत तर त्याची अंमलबजावणीही चालू झाली आहे. कोल्हापुरातही येत्या १५ दिवसांत ही मोहीम चालू होणार आहे. या मोहिमा नियमित चालू राहिल्या, तरच मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होऊ शकेल. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने कुत्र्यांच्या निर्बिजी करणाचा ठेका न देता स्वत:च हे केंद्र चालू करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी आयुक्त रवीेंद्र खेबुडकर यांनी महापालिका हद्दीतील दररोज शंभर कुत्री पकडण्यात येतील, अशी घोषणा केली. कुत्री पकडण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून ती आठ वरून १५ केली. कुत्र्यांना पकडण्यासाठी जादा जाळ्याही दिल्या आणि कुत्री पकडण्याची मोहीम चालू झाली. गुरुवारी या पथकांनी ६५ मोकाट कुत्र्यांना पकडले आहे. या कुत्र्यांवर प्रतापसिंह उद्यानातील केंद्रात निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. याचबरोबर चिकन आणि मटण दुकानदारांनाही त्यांनी ओला कचरा रस्त्याकडेला टाकल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापूर महापालिकेनेही येत्या १५ दिवसांत कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी स्वत:चे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी (पशुवैद्यकीय) डॉ. विजय पाटील यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले. या मोहिमेसाठी महापालिकेने दहा लाखांची तरतूद केली आहे. कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवावे लागते. यासाठी महापालिकेच्या मोकळ्या इमारतींमधील तीन इमारती सुचविल्या आहेत. त्यातील एक निश्चित करून एका अशासकीय संघटनेच्या (एनजीओ) मदतीने तेथे हे केंद्र चालू केले जाणार आहे. ते नियमितपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.महापालिकांनी उपाययोजना सुरू केली असली तरी कुत्र्यांची मोठी संख्या पाहता ती पुरेशी आहे का? की मोकाट कुत्र्यांना मारण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज आहे. नीलगायींसाठी केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आहे, तशी भूमिका मोकाट कुत्र्यांच्या बाबतीतही सरकार घेईल का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. (समाप्त)काही तथ्येसांगलीतील शासकीय रुग्णालयात दरवर्षी कुत्रा चावलेले सुमारे सहा हजार रुग्ण दाखल होतात.कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील श्वानदंश झालेल्या रुग्णांची संख्या घटलेली दिसते. २०१३ मध्ये ४८३९ आणि आठ मृत्यू, २०१४ मध्ये ३९५६ आणि चार मृत्यू, तर २०१५मध्ये २७४७ आणि चार मृत्यू अशी आहे.इचलकरंजीत सुमारे तीन हजार मोकाट कुत्री आहेत. तेथे दरवर्षी कुत्रा चावलेले सुमारे १६२५ रुग्ण उपचार घेतात. तर खासगी रुग्णालयात सुमारे एक हजार रुग्ण उपचार घेतात, अशी माहिती इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. गेल्या १६ वर्षांपासून इचलकरंजीत मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबविण्यात आलेली नाही, असेही सांगण्यात आले.हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात एक एप्रिल २०१५ पासून मे २०१६ अखेर ८३४ श्वानदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत..कागल तालुक्यात कुत्रा चावलेले दररोज आठ ते दहा रुग्ण दाखल होतात, अशी माहिती तेथील सूत्रांनी दिली. शाहूवाडी तालुक्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत ५३२ जणांना श्वानदंश झाला आहे. तर एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ८५९ जणांना श्वानदंश झाला आहे. वाचकांना आवाहन !मोकाट कुत्र्यांचा हा प्रश्न खूपच गंभीर आहे. अनेकजण त्यांचे लक्ष्य बनले असतील. काय आहेत तुमचे अनुभव? काय करता येईल या कुत्र्यांना आवरण्यासाठी? लिहा आणि पाठवा आमच्याकडे. निवडक पत्रांना प्रसिध्दी देऊ.आमचा पत्ता : लोकमत ,लोकमत भवन प्लॉट नं. डी-३७,४८ व ४८/१ शिरोली एमआयडीसी, पुणे-बंगलोर रोड, कोल्हापूर, ४१६१२२.इमेल- ‘ङ्म’ीि२‘@ॅें्र’.ूङ्मे