शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पूरबाधित क्षेत्रात बांधकाम परवानगी नाही, आयुक्त कलशेट्टी यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:56 IST

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पंचगंगा नदीच्या पूर पातळीची रेषा (रेड व ब्ल्यू लाईन) निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर सुरु असून ही पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागास दिला आहे.

ठळक मुद्देपूरबाधित क्षेत्रात बांधकाम परवानगी नाही सर्वेक्षणसाठी २० पथके

कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात पंचगंगा नदीच्या पूर पातळीची रेषा (रेड व ब्ल्यू लाईन) निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर सुरु असून ही पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागास दिला आहे.पंचगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे शहराच्या ‘रेडझोन’वर चर्चा व्हायला लागली आहे. पूर बाधित क्षेत्रात ज्यांनी बांधकामे केली त्यांची स्वत:ची घरे पाण्याखाली गेलीच शिवाय त्यांनी बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील अन्य भागातील अनेक कुटुंबानाही त्याची जबर किंमत मोजावी लागली. या पार्श्वभूमीवर आयुक्त कलशेट्टी यांनी नगररचना विभागाला आदेश देऊन नवीन बांधकाम परवाने थांबवावेत, सांगितले आहे.राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जलसंपदा विभागामार्फत कोल्हापूर शहरातील पूररेषा निश्चित करण्याचे काम सुरु आहे. १९८९ व २००५ साली आलेल्या पूराची महत्तम रेषा तसेच आत्ताच्या महापूराची पातळी लक्षात घेऊन ही पूररेषा तयार केली जात आहे.

महापालिका प्रशासनानेही ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले आहे. सरकार याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे जोपर्यंत ही पूररेषा निश्चित होत नाही तोपर्यंत पूरबाधित क्षेत्रात महानगरपालिका कोणालाही बांधकाम परवानगी देणार नाही, तसे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.महापालिकेतर्फेही सर्वेक्षण सुरुमहापुरामुळे शहरातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे पंचनामे महसूल विभागातर्फे सुरु आहेत. या पंचनाम्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेली सरकारी मदत मिळेलच. परंतु महानगरपालिका देखील स्वतंत्रपणे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करत आहे. त्याकरीता अभियंत्यांची वीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

सदरचे सर्वेक्षण चार दिवसात पूर्ण होईल. सर्वेक्षण नुकसान भरपाईसाठी केले जात नसून भविष्यात काही धोरणे ठरविण्याच्या अनुषंगाने उपयोगी पडेल म्हणून केले जात आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.शहरात ज्या मिळकत धारकांची घरे बाधीत झाले आहेत, त्यापैकी तीन लाखाच्या आत ज्यांचे उत्पन्न आहे अशांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधून देता येईल का याचा प्रशासन विचार करत असून जे निकषात बसतील त्यांना घरकुल बांधून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.सरकारकडे निधी मागणारअतिवृष्टी आणि महापूराने जसे सर्वसामान्य जनतेचे नुकसान झाले आहे तसेच महानगरपालिकेचेही झालेले आहे. पाणी पुरवठा विभाग, महापालिकेच्या इमारती, शाळा, दवाखाने यांचे नुकसान झाले असून शहरातील सर्वच रस्ते धुवून गेले आहेत. त्याअनुषंगानेही नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे. अतिवृष्टीनंतर शहरवासियांना पायाभूत सुविधा देण्याकरीता लागणाऱ्या निधीची राज्य सरकारकडे लवकरच मागणी करणार असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर