शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पूरबाधित क्षेत्रात बांधकाम परवानगी नाही, आयुक्त कलशेट्टी यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:56 IST

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पंचगंगा नदीच्या पूर पातळीची रेषा (रेड व ब्ल्यू लाईन) निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर सुरु असून ही पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागास दिला आहे.

ठळक मुद्देपूरबाधित क्षेत्रात बांधकाम परवानगी नाही सर्वेक्षणसाठी २० पथके

कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात पंचगंगा नदीच्या पूर पातळीची रेषा (रेड व ब्ल्यू लाईन) निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर सुरु असून ही पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागास दिला आहे.पंचगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे शहराच्या ‘रेडझोन’वर चर्चा व्हायला लागली आहे. पूर बाधित क्षेत्रात ज्यांनी बांधकामे केली त्यांची स्वत:ची घरे पाण्याखाली गेलीच शिवाय त्यांनी बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील अन्य भागातील अनेक कुटुंबानाही त्याची जबर किंमत मोजावी लागली. या पार्श्वभूमीवर आयुक्त कलशेट्टी यांनी नगररचना विभागाला आदेश देऊन नवीन बांधकाम परवाने थांबवावेत, सांगितले आहे.राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जलसंपदा विभागामार्फत कोल्हापूर शहरातील पूररेषा निश्चित करण्याचे काम सुरु आहे. १९८९ व २००५ साली आलेल्या पूराची महत्तम रेषा तसेच आत्ताच्या महापूराची पातळी लक्षात घेऊन ही पूररेषा तयार केली जात आहे.

महापालिका प्रशासनानेही ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले आहे. सरकार याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे जोपर्यंत ही पूररेषा निश्चित होत नाही तोपर्यंत पूरबाधित क्षेत्रात महानगरपालिका कोणालाही बांधकाम परवानगी देणार नाही, तसे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.महापालिकेतर्फेही सर्वेक्षण सुरुमहापुरामुळे शहरातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे पंचनामे महसूल विभागातर्फे सुरु आहेत. या पंचनाम्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेली सरकारी मदत मिळेलच. परंतु महानगरपालिका देखील स्वतंत्रपणे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करत आहे. त्याकरीता अभियंत्यांची वीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

सदरचे सर्वेक्षण चार दिवसात पूर्ण होईल. सर्वेक्षण नुकसान भरपाईसाठी केले जात नसून भविष्यात काही धोरणे ठरविण्याच्या अनुषंगाने उपयोगी पडेल म्हणून केले जात आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.शहरात ज्या मिळकत धारकांची घरे बाधीत झाले आहेत, त्यापैकी तीन लाखाच्या आत ज्यांचे उत्पन्न आहे अशांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधून देता येईल का याचा प्रशासन विचार करत असून जे निकषात बसतील त्यांना घरकुल बांधून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.सरकारकडे निधी मागणारअतिवृष्टी आणि महापूराने जसे सर्वसामान्य जनतेचे नुकसान झाले आहे तसेच महानगरपालिकेचेही झालेले आहे. पाणी पुरवठा विभाग, महापालिकेच्या इमारती, शाळा, दवाखाने यांचे नुकसान झाले असून शहरातील सर्वच रस्ते धुवून गेले आहेत. त्याअनुषंगानेही नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे. अतिवृष्टीनंतर शहरवासियांना पायाभूत सुविधा देण्याकरीता लागणाऱ्या निधीची राज्य सरकारकडे लवकरच मागणी करणार असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर