शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय लोकांकडूनच मराठी शाळा बंदचे षडयंत्र, डॉ. दीपक पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:59 IST

मराठी भाषा टिकविण्यासाठी विचारांची आणि राजकीय लढाईसाठी जनतेचा रेटा अत्यावश्यक

कोल्हापूर : राजकीय लोकांकडून मराठीशाळा बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. मराठीशाळा या वंचित आणि गरिबांसाठी आहेत, अशी त्यांची शंभर टक्के खात्री झाली आहे. समाज हितासाठी सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा असल्याची भूमिकाही जाहीर करतात. त्यामुळे मराठी भाषा टिकविण्यासाठी विचारांची आणि राजकीय लढाईसाठी जनतेचा रेटा अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी केले.मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी शाळांसाठी संघर्षाचा भाग म्हणून जनवादी सांस्कृतिक चळवळीतर्फे रविवारी राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित मराठी भाषा विकास परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटणकर होते. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, संपत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पवार म्हणाले, मातृभाषेतील शिक्षणावर राजकीय लोकांचा विश्वास नाही. मराठी शाळा या वंचित आणि गरिबांसाठी आहेत, अशी त्यांची धारणा आहे. मात्र, राजकारण्यांची मुले, नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शिकत आहेत. अनेक वेगवेगळी धोरणं राबवित मराठी शिक्षणाचे वाटोळे करण्याचे काम राजकारणी मंडळींकडून सुरू आहे. त्याला कडाडून विरोध करण्यासाठी जनतेने हा लढा हाती घेतला पाहिजे. राज्यात मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, परंतु हिंदी शिकविण्यासाठी मुबलक शिक्षक आहेत, असे सरकारकडून सांगितले जात आहे, मात्र ही गोष्ट लाजिरवाणी आहे.नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास स्कूलचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले, आधुनिक काळात भाषा आत्मसात करणे ही आर्थिक प्रेरणेतून सुरू आहे. सरकारने मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याची गरज आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (एनईपी) ६४ पानांमध्ये एकही मराठी शब्द नाही. ही १३ कोटी मराठी जनतेसाठी खेदाची बाब आहे.