शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

राजकीय लोकांकडूनच मराठी शाळा बंदचे षडयंत्र, डॉ. दीपक पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:59 IST

मराठी भाषा टिकविण्यासाठी विचारांची आणि राजकीय लढाईसाठी जनतेचा रेटा अत्यावश्यक

कोल्हापूर : राजकीय लोकांकडून मराठीशाळा बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. मराठीशाळा या वंचित आणि गरिबांसाठी आहेत, अशी त्यांची शंभर टक्के खात्री झाली आहे. समाज हितासाठी सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा असल्याची भूमिकाही जाहीर करतात. त्यामुळे मराठी भाषा टिकविण्यासाठी विचारांची आणि राजकीय लढाईसाठी जनतेचा रेटा अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी केले.मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी शाळांसाठी संघर्षाचा भाग म्हणून जनवादी सांस्कृतिक चळवळीतर्फे रविवारी राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित मराठी भाषा विकास परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटणकर होते. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, संपत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पवार म्हणाले, मातृभाषेतील शिक्षणावर राजकीय लोकांचा विश्वास नाही. मराठी शाळा या वंचित आणि गरिबांसाठी आहेत, अशी त्यांची धारणा आहे. मात्र, राजकारण्यांची मुले, नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शिकत आहेत. अनेक वेगवेगळी धोरणं राबवित मराठी शिक्षणाचे वाटोळे करण्याचे काम राजकारणी मंडळींकडून सुरू आहे. त्याला कडाडून विरोध करण्यासाठी जनतेने हा लढा हाती घेतला पाहिजे. राज्यात मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, परंतु हिंदी शिकविण्यासाठी मुबलक शिक्षक आहेत, असे सरकारकडून सांगितले जात आहे, मात्र ही गोष्ट लाजिरवाणी आहे.नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास स्कूलचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले, आधुनिक काळात भाषा आत्मसात करणे ही आर्थिक प्रेरणेतून सुरू आहे. सरकारने मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याची गरज आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (एनईपी) ६४ पानांमध्ये एकही मराठी शब्द नाही. ही १३ कोटी मराठी जनतेसाठी खेदाची बाब आहे.