शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

बार्टी-सारथीच्या लाभार्थ्यांना उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचा कट; लाभ मिळू नये अशा अटी

By संदीप आडनाईक | Updated: September 11, 2024 14:11 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम राज्यातील इतर मागासवर्ग ...

संदीप आडनाईककोल्हापूर : इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून वगळून त्यांच्या शिक्षणाच्या संधीही हिरावून घेतल्या आहेत. महत्वाचे म्हणजे बार्टी आणि सारथी संस्थांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि ६० टक्के गुण असण्याची अट घातली आहे. याचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार असून, सरकारने त्यांना उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचाच कट केला आहे.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत वसतिगृहातील प्रवेश आणि संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या या समाजासाठी आरक्षित जागा पूर्ण क्षमतेने भरत नाहीत, हे वास्तव आहे. असे असताना लाभार्थी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि ६० टक्के गुण असण्याची अट घातली आहे. त्यामुळे किमान गुणांची मर्यादा ४५ टक्क्यांपर्यंत खाली आणावी, यामुळे आधार योजना, स्वयंम योजनेचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळू शकेल, अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीने केली आहे.

शासन आदेश

  • १३ डिसेंबर २०२३ : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना.
  • १९ डिसेंबर २०२३ : राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी योजना.
  • १८ जून २०२४ : भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना.
  • ११ मार्च २०२४ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना.

एकतर रडतखडत इयत्ता १० वीपर्यंत मजल मारणाऱ्या या विद्यार्थ्यांना १० वी नंतरच्या पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी ६० टक्के गुणांचे निकष लावण्याचा शासन निर्णय काढून त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. याशिवाय या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण असण्याची अट घालून त्यांना वसतिगृहातील प्रवेशापासूनही दूर ठेवले आहे. - सयाजी झुंझार, संघटक, ओबीसी बहुजन पार्टी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार