शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

बार्टी-सारथीच्या लाभार्थ्यांना उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचा कट; लाभ मिळू नये अशा अटी

By संदीप आडनाईक | Updated: September 11, 2024 14:11 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम राज्यातील इतर मागासवर्ग ...

संदीप आडनाईककोल्हापूर : इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून वगळून त्यांच्या शिक्षणाच्या संधीही हिरावून घेतल्या आहेत. महत्वाचे म्हणजे बार्टी आणि सारथी संस्थांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि ६० टक्के गुण असण्याची अट घातली आहे. याचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार असून, सरकारने त्यांना उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचाच कट केला आहे.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत वसतिगृहातील प्रवेश आणि संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या या समाजासाठी आरक्षित जागा पूर्ण क्षमतेने भरत नाहीत, हे वास्तव आहे. असे असताना लाभार्थी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि ६० टक्के गुण असण्याची अट घातली आहे. त्यामुळे किमान गुणांची मर्यादा ४५ टक्क्यांपर्यंत खाली आणावी, यामुळे आधार योजना, स्वयंम योजनेचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळू शकेल, अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीने केली आहे.

शासन आदेश

  • १३ डिसेंबर २०२३ : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना.
  • १९ डिसेंबर २०२३ : राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी योजना.
  • १८ जून २०२४ : भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना.
  • ११ मार्च २०२४ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना.

एकतर रडतखडत इयत्ता १० वीपर्यंत मजल मारणाऱ्या या विद्यार्थ्यांना १० वी नंतरच्या पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी ६० टक्के गुणांचे निकष लावण्याचा शासन निर्णय काढून त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. याशिवाय या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण असण्याची अट घालून त्यांना वसतिगृहातील प्रवेशापासूनही दूर ठेवले आहे. - सयाजी झुंझार, संघटक, ओबीसी बहुजन पार्टी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार