शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

नामशेष होणा-या जंगली आल्याचे संवर्धन करणार :अभिजित कासारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:05 IST

जंगली आले ही एक औषधी वनस्पती आहे. जखमेवरील सूज कमी करण्यासाठी या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. जंगलात वाढणाऱ्या या वनस्पतीबद्दल स्थानिक जाणकार लोकांना याची माहिती आहे, पण अलीकडे व्यापारी प्रवृत्तीमुळे ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे याचे संवर्धन करणे यालाच एक संशोधक म्हणून माझे प्राधान्य राहणार आहे.

ठळक मुद्देराज्यभर भटकंतीआल्याबरोबरच हळदही औषधी वनस्पती असल्याने त्याच्या संशोधनात अधिक लक्ष घालणार आहे.

नसिम सनदी ।दुर्मीळ वनौषधी म्हणून वापरल्या जाणाºया जंगली आल्याच्या दोन नवीन जाती शोधून काढण्यात कोल्हापुरातील डॉ. अभिजित कासारकर यांना यश आले आहे. कासारकर हे मूळचे नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील आहेत. ते सध्या विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रभर भटकंती करून कोकण आणि गडचिरोली येथे त्यांना या दोन आलेवर्गीय वनस्पतींचा शोध लागला. या शोधाची दखल तमिळनाडूच्या व्ही. बी. गौड संस्थेने घेत कासारकर यांना यावर्षीच्या युवा संशोधक पुरस्कारासाठी निवडले आहे. त्यांच्या या वाटचालीबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न : जंगली वनस्पतींच्या संशोधनाकडे कसे वळला.उत्तर : मी २०१३ मध्ये पीएच.डी.साठी जंगली वनस्पतींचाच विषय घेतला होता. यावर अभ्यास करताना याची गोडी लागत गेली. यातून जंगली आल्याचा संदर्भ सापडला. हे औषधी असल्याचे वाचनात आल्यानंतर तर त्याचा कसोशीने शोध सुरू केला. कोकण आणि गडचिरोलीमध्ये हा शोध संपला. तेथे या आलेवर्गीय दोन वनस्पती आढळून आल्या. त्याचे झिंगीबेर मोन्टॅनम आणि झिंगीबेर कॅपिटॅनम असे शास्त्रीय नाव आहे.

प्रश्न : अशा प्रकारच्या वनस्पती आणखी कुठे आढळतात.उत्तर : अतिपाऊस आणि विशिष्ट प्रकारच्या मातीतच या कंदाचा विकास होत असल्याने केरळ, तमिळनाडूतील जंगलातच याचे प्रमाण जास्त दिसते. महाराष्ट्रात त्याचे दर्शन फारच दुर्मीळ होते. संशोधनाच्या निमित्ताने फिरल्यानंतरच या दोन वनस्पती महाराष्ट्रातही असल्याचे स्पष्ट झाल्याने खूपच आनंद झाला.पेटंट मिळवणारऔषधनिर्मिती करणा-या कंपन्यांकडून याला मोठी मागणी आहे. भविष्यात यात अधिक संशोधन करण्याचा आपला मानस आहे. दोन वनस्पतींचा शोध हे आपले यश असून, त्यावरील पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. जंगली आल्याबरोबरच हळदही औषधी वनस्पती असल्याने त्याच्या संशोधनात अधिक लक्ष घालणार आहे.या आल्याचे औषध गुणधर्मएखादी जखम झाली, मुकामार लागला तर येणारी सूज कमी करण्यासाठी या आल्याचा रस अथवा चूर्ण लेप म्हणून लावला जातो असे जंगलात फिरताना स्थानिक लोकांकडून ऐकले होते. ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले असते, ते खरे असल्याचे सिद्ध झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलMaharashtraमहाराष्ट्र