शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नामशेष होणा-या जंगली आल्याचे संवर्धन करणार :अभिजित कासारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:05 IST

जंगली आले ही एक औषधी वनस्पती आहे. जखमेवरील सूज कमी करण्यासाठी या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. जंगलात वाढणाऱ्या या वनस्पतीबद्दल स्थानिक जाणकार लोकांना याची माहिती आहे, पण अलीकडे व्यापारी प्रवृत्तीमुळे ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे याचे संवर्धन करणे यालाच एक संशोधक म्हणून माझे प्राधान्य राहणार आहे.

ठळक मुद्देराज्यभर भटकंतीआल्याबरोबरच हळदही औषधी वनस्पती असल्याने त्याच्या संशोधनात अधिक लक्ष घालणार आहे.

नसिम सनदी ।दुर्मीळ वनौषधी म्हणून वापरल्या जाणाºया जंगली आल्याच्या दोन नवीन जाती शोधून काढण्यात कोल्हापुरातील डॉ. अभिजित कासारकर यांना यश आले आहे. कासारकर हे मूळचे नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील आहेत. ते सध्या विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रभर भटकंती करून कोकण आणि गडचिरोली येथे त्यांना या दोन आलेवर्गीय वनस्पतींचा शोध लागला. या शोधाची दखल तमिळनाडूच्या व्ही. बी. गौड संस्थेने घेत कासारकर यांना यावर्षीच्या युवा संशोधक पुरस्कारासाठी निवडले आहे. त्यांच्या या वाटचालीबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न : जंगली वनस्पतींच्या संशोधनाकडे कसे वळला.उत्तर : मी २०१३ मध्ये पीएच.डी.साठी जंगली वनस्पतींचाच विषय घेतला होता. यावर अभ्यास करताना याची गोडी लागत गेली. यातून जंगली आल्याचा संदर्भ सापडला. हे औषधी असल्याचे वाचनात आल्यानंतर तर त्याचा कसोशीने शोध सुरू केला. कोकण आणि गडचिरोलीमध्ये हा शोध संपला. तेथे या आलेवर्गीय दोन वनस्पती आढळून आल्या. त्याचे झिंगीबेर मोन्टॅनम आणि झिंगीबेर कॅपिटॅनम असे शास्त्रीय नाव आहे.

प्रश्न : अशा प्रकारच्या वनस्पती आणखी कुठे आढळतात.उत्तर : अतिपाऊस आणि विशिष्ट प्रकारच्या मातीतच या कंदाचा विकास होत असल्याने केरळ, तमिळनाडूतील जंगलातच याचे प्रमाण जास्त दिसते. महाराष्ट्रात त्याचे दर्शन फारच दुर्मीळ होते. संशोधनाच्या निमित्ताने फिरल्यानंतरच या दोन वनस्पती महाराष्ट्रातही असल्याचे स्पष्ट झाल्याने खूपच आनंद झाला.पेटंट मिळवणारऔषधनिर्मिती करणा-या कंपन्यांकडून याला मोठी मागणी आहे. भविष्यात यात अधिक संशोधन करण्याचा आपला मानस आहे. दोन वनस्पतींचा शोध हे आपले यश असून, त्यावरील पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. जंगली आल्याबरोबरच हळदही औषधी वनस्पती असल्याने त्याच्या संशोधनात अधिक लक्ष घालणार आहे.या आल्याचे औषध गुणधर्मएखादी जखम झाली, मुकामार लागला तर येणारी सूज कमी करण्यासाठी या आल्याचा रस अथवा चूर्ण लेप म्हणून लावला जातो असे जंगलात फिरताना स्थानिक लोकांकडून ऐकले होते. ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले असते, ते खरे असल्याचे सिद्ध झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलMaharashtraमहाराष्ट्र