शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो नव्हे तर.., भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची काँग्रेसवर टीका

By भीमगोंड देसाई | Updated: October 29, 2022 16:52 IST

महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेते हे ठरवू शकत नाहीत.

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो नव्हे तर पक्ष, परिवार जोडो यात्रा आहे. मतदारांनाही हे चांगले माहीत आहे. म्हणून प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच जनाधार मिळत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर हल्लाबोल्ल चढवला.शायना म्हणाल्या, काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा पक्ष वाचविण्यासाठी यात्रा काढावी. काँग्रेसकडे सक्षम विरोधी पक्ष होण्याचीही ताकद राहिलेली नाही. आता हा पक्ष प्रादेशिक बनत चालला आहे. भारत जोडो यात्रे़चे स्वागत शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातर्फे महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी शिल्लक आहे कोठे?गुजरातची जनता केजरीवालांना भुलणार नाहीगुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांचे राजकारण करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नोटांवर देवदेवतांचे फोटो छापण्याची मागणी करीत आहेत. मात्र यास गुजरातची जनता भुलणार नाही. भाजपचा अजेंडा हा सबका साथ सबका विकासचा आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईत कोणाची ताकत आहे, हे शिवसेना ठाकरे गटालाही कळून चुकेल.उद्योजक ठरवतात, नेते नव्हेमहाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेत हे ठरवू शकत नाहीत. यामुळे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेले या आरोपात काही तथ्य नाही...तेच लोक यंत्रणाच्या कारवाईसंबंधी चुकीचा संदेश पसरवत आहेतईडी आणि सीबीआय स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांतर्फे चुकीचे काम केलेल्यांवर कारवाई होत आहे. ज्यांनी चुकीचे काम केले नाहीत, त्यांनी या यंत्रणांना घाबरण्याची गरज नाही. दाल मे कुछ काला है असेच लोक या यंत्रणाच्या कारवाईसंबंधी चुकीचा संदेश पसरवत आहेत, असेही शायना यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, जायंटसचे गिरीश चितळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा