शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भारत जोडो नव्हे तर.., भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची काँग्रेसवर टीका

By भीमगोंड देसाई | Updated: October 29, 2022 16:52 IST

महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेते हे ठरवू शकत नाहीत.

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो नव्हे तर पक्ष, परिवार जोडो यात्रा आहे. मतदारांनाही हे चांगले माहीत आहे. म्हणून प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच जनाधार मिळत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर हल्लाबोल्ल चढवला.शायना म्हणाल्या, काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा पक्ष वाचविण्यासाठी यात्रा काढावी. काँग्रेसकडे सक्षम विरोधी पक्ष होण्याचीही ताकद राहिलेली नाही. आता हा पक्ष प्रादेशिक बनत चालला आहे. भारत जोडो यात्रे़चे स्वागत शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातर्फे महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी शिल्लक आहे कोठे?गुजरातची जनता केजरीवालांना भुलणार नाहीगुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांचे राजकारण करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नोटांवर देवदेवतांचे फोटो छापण्याची मागणी करीत आहेत. मात्र यास गुजरातची जनता भुलणार नाही. भाजपचा अजेंडा हा सबका साथ सबका विकासचा आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईत कोणाची ताकत आहे, हे शिवसेना ठाकरे गटालाही कळून चुकेल.उद्योजक ठरवतात, नेते नव्हेमहाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेत हे ठरवू शकत नाहीत. यामुळे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेले या आरोपात काही तथ्य नाही...तेच लोक यंत्रणाच्या कारवाईसंबंधी चुकीचा संदेश पसरवत आहेतईडी आणि सीबीआय स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांतर्फे चुकीचे काम केलेल्यांवर कारवाई होत आहे. ज्यांनी चुकीचे काम केले नाहीत, त्यांनी या यंत्रणांना घाबरण्याची गरज नाही. दाल मे कुछ काला है असेच लोक या यंत्रणाच्या कारवाईसंबंधी चुकीचा संदेश पसरवत आहेत, असेही शायना यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, जायंटसचे गिरीश चितळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा