शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

By समीर देशपांडे | Updated: November 16, 2024 19:03 IST

आमदार निधीचीही टंचाई

कोल्हापूर : काँग्रेसचे अनेक नेते महाराष्ट्रात येऊन ‘कर्नाटक पॅटर्न’ची उदाहरणे देत आहेत. परंतु काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी ज्या योजना जाहीर केल्या होत्या. त्या पैसे नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आमदार निधीचीही टंचाई भासू लागल्याने आमदारांनी या योजना बंद करण्याची मागणी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांच्याकडे केली. त्यामुळे ‘कर्नाटक पॅटर्न’ ही फसवणूक असून, महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसच्या या आश्वासनांना भुलू नये, असे आवाहन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे.येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे आणि कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक उपस्थित होते.जोशी म्हणाले, काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी महिलांना मोफत बस प्रवासाची योजना जाहीर केली. परंतु निधीअभावी ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दुसरा पर्याय म्हणून आता धावणाऱ्या बसेसची संख्याच कमी करण्यात येत आहे. बस वेळेवर येत नाहीत, यासाठी आंदोलने सुरू आहेत.दर महिन्याला महिलांना २ हजार रुपये देण्याच्या गृहलक्ष्मी योजनेचे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे अजून मिळालेले नाहीत. २०० युनिट मोफत वीज घोषणेचाही बोजवारा उडाला असून, साडेतीन लाख बेरोजगारांपैकी केवळ ३५०० जणांना रोजगार मिळाला आहे. महिन्याला १० किलो तांदूळही दिला जात नसून त्यातील पाच किलाे केंद्र शासनच देत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारministerमंत्रीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024