शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

By समीर देशपांडे | Updated: November 16, 2024 19:03 IST

आमदार निधीचीही टंचाई

कोल्हापूर : काँग्रेसचे अनेक नेते महाराष्ट्रात येऊन ‘कर्नाटक पॅटर्न’ची उदाहरणे देत आहेत. परंतु काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी ज्या योजना जाहीर केल्या होत्या. त्या पैसे नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आमदार निधीचीही टंचाई भासू लागल्याने आमदारांनी या योजना बंद करण्याची मागणी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांच्याकडे केली. त्यामुळे ‘कर्नाटक पॅटर्न’ ही फसवणूक असून, महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसच्या या आश्वासनांना भुलू नये, असे आवाहन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे.येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे आणि कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक उपस्थित होते.जोशी म्हणाले, काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी महिलांना मोफत बस प्रवासाची योजना जाहीर केली. परंतु निधीअभावी ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दुसरा पर्याय म्हणून आता धावणाऱ्या बसेसची संख्याच कमी करण्यात येत आहे. बस वेळेवर येत नाहीत, यासाठी आंदोलने सुरू आहेत.दर महिन्याला महिलांना २ हजार रुपये देण्याच्या गृहलक्ष्मी योजनेचे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे अजून मिळालेले नाहीत. २०० युनिट मोफत वीज घोषणेचाही बोजवारा उडाला असून, साडेतीन लाख बेरोजगारांपैकी केवळ ३५०० जणांना रोजगार मिळाला आहे. महिन्याला १० किलो तांदूळही दिला जात नसून त्यातील पाच किलाे केंद्र शासनच देत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारministerमंत्रीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024