शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपाल यांच्या बैठकीतील तपशील जाहीर करा; काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी

By विश्वास पाटील | Updated: December 7, 2022 21:49 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

विश्वास पाटील, कोल्हापूर: सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटककडून अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या राज्यपालांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती ? याचे  तपशील जाहीर करावेत अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज  पाटील यांनी बुधवारी पत्रकाद्वारे केली. आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पत्रकात म्हटले आहे की, ४ नोव्हेंबर २०२२ रोजी इतिहासात कधी झाली नाही, अशी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या दोन्ही राज्यपालांची बैठक कोल्हापूरात झाली . त्याचा सविस्तर वृत्तांत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असेलच. तसेच तो वृत्तांत दोन्ही राज्य सरकारांकडेही नक्की पाठविला असणार आहे.  या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?  याची माहिती जनतेला कळणे गरजेचे आहे . एकीकडे अशी बैठक होते आणि दुसरीकडे मात्र मराठी भाषिकांची मुस्कटदाबी केली जाते, यामागे  नेमके गौडबंगाल काय आहे?   त्यामुळे दोन्ही राज्यपालांच्या बैठकीतील चर्चेची माहिती  जनतेसमोर यावी .

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये  करत आहेत. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  बेळगांव, कारवार, बिदर या भागातील सुमारे २५ विधानसभा मतदारसंघातील कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेवून मुद्दामहून ते अशी वक्तव्ये करत आहेत. ते सोलापुरात येऊन गेले पण त्या ठिकाणी कर्नाटक भवन बद्दल फार काही बोलले नाहीत पण कोल्हापुरात कार्यक्रमाला आले असता कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन बांधणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हे लोकांना नक्की कळले आहे. 

सौंदती यात्रेला गेलेल्या भक्तांची सुरक्षा ठेवा 

दरवर्षी प्रमाणे  कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला कोल्हापुरातील लाखो भाविक गेले आहेत. सीमा वादाच्या सध्याच्या या तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती डोंगरावर गेलेल्या तसेच यात्रेला जाणार आहेत ,अशा कोल्हापुरातील रेणुका भक्तांची  योग्य ती सुरक्षा घेण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत ,अशी मागणी करणारे पत्र आमदार पाटील यांनी बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठविले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलborder disputeसीमा वाद