शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

'मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत ढकले', आमदार पी. एन. पाटलांची भव्य पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 16:35 IST

मोदी सरकारने देशातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा घणाघाती आरोप आमदार पी. एन पाटील यांनी केला.

कोपार्डे : गेल्या ७० वर्षात काँग्रेसने सहकारी बँका, साखर कारखाने, बाजार समित्या, शिक्षण संस्था स्थापन करून खेडी व शेतकरी आर्थिक दृष्टीने समृद्ध केली. पण मोदी सरकारच्या काळात मोदीच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्यावर गाडी घालून ठार मारले. शेतकरी काय मोदी सरकारचे वैरी होते काय? असा सवाल आमदार पी. एन पाटील यांनी उपस्थितीत करत मोदी सरकारने देशातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा घणाघाती आरोप केला.आज बीड शेड ते क। बीड दरम्यान करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या महागाई विरोधातील पदयात्रानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी बंगळुरु मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याबद्दल निषेधाचा ठराव करण्यात आला. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील,पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील,राजेंद्र सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार पाटील म्हणाले, काँग्रेसच्या विरोधात महागाई बद्दल गरळ ओकणाऱ्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचा दर १०० रूपयेच्यावर, घरगुती गँस एक हजार रुपये करून सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. शासकीय कंपन्या विकण्याचा धडाका लावला आहे. यावरून मोदी देश कोठे घेऊन गेले आहेत हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस सरकार आले तरच देश वाचणार असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दररोज एक तास जनतेत प्रबोधन करावे असे आवाहन केले.यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, सरपंच सत्यजित पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसPandurang Patilपांडुरंग पाटील