शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’साठी ‘सतेज’ यांची तयारी, जास्त ठरावासाठी पायाला भिंगरी

By राजाराम लोंढे | Updated: June 24, 2025 17:33 IST

एकनिष्ठ नऊ संचालक ही मोठी ताकद

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’ आगामी निवडणुकीसाठी महायुतीची मोट सध्या तरी भक्कम वाटत असली तरी आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अत्यंत सूक्ष्मपणे बांधणी सुरू केली आहे. एकनिष्ठ नऊ संचालक ही त्यांची मोठी ताकद आहे. पहिल्या टप्प्यात ठराव जास्तीत जास्त कसे गोळा करता येतील यावर ते काम करत आहेत. आपल्यासोबत कोण येणार? याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी जास्तीत जास्त ठराव महाविकास आघाडीकडे कसे जमा होतील, यावर भर दिला आहे. त्यामुळे, सध्या जरी ते एकाकी वाटत असले तरी प्रत्यक्ष रणांगणात त्यांच्यासोबत दिग्गज नेते राहतील अशा घडामोडी पडद्याआड सुरू आहेत. त्यामुळे आजच्या स्थितीला जे वरवर चित्र दिसते त्याहून वेगळ्याच दिशेला राजकारण नेणाऱ्या या घडामोडी आहेत.

राज्यातील सत्तेचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होतोच. आताही तशीच परिस्थिती आहे. महायुती म्हणून सामोरे जाताना सतेज पाटील यांना एकटे पाडण्याची रणनीती विशेषत: भाजप नेत्यांची आहे. हे ओळखून त्यांनी ‘आपण एकटा पडलोय’ ही भावना दूध संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत बोलून दाखवली. यावरून त्यांनी सहानुभूतीचे राजकारण सुरू केल्याची टीकाही झाली. मात्र, त्यांनी यातून आघाडीच्या नेत्यांना वेगळा संदेश दिला.महाविकास आघाडी म्हणून आता त्यांच्यासोबत खासदार शाहू छत्रपती हे सोबत राहणार आहेतच. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, संपतराव पवार, राजू आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, संघाचे संचालक डॉ. चेतन नरके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गोपाळराव पाटील आदींची साथ मिळणार आहे.

‘गोकुळ’चे पडसाद ‘केडीसीसी’त उमटणारमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘केडीसीसी’ बँकेच्या मागील दोन निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, निवडणूक लागली असली तरी एकतर्फीच झाली होती. वित्तीय संस्थेची निवडणूक लागली की आरोप-प्रत्यारोप होतात, त्यातून संस्थेची प्रतिमा मलिन होऊन त्याचा परिणाम व्यवहारावर होतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत ते बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतात. ‘गोकुळ’नंतर अवघ्या सहा महिन्यांत बँकेची निवडणूक आहे. संघात सतेज पाटील यांना बाजूला केले तर ते बँकेला आव्हान देऊ शकतात? त्यामुळेच मंत्री मुश्रीफ यांची कोंडी होणार आहे.२०१५ ला निकराची झुंज..सतेज पाटील यांनी २०१५ ला येईल त्याला सोबत घेत ‘गोकुळ’ची निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे केवळ बाबासाहेब चौगले हे एकमेव संचालक होते, दूध संस्थांशी त्यांचा अजिबात संपर्क नसताना निकराची झुंज देत दोन जागा निवडून आणल्या होत्या. आता तर त्यांच्याकडे आठ विद्यमान संचालक आहेत, त्याचबरोबर चार वर्षे सत्तेत राहिल्याने त्यांचा संपर्क राहिल्याने महायुतीला वाटते तितकी सोपी निवडणूक नसणार, हे निश्चित आहे.

पी.एन. पाटील गटाची ताकद..गोकुळच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार दिवंगत पी.एन. पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना बळ दिले. पक्षीय बंध सोडून ते कायमच सत्तारूढ आघाडीसोबत राहिले. गोकुळच्या राजकारणात त्यांची एक ताकद राहिली. त्यांच्या निधनानंतर चिरंजीव राहुल पाटील यांना आमदार सतेज पाटील यांनी बळ दिल्याने ते गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीसोबतच आहेत. त्यामुळे सर्वाधिक ठराव असलेल्या करवीर तालुक्यात महाविकास आघाडी मजबूत होऊ शकते.

सतेज समर्थक संचालकविश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, शशिकांत पाटील चुयेकर, डॉ. चेतन नरके, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील आणि स्वीकृत संचालक राजेंद्र मोरे (संभाव्य - अभिजित तायशेटे)