शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

Kolhapur: ‘गोकुळ’साठी ‘सतेज’ यांची तयारी, जास्त ठरावासाठी पायाला भिंगरी

By राजाराम लोंढे | Updated: June 24, 2025 17:33 IST

एकनिष्ठ नऊ संचालक ही मोठी ताकद

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’ आगामी निवडणुकीसाठी महायुतीची मोट सध्या तरी भक्कम वाटत असली तरी आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अत्यंत सूक्ष्मपणे बांधणी सुरू केली आहे. एकनिष्ठ नऊ संचालक ही त्यांची मोठी ताकद आहे. पहिल्या टप्प्यात ठराव जास्तीत जास्त कसे गोळा करता येतील यावर ते काम करत आहेत. आपल्यासोबत कोण येणार? याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी जास्तीत जास्त ठराव महाविकास आघाडीकडे कसे जमा होतील, यावर भर दिला आहे. त्यामुळे, सध्या जरी ते एकाकी वाटत असले तरी प्रत्यक्ष रणांगणात त्यांच्यासोबत दिग्गज नेते राहतील अशा घडामोडी पडद्याआड सुरू आहेत. त्यामुळे आजच्या स्थितीला जे वरवर चित्र दिसते त्याहून वेगळ्याच दिशेला राजकारण नेणाऱ्या या घडामोडी आहेत.

राज्यातील सत्तेचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होतोच. आताही तशीच परिस्थिती आहे. महायुती म्हणून सामोरे जाताना सतेज पाटील यांना एकटे पाडण्याची रणनीती विशेषत: भाजप नेत्यांची आहे. हे ओळखून त्यांनी ‘आपण एकटा पडलोय’ ही भावना दूध संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत बोलून दाखवली. यावरून त्यांनी सहानुभूतीचे राजकारण सुरू केल्याची टीकाही झाली. मात्र, त्यांनी यातून आघाडीच्या नेत्यांना वेगळा संदेश दिला.महाविकास आघाडी म्हणून आता त्यांच्यासोबत खासदार शाहू छत्रपती हे सोबत राहणार आहेतच. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, संपतराव पवार, राजू आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, संघाचे संचालक डॉ. चेतन नरके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गोपाळराव पाटील आदींची साथ मिळणार आहे.

‘गोकुळ’चे पडसाद ‘केडीसीसी’त उमटणारमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘केडीसीसी’ बँकेच्या मागील दोन निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, निवडणूक लागली असली तरी एकतर्फीच झाली होती. वित्तीय संस्थेची निवडणूक लागली की आरोप-प्रत्यारोप होतात, त्यातून संस्थेची प्रतिमा मलिन होऊन त्याचा परिणाम व्यवहारावर होतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत ते बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतात. ‘गोकुळ’नंतर अवघ्या सहा महिन्यांत बँकेची निवडणूक आहे. संघात सतेज पाटील यांना बाजूला केले तर ते बँकेला आव्हान देऊ शकतात? त्यामुळेच मंत्री मुश्रीफ यांची कोंडी होणार आहे.२०१५ ला निकराची झुंज..सतेज पाटील यांनी २०१५ ला येईल त्याला सोबत घेत ‘गोकुळ’ची निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे केवळ बाबासाहेब चौगले हे एकमेव संचालक होते, दूध संस्थांशी त्यांचा अजिबात संपर्क नसताना निकराची झुंज देत दोन जागा निवडून आणल्या होत्या. आता तर त्यांच्याकडे आठ विद्यमान संचालक आहेत, त्याचबरोबर चार वर्षे सत्तेत राहिल्याने त्यांचा संपर्क राहिल्याने महायुतीला वाटते तितकी सोपी निवडणूक नसणार, हे निश्चित आहे.

पी.एन. पाटील गटाची ताकद..गोकुळच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार दिवंगत पी.एन. पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना बळ दिले. पक्षीय बंध सोडून ते कायमच सत्तारूढ आघाडीसोबत राहिले. गोकुळच्या राजकारणात त्यांची एक ताकद राहिली. त्यांच्या निधनानंतर चिरंजीव राहुल पाटील यांना आमदार सतेज पाटील यांनी बळ दिल्याने ते गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीसोबतच आहेत. त्यामुळे सर्वाधिक ठराव असलेल्या करवीर तालुक्यात महाविकास आघाडी मजबूत होऊ शकते.

सतेज समर्थक संचालकविश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, शशिकांत पाटील चुयेकर, डॉ. चेतन नरके, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील आणि स्वीकृत संचालक राजेंद्र मोरे (संभाव्य - अभिजित तायशेटे)