शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला कसा..? कशी आहे व्यवस्था..कशी होते दुरुस्ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 12:47 IST

राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

कोल्हापूर : राधानगरीधरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. याचा अर्थ हे गेट दुरुस्तीसाठी उघडण्यात आले नव्हते हे स्पष्टच आहे.

राजर्षि शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेल्या या धरणामध्ये त्यावेळी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान जगाच्या पुढे जाणारे होते. धोका पत्करूनच दुरुस्तीची कामे करावी लागतात. याबद्दल पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर म्हणाले, बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास तीन सेवाद्वारांपैकी एक दार खुले होवून पाण्याचा विसर्ग सुुरु झाला. दरवाजा उघडण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.

हे दार वीज पंपाच्या माध्यमातून उघडण्यात येते. त्याच्या स्टार्टरमध्ये बिघाड होवून ते खुले झाले असण्याची शक्यता आहे. किंवा अज्ञाताकडून अथवा धरण स्थळावर इतरत्र चालू असलेल्या कामावरील मजुराकडून अनवधानाने बटन दाबले गेल्याने उघडले असण्याची शक्यता आहे.

अशी आहे व्यवस्था...

  • या धरणाला पाणी सोडण्याच्या दोन व्यवस्था आहेत. धरण बांधतानाच त्यांची सोय केली आहे. पावसाळ्यात जेव्हा पाऊस प्रचंड येतो, धरण भरले की धरणातील पाण्याचा विसर्ग व्हावा यासाठी ७ स्वयंचलित दरवाजे आहेत. ते पाणी वाढले की आपोआप उघडतात व पाणी कमी झाले की आपोआप बंद होतात. 
  • दूसरी व्यवस्था ही शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवण्यासाठी भोगावती नदीत पाणी सोडण्यासाठी आहे. ही एकूण ५ गेट आहेत. त्यातील १ व २ नंबरच्या गेटमधून वीज निर्मितीसाठी कायमपणे पाणी सोडण्यात येते. 
  • राहिलेल्या तीन गेटची पाटबंधारे विभागाची तांत्रिक शाखा वर्ष-दोन वर्षांतून दुरुस्ती करतो. हे काम मुख्यत: धरणातील पाणी कमी झाल्यावर साधारणत: मार्चनंतर करण्यात येते. एखाद्या गेटबध्दल दुरुस्ती करणे गरजेचे आहे असे वाटले तर ते पावसाळ्यानंतरही लगेच करण्यात येते. 

अशी होते दुरुस्ती..

  • या ५ ही गेट शिवाय दुरुस्तीवेळी वापरता यावे यासाठी धरणावर प्रचंड अशा आपत्कालीन गेटची सोय आहे. जेव्हा मुख्य गेटची दुरुस्ती करावी लागते तेव्हा पाण्याकडील बाजूस हे आपत्कालीन गेट पाण्यात सोडण्यात येते. ते गेट बसण्यासाठी तसा स्लॉटची व्यवस्था धरण बांधतानाच केली आहे. हे गेट सोडल्याशिवाय दुरुस्तीचे काम केले जात नाही. 
  • धरण तर भरलेले आहे आणि गेट दुरुस्त करायचे झाल्यास उपाय काय याचा विचार करून या आपत्कालीन गेटची सोय त्यावेळीच केली आहे. 
  • ही पाचही गेट कायमपणे पाण्यात असतात. त्यामुळे ती गंजतात. त्यांना ग्रिसींग करण्याची गरज असते. शटरचा दरवाजा जसा रोलरवर वर उघडत जातो, तशाच पध्दतीने साखळीच्या साहाय्याने व वीज पंपाच्या मदतीने हे गेट उघडण्यात येते व त्याची दुरुस्ती केली जाते. 

काळाच्या पुढे पाहणारे शाहू महाराज...

शाहू महाराज विलायतेत असताना त्यांना ब्रिटिश लोक संपत्तीच्या व शक्तीच्या प्रत्येक साधनाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी किती चांगल्या पध्दतीने करतात हे शाहूंच्या मनांवर ठसले होते. त्यातूनच १९०७ च्या प्रारंभी त्यांनी जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी ही राधानगरी धरणाची योजना तयार केली. बंधारा बांधण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात १९०९ मध्ये आईसाहेब महाराजांच्या हस्ते झाली. म्हणून या तलावाचे नावही लक्ष्मीबाई तलाव असे ठेवण्यात आले..हे धरण म्हणजे कोल्हापूरची जीवनदायिनी ठरले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरण