शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला कसा..? कशी आहे व्यवस्था..कशी होते दुरुस्ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 12:47 IST

राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

कोल्हापूर : राधानगरीधरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. याचा अर्थ हे गेट दुरुस्तीसाठी उघडण्यात आले नव्हते हे स्पष्टच आहे.

राजर्षि शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेल्या या धरणामध्ये त्यावेळी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान जगाच्या पुढे जाणारे होते. धोका पत्करूनच दुरुस्तीची कामे करावी लागतात. याबद्दल पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर म्हणाले, बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास तीन सेवाद्वारांपैकी एक दार खुले होवून पाण्याचा विसर्ग सुुरु झाला. दरवाजा उघडण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.

हे दार वीज पंपाच्या माध्यमातून उघडण्यात येते. त्याच्या स्टार्टरमध्ये बिघाड होवून ते खुले झाले असण्याची शक्यता आहे. किंवा अज्ञाताकडून अथवा धरण स्थळावर इतरत्र चालू असलेल्या कामावरील मजुराकडून अनवधानाने बटन दाबले गेल्याने उघडले असण्याची शक्यता आहे.

अशी आहे व्यवस्था...

  • या धरणाला पाणी सोडण्याच्या दोन व्यवस्था आहेत. धरण बांधतानाच त्यांची सोय केली आहे. पावसाळ्यात जेव्हा पाऊस प्रचंड येतो, धरण भरले की धरणातील पाण्याचा विसर्ग व्हावा यासाठी ७ स्वयंचलित दरवाजे आहेत. ते पाणी वाढले की आपोआप उघडतात व पाणी कमी झाले की आपोआप बंद होतात. 
  • दूसरी व्यवस्था ही शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवण्यासाठी भोगावती नदीत पाणी सोडण्यासाठी आहे. ही एकूण ५ गेट आहेत. त्यातील १ व २ नंबरच्या गेटमधून वीज निर्मितीसाठी कायमपणे पाणी सोडण्यात येते. 
  • राहिलेल्या तीन गेटची पाटबंधारे विभागाची तांत्रिक शाखा वर्ष-दोन वर्षांतून दुरुस्ती करतो. हे काम मुख्यत: धरणातील पाणी कमी झाल्यावर साधारणत: मार्चनंतर करण्यात येते. एखाद्या गेटबध्दल दुरुस्ती करणे गरजेचे आहे असे वाटले तर ते पावसाळ्यानंतरही लगेच करण्यात येते. 

अशी होते दुरुस्ती..

  • या ५ ही गेट शिवाय दुरुस्तीवेळी वापरता यावे यासाठी धरणावर प्रचंड अशा आपत्कालीन गेटची सोय आहे. जेव्हा मुख्य गेटची दुरुस्ती करावी लागते तेव्हा पाण्याकडील बाजूस हे आपत्कालीन गेट पाण्यात सोडण्यात येते. ते गेट बसण्यासाठी तसा स्लॉटची व्यवस्था धरण बांधतानाच केली आहे. हे गेट सोडल्याशिवाय दुरुस्तीचे काम केले जात नाही. 
  • धरण तर भरलेले आहे आणि गेट दुरुस्त करायचे झाल्यास उपाय काय याचा विचार करून या आपत्कालीन गेटची सोय त्यावेळीच केली आहे. 
  • ही पाचही गेट कायमपणे पाण्यात असतात. त्यामुळे ती गंजतात. त्यांना ग्रिसींग करण्याची गरज असते. शटरचा दरवाजा जसा रोलरवर वर उघडत जातो, तशाच पध्दतीने साखळीच्या साहाय्याने व वीज पंपाच्या मदतीने हे गेट उघडण्यात येते व त्याची दुरुस्ती केली जाते. 

काळाच्या पुढे पाहणारे शाहू महाराज...

शाहू महाराज विलायतेत असताना त्यांना ब्रिटिश लोक संपत्तीच्या व शक्तीच्या प्रत्येक साधनाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी किती चांगल्या पध्दतीने करतात हे शाहूंच्या मनांवर ठसले होते. त्यातूनच १९०७ च्या प्रारंभी त्यांनी जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी ही राधानगरी धरणाची योजना तयार केली. बंधारा बांधण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात १९०९ मध्ये आईसाहेब महाराजांच्या हस्ते झाली. म्हणून या तलावाचे नावही लक्ष्मीबाई तलाव असे ठेवण्यात आले..हे धरण म्हणजे कोल्हापूरची जीवनदायिनी ठरले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरण