शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शाहू महाराज मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करा, महापौरांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 11:42 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत समाधिस्थळावर उभारल्या जाणाऱ्या मेघडंबरीचे काम पूर्ण करा, अशा सक्त सूचना महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिकेचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार, आर्किटेक्ट यांना दिल्या. यापुढे कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी महापौर बोंद्रे यांच्यासह उपमहापौर महेश सावंत यांनी दिला. ​​​​​​​

ठळक मुद्देशाहू महाराज मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करा, महापौरांच्या सुचना काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत समाधिस्थळावर उभारल्या जाणाऱ्या मेघडंबरीचे काम पूर्ण करा, अशा सक्त सूचना महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिकेचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार, आर्किटेक्ट यांना दिल्या. यापुढे कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी महापौर बोंद्रे यांच्यासह उपमहापौर महेश सावंत यांनी दिला.गेली अडीच वर्षे नर्सरी बागेतील खुल्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारले जात आहे. त्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात विशेष तरतुदही केली आहे; परंतु अडीच वर्षांनंतरही हे काम रेंगाळले असून, ते कधी पूर्ण होणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे महापौर शोभा बोंद्रे यांनी समाधिस्थळावरच बैठक आयोजित केली होती.

कोल्हापुरातील नर्सरी बागेत राजर्षी शाहू समाधिस्थळावर उभारण्यात येणाऱ्या मेघडंबरीच्या कामाची पाहणी बुधवारी महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केली. यावेळी दिलीप पोवार, विलास वास्कर, सुरेखा शहा, शोभा कवाळे, अफजल पीरजादे, किशोर पुरेकर उपस्थित होते.या बैठकीला उपमहापौर महेश सावंत, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, शिक्षण सभापती अशोक जाधव, नगरसेविका शोभा कवाळे, नगरसेवक अफजल पीरजादे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, ठेकेदार व्ही. के. पाटील, आर्किटेक्ट अभिजित जाधव उपस्थित होते.समाधिस्थळाचे काम पाहून सर्वच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. काम अतिशय संथ गतीने सुरू असून आतापर्यंत ते पूर्ण व्हायला पाहिजे होते, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. शाहूंच्या समाधिस्थळाच्या कामाबाबत अशी दिरंगाई व उदासीनता यापुढे खपवून घेणार नाही. जर दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असे उपमहापौर सावंत यांनी सांगितले.ठेकेदार पाटील यांनी यावेळी खुलासा करताना सांगितले की, समाधिस्थळाचे सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. संरक्षक भिंतीचे कामही या आठवड्यात सुरू होईल. समाधिस्थळावरील मेघडंबरी पूर्वी दगडी होती, तिचे डिझाईन बदलण्यात आले.

आता ती ब्रॉँझपासून बनविली जात आहे. तिच्या नक्षीदार कामास विलंब होत आहे. ठेकेदाराने हा खुलासा केल्यावर महापौर बोंद्रे यांनी शिल्पकार किशोर पुरेकर यांच्या बापट कॅम्प येथील कार्यशाळेत जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वजण तेथे गेले.मेघडंबरीचे काम अधिक कलाकुसरीचे असल्याने ओतीव काम, फिनिशिंगचे काम अतिशय किचकट व वेळखाऊ असल्याने विलंब होत आहे. तरीही बरेच काम पूर्ण झाले आहे. अजून एक-दीड महिना तरी या कामास लागतील, असे शिल्पकार पुरेकर यांनी सांगितले. पाहणीनंतर कामास का विलंब होत आहे, हे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. शेवटी महापौर बोंद्रे यांनी १५ आॅगस्टपर्यंत काम पूर्ण करा, अशी सूचना केली.

इटलीनंतर कोल्हापुरातचराजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधिस्थळावर उभारण्यात येत असलेली ब्रॉँझची मेघडंबरी ही इटलीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात तयार केली जात आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराज यांची एक समाधी इटलीमधील फॉरेन्सिक शहरात आहे.

राजाराम महाराज यांचे निधन इटलीमध्ये झाले. त्यांच्या स्मरणार्थ राजर्षी शाहू महाराज यांनी तेथे मेघडंबरी उभी केली आहे. तशी हुबेहुब मेघडंबरी कोल्हापुरातील समाधिस्थळावर उभारली जात आहे. तिचे खांब हे भवानी मंडपातील खांबासारखे आहेत. आतापर्यंत तीन टन ब्रॉँझ त्यासाठी वापरण्यात आले आहे.

बैठकीतील निर्णय -

  1. - येत्या आठ दिवसांत संरक्षक भिंतीचे काम सुरू करणार.
  2. - लॅँडस्केपिंग व फरशी बसविण्याचे कामही सुरू करणार.
  3. - मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करणार.
  4. - त्यानंतर पुढील दहा दिवस प्रत्यक्ष समाधिस्थळी बसविणार.
  5. - सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात समाधिस्थळाचे लोकार्पण.

 

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर